Skip to main content

Posts

Showing posts from 2023

असा माझा दादा...

कधी कधी मला वाटतं कि मलाही मोठा दादा असायला हवा होता. जो मला नेहमी मार्गदर्शन करेल. आता तर देवाने खूप सारे मार्गदर्शन करणारे दादांशी ओळख करून दिली. त्यात माझा अमोल दादा पण एक आहे. जो मला नेहमी मार्गदर्शन करतो. हक्काने माझ्याकडे असलेले वस्तू मागतो. दादांचे नेहमीचे वाक्य "नेहा आज सोपं आणली का, दे बर पटकन", "चल इकडे बस बर नेहा, तिकडे नको जाऊ", "चल ये बर पटकन, सांग बर यात तू काय केल आहे", "टेन्शन नाही घ्यायचं नेहा, हे घे भात संपवं पटकन" आणि नेहमी मध्ये एखाद-दोन वाक्य बोलून, त्यांच दुसऱ्याला हसवण सुरु असतं. दादांचं प्रसिद्ध वाक्य "अशी गोष्ट आहे नेहा आणि तुला वाटते मजाक". आणि मार्गदर्शन करताना हे त्यांचं नेहमीच वाक्य "कुठल्याही परिस्थितीत माणसाने सहज असावं". शेवटी एवढच, दादाची जितकी प्रशंसा केली तितकी कमीच!

सुंदर हास्य

आम्ही ऑफिस मध्ये होतो, पण खरी भेट झाली ती त्या दिवशी, ज्यावेळेला स्वप्नील दा म्हणाला, "ही एकटीच आहे, इच्याशी बोलशील". दिवस तो शनिवारचा. मग स्वप्नील गेल्यानंतर आमच्या कामासोबत गप्पा सुरु झाल्या. गप्पामध्ये कधी आमची मैत्री झाली कळालं सुद्धा नाही. ती माझी मैत्रीण साधी सरळ असलेली अपूर्वा. आता नेहमी बोलणं सुरूच असतं. ती कधी हसत बाय करते तर कधी अलगद जवळ येऊन "झालं तुझं जेवण?"विचारते. कौतुकास्पद म्हणजे बोलताना तीचं सुंदर हास्य चेहऱ्यावरती कायम असतें.

हो ना अशीच ती...

नेहमी तर आनंदी असतें पण कधी कधी कामात इतकी व्यस्त होते कि खाण्याकडे सुद्धा लक्ष नसतं. मग शांततेत काम करनं सुरुच असतें. या कामात कधी हसणं पण विसरून जाते. अशा वेळेला महान लोकांच्या छान छान गोष्टी लक्षात असतात, पण सत्यात क्वचित उपयोग होत असतील. मग काय अशाही वेळेला दिवसाला सोनेरी करणारी मैत्री जर जवळ असली कि प्रत्येक क्षण चांदी चांदी झाल्यासारखा वाटतो. अशी एक मैत्री माझ्याजवळ ही आहे. सुरवातीला जेव्हा ती मिळाली. वाटलं कशी असेल यार ही, आपल्या सोबत होईल ना मैत्री. मग हळू हळू जेव्हा तिच्या सोबत राहायला लागले तेव्हा कळालं माझा अपेक्षेपेक्षा जास्त छान आहे. नाश्ता आला कि आधी खाऊन संपवायचा असं ती बजावून सांगते. उपास असला कि दोन फळांची बॉक्स, माझा टेबलवरती ठेवलेले मी पाहिते. आणखी एक कोणाचा विचारलं तर पोट भरल्याचा बहाणा करते. मी चिंतेत असली कि, मजेदार गोष्टी सांगून, मन आनंदी करते. शांत असली कि जोक सांगून मस्तीत बदलवते. आणि ही सगळी काळजी घेणारी माझी ती मैत्रीण मोहिनी. जणू काही कामासोबत तीच दुसरं ध्येय माझी काळजी घेणं कि काय! अशी मैत्री सगळ्याकडे असो ज्यात पारदर्शी आपुलकी राहील आणि योग्य वेळेला काळ...

एका फॉरेनर ची गोस्ट

शीतल आणि मी भाजा केव वरून खाली उतरताना, एक फॉरेनर पण खाली उतरत होती. थोड्यावेळाने आम्ही पायऱ्यांवरती बसलो आणि समोर बघते तर काय? ती फॉरेनर एका कुत्र्याचा फार लाड करत होती. तिने त्याला आवडीने बिस्कीट खाऊ घातले. तीचं भारतीय कुत्र्या वरीली प्रेम बघून आम्ही मात्र हसलो. खरंच वाटलं कि आपणही, नेहमी शक्य नाही तर, कधी कधी, प्राण्यावरती दया दाखवावी शेवटी तेही आपल्या निसर्गाचा एक घटकच कि!

कॉर्पोरेट ची मैत्री

कॉर्पोरेटची मैत्री थोडी अशीच असतें... कधी तिखट तर, कधी गोड असतें, कधी थोडी, तर कधी पोट दुखेपर्यंत हसवते, होना, कॉर्पोरेटची मैत्री थोडी अशीच असतें... नाही ऐकलं तर कोणी रागे भरते, कोणी रुसलं तर त्यालाही मनवते, "आता नाही हा बिझी आहोत" म्हणून सांगायचं थांबते, आणि कोणी बिझी असलं, तर "काम तो चलता रहेगा मेरे दोस्त थोडे मजे भी करले" असं ही म्हणते, होना, कॉर्पोरेटची मैत्री थोडी अशीच असतें... कामासोबत अनलिमिटेड जोक्स सूरू असतें, व्यलिड प्रश्न सोडून, इनव्यलिड प्रश्नाची भरभराट होते, कोणाचा राग आला असता कंप्लेंट दुसऱ्याला करते, शांत झालं असता प्रेमही तितकं करते, होना, कॉर्पोरेटची मैत्री थोडी अशीच असतें... जोरदार भूक लागली असता चला जेवायला जाऊया असं म्हणते, कोणी कॉलवर असता, दहापंधरा मिनिट सोडून अर्धा तासही थांबते, बडे असला कि केक तर ऑडर करते, पण पार्टीच्या नावाखाली खूप परेशान करते, होना, कॉर्पोरेटची मैत्री थोडी अशीच असतें... बॉटल मधलं पाणी संपलं असता, दुसऱ्याची बॉटल संपवन्यात पटाईत असतें, आईने खाऊ दिले असता, दुसऱ्याला वाटून समजूतदारपणाही दाखवते, लाईव्...

काकांचा समजदारपणा

त्या दिवशी सर्वांकारिता गुलाबजामून नेले. सर्वांना वाटल्यानंतर शेवटचा एक गुलाबजामून ठेवला तो संजू काकांकरिता. मी गुलाबजामूनचा डबा तिथेच ठेवला जिथे संजू काका नेहमी बसतात. आणि संजू काकांना सांगितलं कि, "काका तुमच्या करिता मी एक गुलाबजामून ठेवलेलं आहे ". त्यावर संजू काका हसत म्हणाले, "हो". कामात व्यस्त असल्याने मी लगेच तो डबा नाही आणू शकले आणि विचार केला, कि जाताना हा डबा मी सोबत घरी नेईल. काम पूर्ण झाल्यानंतर मी माझा डबा परत आणायला गेले. नक्कीच खाल्लं कि नाही हे बघण्यासाठी, मी जेव्हा डबा उघडला तेव्हा बघते तर काय, डबा चकाचक धुऊन तयार. खरंतर संजू काका गुलाबजामून खाऊन डबा तसेच ठेऊ शकत होते पण त्यांनी स्वच्छ करून ठेवला, हे बघून माझा आनंदाला पारावार नव्हता.

रागावून कि प्रेमाने

आज ती पुन्हा एकदा आपल्या आई समोर व्यक्त झाली, आणि आईला म्हणाली, " आई आज माझे सर माझ्यावरती रागावले. आज त्यांनी केलेल्या कॉमेंट मुळे असं वाटलं कि, ते माझा आदर आणि सन्मान कमी लेखत आहेत. म्हणूनच मी पण सरांवरती रागावले आणि त्यांना बोलले पण. ज्या सरांबद्दल आधी माझ्या मनात फार आदर होता तो आता नाही आहे. मला बिलकुल नाही आवडतं ते सर. ". यावर तिची आई हसली आणि तिला म्हणाली, "खरंतर सरांनी अशी विचित्र कॉमेंट केली असणार म्हणून तू रागावली ना. पण ती कॉमेंट तुझा सुधारणेसाठी होती हे विसरता कामा नये कारण समोरच्यांची परिस्थिती आणि दृष्टिकोन हे आपल्याला माहित नसतं. मी मान्य करते, जेव्हा मान आणि सन्मानाचा प्रश्न येतो, तेव्हा बोलणं चांगलं असतं. हे तू छान केलंस. पण शेवटी मी तुझी आई आहे आणि मला एक ठाऊक आहे, तेही तू फार रागावून बोलली असणार, ही चूक मात्र तू केली. ". ती म्हणाली, "तर मी करू तरी काय, तूच सांग ना?". आई म्हणाली, "अगं बाळा, जे तू रागावून बोललीस, ते तुला सहज प्रेमानेही सांगता आलं असतं. जेव्हा आपल्या सन्मानतेचा, आदराचा प्रश्न येतो त्यावेळेला टोचून बोलण्यापेक्षा,...

लाईट गेली म्हणून...

आज आमच्या घराकडील लाईट किमान अर्धा तासांसाठी गेलेली होती. रात्रीची वेळ आणि सर्वीकडे अंधारच अंधार. लाईट गेली असल्यामुळे सगळे आपली हातातली कामे बाजूला सारून घराबाहेर अंगणात आले. गप्पांना सुरुवात झाली. तेवढ्यात भरपूर जणांचं लक्ष गेलं ते या निळ्याशार आकाश्याकडे. सगळयांनी मन भरून उजेड देणाऱ्या चंद्राची आणि अवतीभोवती असणाऱ्या चांदण्यांची प्रशंसा केली. खरं म्हणजे लोक हे दृश्य बघून मनापासून आनंदी आणि प्रफुल्लित झालेत. चंद्र, तारे आणि आभाळ हे तर नेहमीच सुंदर दिसतात. आश्चर्य म्हणजे, या वेगवान जगात, आपण आपल्या कामात इतके व्यस्त असतो कि निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. जेव्हा निसर्गासोबतचे काही क्षण इतकं प्रफुल्लित करतं तर विचार करा रोज जर थोडा वेळ आपण या निसर्गाच्या सानिध्यात घालवला तर आयुष्य किती आनंदी होईल.

स्वप्नात रंग यावे..

एक मुलगी जी अगदी साधी नि सुंदर आहे. तिने तिच्या आतापर्यंतच्या आयुष्यात खूप कष्ट घेतले. तिने तीचं अभियांत्रिकी पूर्ण केलय. पण नोकरी लागावी म्हणून खूप प्रयत्न केले. आपल्या सगळ्या जवळच्या मैत्रिणींना नोकरी मिळाली पण मी मात्र एका विषयात नापास झाले या विचाराने ती दुःखी झाली. पण तिने ठरवले काहीही झालं तरी मला थांबून जमणार नाही. याच महत्वाकांक्षाने तिचा विषय निघाला आणि तिला पहिली नोकरी मिळाली ती पाच हजारांची. फक्त या पाच हजारासाठी ती कितीतरी किलोमीटर अंतर रोज गाठायची. कारण तीच एक स्वप्न होत आपली स्वतःची एक कार असावी. यासाठी तिने लागेल तेवढे प्रयत्न केले. याच परिश्रमाने ती आज एका चांगल्या पगाराच्या नोकरिवरती आहे. आज तिने पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालंय तिच्याकडे आज तिची स्वतःची एक छान कार आहे. तिने सिद्ध करून दाखवले एक आवडतं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठेही न थांबता सतत प्रयन्तशील असणं फार महत्वाचे आहे. ही मुलगी दुसरी कोणी नसून ती मुलगी आहे अमृता काळे.

जिंकणे कि हरणे

आज बॅडमिंटन खेळत असताना एका लहान मुलीने विचारलं, "मी पण खेळू ताई". ती लहान आहे आणि तिला कसं जमणार या विचाराने आम्ही तिला नाही म्हटलं. जेव्हा तिने तिसऱ्यांदा विचारलं, तेव्हा तिचा नाराज चेहरा बघून मी तिला होकार दिला. तिने माझ्यासोबत खेळायला सुरुवात केली. ती प्रयन्त करत राहिली पण तिला जमेना. तिला सगळे म्हणाले, "आता मला दे बघू, झालं तुझं खेळणं. नाही जमणार तुला". पण कुठेच लक्ष न देता ती सतत खेळत राहिली. आणि शेवटी शेवटी तीला जमलही, "मी तिला म्हटलं, अरे वा, नव्या तुला जमतंय". यातून एक मात्र मला समजलं, जेव्हा सगळे तिला नाही म्हणाले, पण ती मात्र अटळ, हरणं तिला माहित नव्हतं पण जिंकणं हे तिचा चेहऱ्यावर आधीच दिसत होतं.

मोठं कि लहान

आज घरी निघायच्या वेळेला बॉटलमध्ये पाणी भरत असताना रंजन सर स्वतःहून माझ्याकडे आले. माझी विचारपूस केली आणि मग आम्ही गप्पा करत बसलो. खरंतर रंजन सर हे साधं व्यक्तित्व नाही आहे, फार मोठ असं त्यांचं व्यक्तिमत्व. त्यामुळे मला सर दिसले कि,नेहमी वाटायचं, यांच्याशी आपली मैत्री नक्कीच व्हावी आणि ती झाली पण, याचा मला फार आनंद आहे. रंजन सरांकडून आपण एक मात्र शिकावं, आपण कितीही मोठं झालं तरी, लहानांशी प्रेमाने, मायेने आणि आपुलकी ने वागावं. तेव्हा लहानांना आवडतं चॉकलेट मिळण्यापेक्षाही जास्त आनंद होतो. जो आज मला झालंय.

एकच प्याला

उन्हाळ्याचे दिवस असले कि ऊन तर असणारच. आणि त्यात नवताप सूरू झाला कि आणखी जास्त असते. अरे इतक्या उन्हात निघायचं का हा प्रश्न माणसाला उन्हात जाण्यापासून थांबवतो. आज ऊन फार जास्त आहे असे म्हणून सूर्याकडे सारखी तक्रार सुरु असतें. अलीकडे मजुरांना बघितलं तर, ते या कडक उन्हातही काम करताना दिसतात कारण त्यांना सवय झालेली असतें. त्रास होतो म्हणून उन्हात जाऊ नये किंवा फिरू नये हा जर विचार केला, तर मला हे कडक ऊन कसं अनुभवयाला मिळेल?. जेव्हा सूर्य स्वतः जळून या संपूर्ण पृथ्वीतलावर उजेड करतो, मग आपण या उन्हाला का भ्यायचं?. या विचाराने आम्हा सर्वांचं जेवण झालं कि, आम्ही तिघेही भर उन्हात फिरायला निघतो. त्यात उमेशचंद्र सर, अभिलाष दादा आणि मी. जितके चटके लागतात उन्हाचे त्यापेक्षा कितीतरी पटीने उन्हात फिरायची मज्जा आहे हे आम्हाला आता माहिती आहे. हसत हसत गप्पागोष्टी करत चालताना, मंद हवेने हलताना झाडांच्या पाना-फुलांकडे बघायचं. सामान्य किंवा गरीब काकांना मदत व्हावी या विचाराने, हिराव्यांकंच झाडांच्या गर्द सावलीत, रस्त्याच्या बाजूला टपरी वरील, उसाच्या गाडीजवळ येऊन थांबायचं. ऊस वाल्या काकांची तर मज्जाच व...

हसणं

हसणं काय असतं? हसणं जे नाती जपायला शिकवतं.. हसणं जे नाती बनवायला शिकवतं.. हसणं जे दुःख विसरायला शिकवतं.. हसणं जे सौंदर्य वाढवतं.. हसणं जे मनाला आनंदी आणि प्रसन्न ठेवतं.. हसणं जे उत्साह वाढवतं.. हसणं जे सकारात्मकतेची ऊर्जा देतं.. हसणं जे आयुष्य जगायला शिकवतं.. हसणं तर खरंच कमाल आहे, जेव्हा फक्त दोन सेकंदाच्या हसण्याने आपला फोटो छान येतो तेव्हा विचार करा दररोज हसण्याने आयुष्य किती सुंदर होईल..!

गर्दी कि माणुसकी

काही दिवसापासून बसमध्ये गर्दी असल्याने घरी जाणं माझं ऑटोने असायचं. पण का कुणास ठाऊक आज बसने जायची इच्छा झाली. बस आली, बसमध्ये एकपण सीट नाही आणि वरून उभे राहणाऱ्यांची पण गर्दी फार. या दाटीमुळे माझा चेहरा हिरमुसला पण रोज जाणाऱ्या काकांचा चेहरा थोडासा पण चिमला नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. "बेटा आप इधर हो जाओ" असं म्हणतं त्यांनी मला उभं राहायला जागा दिली. ते म्हणाले, "एकदा माणसाला सवय झाली कि मग त्रास जाणंवत नसतो. त्यांच्या या बोलण्याने मी पण सहमत झाले कारण, कधी-कधी साध्या गोष्टी साध्य करण्यासाठी पण खूप कष्ट करावे लागतात. मग का म्हणून वेडेवाकडे चेहरे बनून करायचं, हसत हसत करायचं, असच मला त्या काका कडून समजलं. या गोष्टी व्यतिरिक्त आणखी एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे, एका म्हाताऱ्या आजोबांना, एका तरुण मुलाने स्वतः उठून त्यांना बसण्याकरिता सीट दिली. तरुणांमध्ये ताकद तर असते पण दयेचा सागर ही हवा. बसमध्ये दोन सीट वर तिघांना बसतानाही बघितलं. हे सगळं बस मध्ये बघून वाटलं कि माणसांसाठी माणसांना लागणारी माणुसकी वाढत चालली आहे.

गुण प्रत्येकाचे

प्रत्येकामध्ये निरनिराळे गुण असतातच. त्या गुणामुळे मैत्री, आनंद आणि नाती टिकून राहते. माणसांमधील चांगले गुण माहित करून घेण्याच्या प्रयत्नात मला माझा आयुष्यात फार चांगली माणसं मिळाली आहेत. आणि माझ्या ऑफिस मधील मंडळीची तर गंमतचं वेगळी. प्रत्येकामध्ये भरभरून गुण भरलेले आहेत. त्यातील जे गुण मला त्यांच्यात आवडलेत ते सांगायला मला नक्कीच आवडेल. आजू बाजू कोणीही असो पण एकाग्रतेने काम करणारी ती हर्षल.. हो तर हो आणि नाही तर नाही असे, स्पष्टपणे सांगणारे अमोल दादा.. सगळे शांत असताना, एखाद प्रश्न विचारून, चेहऱ्यावरती हसू आणणारे अभिलाष दादा.. बिंदास अशी वैष्णवी.. शांततेत हर्षाने विचारांना सहमत देणारी अमृता ताई.. मोठी असतांनाही छोटी दिसणारी आणि आवडीने माझ्याकरिता सुगंधित फुलं आणणारी शिवानी.. सकारात्मक्तेचे धडे शिकवणारे संतोष सर.. सगळ्यांना मिळावं म्हणून सगळ्याची काळजीपूर्वक काळजी घेणारी प्रतीक्षा मॅडम.. उत्तम मार्गदर्शक आणि कितीही मोठी जबाबदारी डोक्यावरती असताना, स्वतः हसून दुसऱ्यांना हसविणारे उमेशचंद्र सर.. काही क्षणासाठी का होईना पण कामातून वेळ काढून, आम्हाला वरती येऊन भेट देणारी शालू म...

नकळत जुळलेली मैत्री

बोलक्या स्वभाव असणाऱ्या माणसांची नाती सहजतेने जुळत जाते. मग अनोळखी व्यक्तींशीही घट्ट नातं जोडलं जातं. आणि माझ्याही बाबतीत काहीतरी असच घडलं असावं. कधी कोणी मदत केली म्हणून तर कधी कोणाला मदत केली म्हणून, अशीच ती नाती बनत जातात आणि मैत्री होत जाते. अनोळखी मैत्रीच्या सहवासात कधी मोलाचा उपदेशही मिळतो. अशीच मैत्री आणि मित्र-मैत्रिणींची साथ मागील काही महिन्यांपासून मला मिळत चालली आहे. पायी जात असताना,'चल बस कि गाडीवर' म्हणणारी अबोली, मुलीप्रमाणे जपणारे आणि त्रास होऊ नये म्हणून ऑफिस पर्यंत सोडून देणारे काका, बसमध्ये किंवा ऑटोत बसले असताना सारखे माझ्यासोबत गप्पागोष्टींचे खेळ रंगवणारे अंकिता आणि प्रियंका. आणखी काही अनोळखी मित्र-मैत्रिणींची भेट सतत होत असते मात्र त्यांचं नाव विचारनं राहून जातं किंवा सांगितलं असतानाही मी विसरून जाते. ही अशी माझ्यासोबतची अनोळखी मैत्री काही काळापूर्ती राहणार हे ठाऊक असताना सुद्धा मला फार मोलाची वाटते.

रम्य हा पाऊस

गडद निळेशार आभाळातुन पावसाचे पाणी हळू हळू पडायला सुरुवात झाली. पावसाचा वेग वाढत होता आणि मधेच कमी व्हायचा. जसजशी माझी पाऊलं रस्त्यावरून पुढे पुढे जातं होती तसतसा हा पाऊस मला वेगवेगळा भासू लागला. कधी वाटलं झाडाच्या पानांवरून टिपटीप बरसणारा हा पाऊस.. तर कधी तापलेल्या धरणीला शीतल करणारा हा पाऊस.. कधी रस्त्यावर ओला सडा शिंपणारा हा पाऊस.. तर कधी मातीला ओलावा देऊन सुगंध चोहीकडे दरवळणारा हा पाऊस.. कधी जोरात पडून वाचण्यासाठी लोकांना पळवून लावणारा हा पाऊस.. तर कधी हलके पडून स्वतःचा नादात बेधुंद करणारा हा पाऊस.. खरंतर नजरेच्या स्पर्शामधूनी आणि नाजुकशा हसण्यामधूनी हा पाऊस मला बावरणारा, सवारणारा आणि अंगावरती गोडं शहारे आणणारा वाटतो. जितकं कौतुक करावं या रम्य पावसाचं तितके माझ्यासाठी कमीच!

कॉफी वाली यारी

दिवसभर काम करून संध्याकाळी निघण्याची तळमळ सुरु होते. त्याही दिवशी होतीच पण डोक्यावरती कामाचा तणावं जरा जास्त होता. आणि मग काय, "चल हर्षु कॉफी". पाच मिनिटांमध्ये सर्वकाही आटोपून कॉफी मशीनजवळ पोहोचायचं. मग दोन कपामध्ये कॉफी भरून कधी तिने मला तर कधी मी तिला द्यावी. कॉफी पीत आमच्या गोष्टींचा खेळ रमायचा. कामाचा तणावं विसरून नवीन विचारांना सुरुवात व्हायची आणि डोक्यावरती काळजीचं साचलेलं आभाळ ओठांवरती हसू बनून उजळायचं. कॉफी सोबत दहा मिनिटं घालवताना आमची "कॉफी वाली यारी" घट्ट होत चालली आहे.

नवी नवलाई

आज पुन्हा हे सगळे नवे वाटले, उमलून आलेली ती नवी फुले, रोज धरणीवर पडणारी सूर्याची नवी किरणे.. जुन्या क्षणांना नवी बनवणारी कल्पना, नव्या दिशेस वाहणारा नवा वारा.. नकळत रुजणारे नवे क्षण, हरवून बेभान होणारे नवे मन.. निळ्याशर नभात उगवणारा नवा चांदवा, उन्हात हलका मिळणारा नवा गारवा.. नवी उंच भरारी घेणारे नवे पक्षी, नव्या आभाळात नवी ढगाची नक्षी.. नव्याने चमकणारी नवी रातचांदणी, नव्या पाऊलवाटेवर नव्याने चालणारे पाय दोन्ही.. नवी नाती नवी धुंद, नवा रंग नवा बेधुंद.. नवा ऋतू नवा भास नवा हर्ष, नवी मैत्री नवं प्रेम नवा स्पर्श.. नवी शाई नवा कोरा कागद, नव्या शब्दासवे नव्या कवितेचं, कोऱ्या कागदावरती स्वागत..

चिंब ओले होताना

कडक उन्हाच्या दिवसात पावसाची एखादी सर धरणीवर पडली कि मन अगदी आनंदाने न्हाऊन निघतं. आज सांजवेळी या पावसासवे जात असताना मला थंडगार वाऱ्याचा स्पर्श आणि मातीचा सुंदर सुगंध अनुभवास मिळाला. रस्त्यावरील रंगेबिरंगी फुले, पुन्हा नव्याने तवटवीत होताना या माझा छोट्या डोळ्यांना दिसली. आणि ओल्या वाटेवरून चालताना, मनात ओलावा असणारी माणसं भेटली. मग काय रंगला खेळ तो या पावसाचा कौतुक करणारा. त्याच्या कौतुकाला तर पारावार नव्हताच. जणू मला तर वाटायला लागलं कि, नभातील पडणाऱ्या गार पावसाने आणि त्याच्या प्रत्येक थेंबाने मन, डोकं आणि शरीर चिंब चिंब भिजवलंय.

संस्काराचे बीज..

आज पुन्हा एकदा ती आई जवळ व्यक्त झाली. "आई कुणालाही त्रास न देता जेव्हा लोकांकडून वाईट वागणूक आणि वाईट बोल लावले जातात तेव्हा मनाला फार वाईट वाटतं गं" यावर तिची आई तिला कवेत घेऊन म्हणाली, "अरे बाळा, कुणी आपल्याशी कसंही वागले तरी सगळं विसरून त्यांच्याशी चांगलं वागणं हे आपलं कर्तव्य. शेवटी माणसानेच माणसाला जपायला हवं ना! वाटेत आलेल्या सगळ्यांना आपलंस करन शिक. तेव्हाच तू सगळ्यांचं मन अगदी सहजतेने जिंकशील."

काही नवे ते शिकावे

आज सुंदर एक मातीचा किल्ला तिने बनविला. मैत्रिणीला जेव्हा तिने तो किल्ला दाखविला तर तिच्या मैत्रिणीने तिला चिडवत, तो किल्ला मोडला. हे बघून ती रागे भरली आणि रडत आईजवळ गेली. आईला म्हणाली, "आई माझा किल्ला मोडला गं तिने आणि मला तिचा खूप राग येत आहे." त्यावर आई म्हणाली, "बरं बाळा, त्यात काय एवढं रागे भरायचं?". मग ती म्हणाली,"आई एखादी मनापासून बनवलेली गोष्ट जेव्हा आपल्या देखत मोडेल तर, राग तर येणार कि. आई तुला कसचं का कळतं नाही?". आई म्हणाली, "मग सांग बघू, पावसाच्या टीप-टिपत्या पाण्याने हा जर का तुझा आवडता किल्ला मोडला असता, तर तू काय केले असतें. पावसावर पण रागावली असती का?". ती हसत म्हणाली, "टीप टीप बरसणारा पाऊस माझा खूप आवडीचा आहे आई. आणि का उगाच त्यावरती रागावले असतें!". आई म्हणाली,"अगदी बरोबर. एखादी मनापासून केलेली गोष्ट जेव्हा हातून निघून जाते तेव्हा रागे भरून किंवा रडत बसून चालत नसतं, तर त्यातून नवं काही शिकायचं असतं". आईचे हे ऐकून माझं मन समाधानाने हसतमुख झालंय.

फुलांचं कौतुक

फुले छोटेसे असले तरी त्यांच्याकडून मिळणारी शिकवण मात्र मोठी. फुलं दिसायला फार सुंदर नि नाजूक असतात पण त्यांच्या सुंदरतेपेक्षा त्यांचा सुगंध दरवळणाऱ्या गुणांचं कौतुक केल्या जातं. फुलांना माहित असतं कि या एवढ्या कडक तापलेल्या उन्हात, ते नक्कीच चिमतील पण तरीही नव्याने बहरणे ते कधीच सोडत नाही. जेव्हा आज मी प्रयत्न करून थकले होते, तेव्हा या फुलांनी मला त्यांच्यासारखं बहरणं शिकवलं आणि सतत चांगल्या गुणांचा सुगंध दरवळत कौतुकास्पद होण्यास सांगितलं.

कधी वाटतं..

वाटतं कधी इवलंस चिमुकलं फुल बनावे.. कधी वाटतं या हालक्या फुलक्या ढगांच्या रंगात रंगावे.. कधी वाटतं झाडावरती बांधलेल्या झुल्यावर बसून उंच झोके घ्यावे.. कधी वाटतं गायकांच्या आवाजात सुरु मिसळूनी नाद मनाला लावावे.. कधी वाटतं टपरी वरचा बर्फचा गोळा खाऊन जीभ-ओठ, चक्क काळे-लाल होऊ द्यावे.. कधी वाटतं कागदाची रंगीत भिंगरी विकत घेऊन, तिला वाहत्या वाऱ्यासंग भिडवावे.. खरं म्हणजे खूप सुंदर आहे हे जगणं, जगले तरी अजून जगावेसे वाटते..!!

जिंकणे आमचे कि सर्वांचे

आज लहानपणीप्रमांणे मी आणि दादू म्हणजे माझा लहान भाऊ आई-बाबां बरोबर खेळलो. खेळ तो आमचा आवडता लगोरीचा. एका गटात आईबाबा आणि एका गटात आम्ही दोघे. आम्हा दोघांना पुरेपूर विश्वास होता कि जिंकणार तर आम्हीच. आणि आईबाबांना कदाचित स्वतः पेक्षा आमच्यावरती विश्वास होता. मग काय खेळण्याची रंगीन जादू सुरु झाली. आणि हा खेळ कसा पटकन संपला कळलं सुद्धा नाही. जिंकल्यानंतर आम्ही आईबाबांना हसत खेळत आणि खरंतर चिडवत म्हणालो, "आई बाबा आम्ही जिंकलो आणि तुम्ही मात्र हरले". तरीही आईबाबाच्या चेहऱ्यावर आनंद आमच्यापेक्षाही दुप्पट पटीने दिसत होता. आमच्या चिडवाण्यावर त्यांनी खूप सुंदर प्रतिसाद दिला, "माझी लेकरं जिंकली तर आम्ही पण जिंकलोच कि". या त्यांच्या शब्दाने सगळ्यांच्या मनावरती फक्त जिंकण्याच आदर्श समोर आणलं. आणि आम्ही दोघेही हसत मोठ्याने ओरडत म्हणालो, "या अर्थाने तर आपण चौघेही जिंकलो" म्हणजे हे जिंकणे फक्त आमचे नाहीतर सर्वांचे आहेत.

आईच मागणं

आई आपल्या लेकरांना कधीच अंतर देत नाही. जिवंत असेपर्यंत तर नाहीच. लेकरांना आपल्या डोळ्यादेखत झालेला त्रास तिला कधीच पाहवत नाही. जणू काही मोठं झाल्यानंतरही तिच्या लेकरांचा सारा भार तिच्याकडे असावा असच तिला वाटत असावं. मी संस्काराने आणि कर्तृत्वाने घडवालेल्या लेकरांना, मी नाही जपायचं तर कोण रक्षण करेल? हा प्रश्न तिचा तिलाच सारखा पडत असतो. याच भावानेने मग नभाअंगणात जरी चंद्र-तरका निरोप द्यायला आलेत तरी ती, मोठ्या ताठ मानेने उभी राहून त्याकडे मागणं करते, "मला स्वर्ग नकोय, मला माझा लेकरांचं रक्षण हवंय".

आई नावाची भावना

मन अधीर असल्याने आईकडे निमूटपणे येऊन बसले.आईला सहज कळलं कि आज माझा बाळाला काहींतरी झालाय ते. मग तिने स्वतःची काळजी बाजूला ठेऊन मला कसं हसवता येईल आणि माझ्यासाठी माझा आवडीचे पदार्थ बनवायला सुरुवात केली. थोड्या वेळात जेव्हा मनाने धीर धरला तेव्हा मी आईला म्हणाली, "आई तू किती छान आहेस गं, किती जपतेस आम्हा सर्वांना". आई म्हणाली, " आई आणि बाळाचं अतूट नातं असतं, मग का नाही जपणार". मी हसले आणि म्हणाले, "आई आज मला दोनदा गाजर हलवा खायला भेटला. पहिला मैत्रिणीच्या आई ने आम्हा दोघींसाठी पाठवलेला आणि दुसरा आता तू खास माझासाठी बनविलेला". आई म्हणाली, "तू त्यांना आपल्या मुलीसारखी आहेस ना म्हणून तुझ्यासाठी पण त्यांनी पाठविला. बघितलं तुला किती आई आहेत ते. मी म्हणाले, "आई वेडी आहेस का जरा, हे बघ मला एकच आई आहे आणि तेही तूच". यावर आई ने फार सुंदर बोल माझापुढे ठेवले, "बाळा आई हे फक्त रक्ताचं व्यक्तिगत नातं नसतं, तर आई ही पवित्र सुंदर अशी भावना आहे" हे तू कधी विसरता कामा नये. खरंतर आता आई शब्दाचा अर्थ उमागतोय असं वाटतंय.

हसू

आकाशातील चंद्राकडे काही वेळ सतत बघितलं कि मन अगदी शांत होतं. त्यादिवशी अस्वस्थ मनाने रस्त्यावरून चालत जात होते. रोजप्रमाणे आकाशाकडे बघितलं तर चंद्र तिथे नव्हता. मी मनात म्हणाले, "जेव्हा दिसायच तेव्हा दिसत नसतो आणि जेव्हा नकोसा वाटतो तेव्हा मात्र दिसतो". तेच थोड्या वेळाने चंद्र ढगामागून बाहेर हळू हळू आला. वाटलं या आकाशाने माझी तक्रार एकली कि काय?. मग काय पुढे चालत जायचं नि चंद्राकडे अधून मधून बघायचं. एवढंच माझही सुरूच. चंद्र ढगामागे लपयाचा आणि पुन्हा बाहेर यायचा. हा लपंडावं त्याने सुरूच ठेवला तेही मी हसेपर्यंत. मग काय त्याचं हा खेळ बघून माझं हसूच थांबेना. आता अस्वस्थ मन आनंदाने इतके हसायला लागले कि पोटात गुदगुदल्या व्हायला लागल्या. चंद्र आणि ढगाचा लपंडाव खेळ बघून कधी तुम्हीही हसला असाल!.. हो ना?

आई बाबा आणि मी

सकाळच्या प्रहरी चिमण्यांची पिल्लं झाडावरती, जेव्हा सारखी चिवचिवाट करत होती तेव्हा आईला मी प्रश्न केला. "आई ही पिल्लं एवढी चिवचिवाट का करत आहे ग?" त्यावर आई म्हणाली, " त्यांचे आई-बाबा त्यांना सोडून गेलेत ना म्हणून". मी म्हणाली, "बाबा खरंच त्या पिल्लांचे आई-बाबा कुठे गेले असतील? आणि आपल्या पिलांना सोडून त्यांना जावं तरी कसं वाटलं असेल?". त्यावर बाबा म्हणाले, "जगण्याचा खरा अर्थ या पक्षांना उमगला म्हणून तर त्यांनी आकाशात उंच भरारी घेण्यासाठी या पिलांची साथ सोडली. माणसाप्रमाणे पक्षीही त्यांच्या पिलांसाठी उन्हा-तान्हात फिरत असतात. त्यांचं पोट भरावे म्हणून इकडे तिकडे अन्नाचा दाना शोधतात. आणि एकदा का पिलांच्या पंखांना बळ आलं कि ते त्याना उंच आकाशात फिरायला मोकळे करतात." त्यावर माझा दुसरा प्रश्न पुन्हा उभा, "मग आपल्या पिलांना सोडून जाताना त्यांना काळजी किंवा भीती नाही वाटली कि आपली पिल्लं आमच्याविना कसे जगतील ते?" त्यावर आई म्हणाली, "काळजी असेल ना, पण कधी कधी पिलांच्या भल्यासाठी माय-बपांना मन कठोर करावे लागतात." माझा प्रश्नांना मा...

सहकार्य

जगात विविधरंगी स्वभावाचे माणसे तर आहेच पण त्यांच्यात गुणही तितकेच विविधरंगांनी निखळपणे भरलेले आहेत. रोज माणसांना कोण, कसली, कुठली हे माहीत नसताना इतरांपेक्षा वेगळी आणि चांगली कामे करताना बघून मन आनंदाने भारावून येतं. आजही असला आनंद मी अनुभवला. छोटीशी ती मुलगी पण मन मात्र फार मोठं. मातीत खेळताना एक मुंगी तिला लाकडाच्या काडीवर चढताना दिसली. इतर सगळ्या मुंग्या काडीच्या टोकावरती येऊन पोहोचल्या होत्या. आणि ही मुंगी मात्र चढायची आणि घसरून खाली पडायची. ही क्रिया सारखी घडत असल्याने त्या मुलीला दया आली. तिने खाली पडलेल्या झाडाचे एक पान उचललं आणि त्या पानावरती मुंगीला घेतलं. आणि त्या मुंगीला त्या लाकडी काडीच्या टोकावर पोहोचवलं. मी हे सगळं दुरून बघत होते मग जवळ जाऊन कौतुकाने तिला विचारलं. " हे काय केलस ग?" त्यावर ती म्हणाली, " ती एकटीच होती ना खाली, मग मी तिला तिच्या मैत्रिणीकडे पोहोचवलं. आता ती तिच्या मैत्रिणी सोबत सहज खेळू शकेल". खरंतर प्रसंग फार छोटासा पण त्या मुलीने लाखमोलाची शिकवण दिली. दुसरा प्रसंग घडला तो ऑटोमधून घरी परतांना. सवारी म्हणून काका काकू ऑटोमध्ये बसले. स्ट...