आज लहानपणीप्रमांणे मी आणि दादू म्हणजे माझा लहान भाऊ आई-बाबां बरोबर खेळलो. खेळ तो आमचा आवडता लगोरीचा. एका गटात आईबाबा आणि एका गटात आम्ही दोघे. आम्हा दोघांना पुरेपूर विश्वास होता कि जिंकणार तर आम्हीच. आणि आईबाबांना कदाचित स्वतः पेक्षा आमच्यावरती विश्वास होता.
मग काय खेळण्याची रंगीन जादू सुरु झाली. आणि हा खेळ कसा पटकन संपला कळलं सुद्धा नाही. जिंकल्यानंतर आम्ही आईबाबांना हसत खेळत आणि खरंतर चिडवत म्हणालो, "आई बाबा आम्ही जिंकलो आणि तुम्ही मात्र हरले".
तरीही
आईबाबाच्या चेहऱ्यावर आनंद आमच्यापेक्षाही दुप्पट पटीने दिसत होता. आमच्या चिडवाण्यावर त्यांनी खूप सुंदर प्रतिसाद दिला, "माझी लेकरं जिंकली तर आम्ही पण जिंकलोच कि".
या त्यांच्या शब्दाने सगळ्यांच्या मनावरती फक्त जिंकण्याच आदर्श समोर आणलं.
आणि आम्ही दोघेही हसत मोठ्याने ओरडत म्हणालो, "या अर्थाने तर आपण चौघेही जिंकलो"
म्हणजे हे जिंकणे फक्त आमचे नाहीतर सर्वांचे आहेत.
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!

Comments
Post a Comment