Skip to main content

Posts

Showing posts from 2020

सत्काराचे सोहळे..!!

माझ्या हातांनी मी माझा सत्कार केला, आलेल्या सत्काराला मी जेव्हा नकार दिला..! सत्कारासाठी कारण तसे बिलकुल लागत नाही, गल्लीभूषण, आळीभूषण हल्ली चालते काही..! सत्कार झालेले महात्मे दोन बोटे वरून चालतात, प्रसंगी देवाला सुद्धा  तू कोण,विचारात..! हल्ली जग हे देखाव्याचे विनासायास मोठे होण्याचे, आरश्यात स्वतःला बघताना आंधळ्या प्रेमात पडण्याचे..! स्वतःला स्वतःची लाज वाटण्याची दिवस संपले, कितीही भ्रष्ट झाले तरी फीत कापायला पहिले..! संपायला हवेत हे सत्कारांचे वृथा सोहळे, शोधायला हवेत खरे नात्यांमधले धागे कोवळे..!

सुख - दुःख..!!

असंच एकदा सुख माझा घरी आलं, मी त्याचं हसतमुखाने स्वागत केलं कोपऱ्यात सामान ठेऊन म्हणालं, मुक्कामालाच आलोय... सुखगमनाची वार्ता सगळीकडे पसरली, त्याला भेटण्यासाठी, त्याला पाहण्यासाठी, आशीर्वादासाठी सर्वांचीच रांग लागली, ओळखीचे आले, पाळखीचे आले, शेजारी आले, पाजारी आले, नातं असणारे आले, नातं सांगणारे आले, नातं गाजवणारे आले, नातं जपणारे आले, नातं दुरावलेलेही आले, सर्वांना सुखाला भेटायचं होतं, त्याला आपल्या घरी बोलवायचं होतं... मी म्हणाली सुखाला, आलास बरं वाटलं, सुख म्हणालं, बस एवढंच, आनंद नाही झाला? मी म्हटलं, त्यात काय तू येणारच होता, सुख म्हणालं, तुझं हेच मला आवडतं, आलो म्हणून उन्माद नाही, मला डोक्यात जाऊ देत नाहीस, सुखासह काळ फार छान जात होता, एक दिवस सुख म्हणाले,  आता जरा बाहेर फिरून येतो, तुझ्या सोबतीला सावत्र बंधूला पाठवतो... थोड्याच वेळात दाराची घंटी वाजली, हसत दुःख दारात उभं होतं, विचारलं आता येऊ का? मी दारातून बाजूला झाली, म्हटलं ये आता आत, आता मात्र दुःख प्रसन्न हसलं, हसून म्हणालं, खात्री होती तू आता ये म्हणशील याची, दुःख आलं, खुर्चीवर टेकलं, मी म्हणाली बस, दमला असशील... ते म्ह...

पाऊस ...!!

आला पर्जन्याचा काळ। बरवे उत्साह सुकाळ।। ग्रीष्मातले सर्वे आळोखे। देऊनि मिटले, सर्व पिळोखे।। आळोखेपिळोखे देऊन कसा तरी लोटायचा ग्रीष्म काळ संपून उत्साहवर्धक पर्जन्याचा काळ येतो. त्याच्या सुगंधाने तो आल्याची चाहूल लागते. वाजत गाजत सडे शिंपडीत, अत्तर उधळीत पर्जन्य ऋतू येतो. आकाशापासून धरतीपर्यंत संपूर्ण वातावरण आणि त्यातील चराचर व जडाजड सर्व प्राणिमात्र त्याच्या स्वागताला तयार असतात. महाराष्ट्रातील जुन्या पिढीतील श्रेष्ठ कवयित्री शांता शेळके यांनी आपल्या लेखणीने या पर्जन्याचे गोडवे गाऊन आपल्या शब्दांच्या हिंदोळ्यावर मराठी रसिकांना झुलविले आहे. पाऊस आला वारा आला। पान लागले नाचू। थेंब तपोरे गोरे गोरे। भर भर गारा वेचू। अवकाळी पाऊस अंगतुकासारखा येतो. हवामान खात्याचे अंदाज चुकवत तो स्वतःच काढलेल्या मुहूर्तावर येतो.  बेसावध असलेल्यांना आपल्या धो धो सरींनी चिंब भिजवून काढतो. अशा अवेळी आलेल्या पावसावरील आपलाही राग क्षणभरातच निवळतो आणि आपणही त्याचा आगमनाचे स्वागत करतो. ग्रीष्माने झालेली अंगाची लाही संपण्याचा आनंद. पण अवकाळीच तो. ग्रीष्म म्हणतो माझा वेळ अजून संपला नाही आहे. तू कशाला आलास? ग्रीष्...

गुरू आणि गुरुदक्षिणा..!!

भारतीय संस्कृतीत संत व गुरू परंपरा सर्वात श्रेष्ठ आहे.  आपण सर्वजण आहोत ते आपल्या आईबाबांमुळे. ते दोघेही आपले प्रथम गुरू आहेत. ते जन्मापासून ज्या प्रेमाने आपले लालन पालन करतात. सर्व प्राथमिक अवस्थेत मदत करतात.  चालायला बोलायला शिकवतात. आई व बाबा दोघांचेही त्यात सारखेच योगदान असते. आई आणि बाबा आपल्या मुलांचे अहित कधीच करीत नाही. त्यामुळे या दोघांनाही सारखाच दर्जा असतो. मुलांना शिस्त, धाक, नकळत बाबांमुळेच असतो. आपला मुलगा/ मुलगी खूप यशस्वी व्हावी, याकिरता बाबा पण खूप कष्ट करतात. त्यांचे वागणे, सवयी, बोलणे, याचा नकळत मुलांवर परिणाम होत असतो. ते आपल्या मुलांसाठी रोल मॉडेलच असतात.   तर आई सारखे दैवत दुसरे या जगात नाही. आईबाबांचे ऋण आपण फेडूच शकत नाही. त्यामुळेच  आपल्याकडून त्यांना अपेक्षित असलेली त्यांची स्वप्ने पूर्ण करणे ही त्यांच्याप्रती आपली गुरुदक्षिणा होय. व्यक्तीच्या वयानुसार त्यांचे विश्व बदलते. समाजात वावर वाढतो. व्यवहार ज्ञान देणारे शिक्षक हे त्याचे गुरू होतात. आईबाबांनी आपल्या पंखांना बळ दिले असते मात्र उडण्याची क्षमता गुरुजी देत असतात. शाळेचे शिक्षक अनेक विषया...

सकाळ वर्णन..!!

आकाशातील तारे हळूहळू अदृश्य होऊ लागले. एखादाच प्रभावी तारा आपले तेजस्वी अस्तित्त्व दाखवीत होता. पण, एकंदरीत मावळतीचे वेध त्यांना लागले होते. पूर्वेकडचे आकाश आता विविध रंगांनी उधळून निघाले होते. एखाद्या चित्रकाराने , आडवे तिडवे फटके आपल्या कॅनव्हासवर मरावेत त्याप्रमाणे क्षणाक्षणाला पहाट दृश्य बदलत होते.  बघता बघता पूर्व क्षितिजाची कडा सोनेरी होऊ लागली. गुडूप दडलेल्या परिसराला हळूहळू जाग येत होती. पक्षांच्या किलबिलाटाने झाडांनाही जाग आली होती. आता सूर्य बराच वर आला होता. पूर्वेकडील तेजस्वी क्षितिज आपले अस्तीत्व क्षणाक्षणाला विस्तारित होते!!!

श्रावण..!

जाता जाता आषाढाने घातली सुरेल साद... हलकेच झेलून घेत श्रावण देऊन बसला प्रतिसाद... तुषार्त धरेला हवा होता चिंब पाऊस धुव्वाधार काळ्या ढगांच्या पखालीतून... तेव्हा आषाढही कोसळला घनघोर... हिरव्या शालूसवे आता वसुंधराही सजली आहे... रिमझिम सरींची आस श्रावणात तिलाही आहे... मनभावन हा सावन मांगल्य देण्या येतो... जगण्याच्या परावरती ऊनसवली होऊन जातो... कुठे वेगात धबधबा... कुठे स्वच्छ तरल झरा... हिरव्या रानाचे हिरवे गुपित... जपण्या येती श्रावण धारा... यावेळी माझा रंग जरा भासतो ना न्यारा... परिवर्तन घडविणाऱ्या  करोनाचा हा प्रताप सारा...

झुक झुक अगीनगाडी...

रेल्वे प्रवास मला माझ्या लहानपणापासूनच अत्यंत ओढ लावणारा, उत्कंठा वाढवणारा असा वाटत आला आहे. 'झुकझुक अगीनगाडी' लहानपणी कोळशाचा इंधनावर चालणाऱ्या रेल्वेगाड्या फार वेगळ्या प्रवासाच्या अनुभव द्यायच्या. धूर, खिडकीतून बाहेर पाहण्याचा प्रयन्त केल्यास डोळ्यात जाणारे कोळशाचे बारीक कण आणि त्यामुळे डोळे लाल होऊन पाणी यायचे..अशा अनेक आठवणी रेल्वे प्रवासाशी निगडीत आहेत. वेगवेगळे लोक, वेगवेगळी भाषा बोलणारे, वेगवेगळ्या स्थानकांवर उतरणारे आणि चढणारे.. कधी सहकूटुंब प्रवास करणारे तर कधी एकट्याचाच प्रवास.. मधेच येणारे विक्रेते तर कधी चेकिंगसाठी अचानक चक्कर टाकून जाणारे रेल्वे सुरक्षा दल. प्रत्येक प्रवास एक वेगळा अनुभव देणारा असतो. मला प्रवासात रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंनी दिसणाऱ्या गोष्टी पाहायला फार आवडतात. शेत, रस्ते, नद्या, पूल आणि बरंच काही. प्रवासाचा अन्य कोणताही प्रकार रेल्वेच्या प्रवासाइतका वेगळा भारत- नजीक नेऊ शकणार नाही. रेल्वे प्रवास दरम्यान आपण जे काही पाहतो ते अवर्णनीय असते. भारतातील रेल्वेचा प्रवास आपणाला आपल्या संस्कृतीचा, आपल्या लोकांच्या आणखी जवळ घेऊन जातो. सोबत ...

आभाळ आणि बाबा....

प्रत्येकदा कवितेत लिहिलेला शब्दांचे अर्थ तेच असतात असं नसतं. जर कवितेत पृथ्वी हा शब्द रेखाटला असेल तर त्या पृथ्वीची तुलना आईशी पण होऊ शकते. तसेच आपल्या बाबांची/ वडिलांची तुलना मी पावसात दाटलेल्या आभाळाशी करते आहे.   लहानपणी आपल्याच बाबाला भिणारी मी आज डोळे वर करून नजरेशी नजर मिळून बोलत आहे. लहानपणी रागवणारा माझा बाप आज मायेच्या प्रेमाने विरघळत आहे. तर कविता सुरु करतेय.. गच्च काळ्या ढगांनी भरलेलं काळंकुट्ट आभाळ, भीती वाटते त्याची कधी कधी, पळणार तरी कुठे आपण त्याच्यापासून, त्याने डोळे उघडले तर, लक्ष-लक्ष एकदाच? फोडून काढलं तर,  पावसाच्या चाबकाने विजेचा तिसरा डोळा भयकरी रागामध्ये, आमीत लपेटून टाकेल आपल्याला? त्याच्या डोळ्याला डोळे भिडवायची काय, मान वर करून पाहण्याची सुद्धा हिंमत नाही, सृष्टीच्या आतलं काहूर जाणवत असतं खरंतर... जीव मुठीत धरून आपलं क्षुद्र जगणं जगत राहणे, एवढच आपल्या हातात, तिची इच्छा असते आपला संवाद व्हावा आभाळाशी, पण तीही मुक्याने आपलं कडू सत्य पचवत राहते, आतले कढ आतच दाबत राहते, हळूहळू अंतर वाढतं, वाढतच जातं, क्रांती करायला लागतं मन वा...

बदल गरजेचा आहे..

ज्या समाजाला आपण आपलं मानतो त्या समाजातले काही जण वेड्यासारखे वागतात. एक साधं उदाहरण घ्या, करोना व्हायरस चीन मध्ये धुमाकूळ घालत असताना आमच्या नागपुरातील काही फार बिनधास्त होते. म्हणे नागपुरी खर्रा करोना व्हायरस वर रामबाण उपाय आहे! गमतीचा भाग सोडला तर नागपूर मध्येच नाही तर अनेक शहरांमध्ये, खेडेगावांमध्ये खर्राचे सेवन होते. आणि मग हे खर्रावीर 'सारे विश्वाची माझे घर' समजून कुठेही थुंकतात. गाडी चालवतांना कोण कुठे थुंकेल आणि थुंकीचे तुषार कुठून तुमच्या अंगावर येतील कळणारही नाही.  थुंकणाऱ्याला मात्र त्याचे काहीही वाटत नाही.  खर्रा खाऊन बोलणाऱ्याची तऱ्हाही वेगळीच. थुंकायचही नाही आणि बोलायचही आहे. जर बोलणे महत्त्वाचे असेल तर इतका बहुमूल्य खर्रा थुंकावा लागतो किंवा गिळावा लागतो. थुंकणाऱ्याला कलाप्रेमींचा दर्जा द्यायला पाहिजे, भिंत कुठलीही असो तिथे त्यांचा कॅनव्हास असतो. बिना ब्रश आणि रंगाशिवाय चित्र रेखाटली जातात. 'इथे थुंकू नये' अश्या सल्यावरच जाणूनबुजून थुंकले जाते. 'इथे थुंकू नये' च्याऐवजी आता देवी देवतांची चित्र लावली जात आहे. तरीही यांना काही फरक पडल्याचे दिसू...

आयुष्याचं पुस्तक...!

पहिलं आणि शेवटचं पान  विधात्याच्या हातून लिहिलं जातं, मधले पानं आपल्यालाच लिहावं लागतं.... रंगीबिरंगी शाईने त्याला सुंदर रंगवायचं असतं, नकळत का होईना पण ते आनंदाने सजवायचं असतं... जोरात आलेल्या वाऱ्यामुळे पलटलेलं पान पुन्हा उघडायचं असतं, काहीतरी लिहायचं असतं पण रिकामं कधीच सोडायचं नसतं... रंगाची शाई संपल्यावर पेन्सिलनेही कधी रेखाटायचं असतं, चूक झाल्यास मोठ्या मनाने ते खोडायचं असतं... अर्धवट रिकामं असलेलं पान मन नसल्यास तसंच राहू द्यावं लागतं, कारण ते फक्त रिकामं नाहीतर शांततेचं प्रतिक असतं... ठेच लागली की शाई सांडते, वेदना वाढल्या की पाणी सांडून ती शाईच पसरते... काना-मात्रा सोबत सुवाच्छा अक्षरात एखादं पान लिहिल्या जातं, तसंच जीवनातलं आनंद असंच बहरत जातं... सुरुवातीला लिहितांना वाटतं अजून खूप बाकी राहिलं, अर्ध भरल्यानंतर वाटतं आता फक्त अर्धच राहिलं... लिहिता-लिहिता हातासारखे आपले आधारस्तंभ थकून गेलेले असतात, पण शेवटी खूप काही लिहायचं राहील म्हणून पुन्हा धीर धरतात... डोक्याची झीज, हाताच्या वेदना मनालाही कळतात, अखेर मन जीवंत असतांना हात मात्र गळून जातात...

बाबा...

आज बाबांवर खूप चिडली होती थोडी रागावली पण होती. मात्र राग शांत झाल्यानंतर वाटलं "जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेले बघू शकत नाही. परंतु एक वडीलच असतात जे आपल्या मुलाला अपल्यापेक्षा पुढे गेलेले पाहून आनंदी होतात". आईप्रमाणे वडिलांचे महत्वही जीवनात खूप महत्वाचे असते. आई-बाबा या दोन शब्दामध्ये जणू काही आपले विश्व सामावलेले आहे. जन्म देणाऱ्या आईने आपल्याला हे सुंदर जग दाखविले आणि बाबांनी आपल्याला मोठे करण्यासाठी दिवस रात्र कष्ट केले. असे म्हणतात की आईही दिव्याची ज्योत असते आणि त्याचा प्रकाश परिवाराला मिळवा म्हणून ज्योतीचे चटके सहन करणारे असतात आपले बाबा. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आई-बाबा झटतात. बाबांचे प्रेम हे निस्वार्थी असते, आपण कितीही मोठे झाले तरी त्यांच्यासाठी आपण लहानंच असतो. आपण यशस्वी व्हावे हेच त्यांचे स्वप्न असते. तेच आपल्यावर संस्कार घडवितात व जीवनात योग्य मार्गदर्शन देत असतात. लहान असल्यापासून आईच मुलांना सांगत असते. कुठे जाऊ नको, काही करू नको बाबा मारेल. शाळेत जा नाहीतर बाबा मारेल, हे करू नको, ते करू नको, बाबा मारेल. बाबांनी मारू नये म्हणून अभ्यास क...

वटवृक्ष लावूया....

५ जून जागतिक पर्यावरण दिन. नेमकी आज याच दिवशी वटपौर्णिमा आली आहे. हा चांगला योगायोग. वटपौर्णिमेला सौभाग्यवती महिला वडाच्या झाडाचे पूजन करीत त्याला प्रदक्षिणा करतात. आपल्या संस्कृतीत ही फार सुंदर परंपरा आहे. या परंपरेतील कथा काहीही असो पण आपले सर्व सण - समारंभ  निसर्गाशी जवळीक साधण्याची शिकवण देणारे आहेत. आज त्याकडे डोळस पणे बघणे गरजेचे आहे. परंपरेप्रमाणे सुहासिनी सुंदर तयार होऊन वडाच्या झाडाजवळ एकत्र येतात. त्या झाडाच्या खोडाला दोरा गुंडाळतात. प्रदक्षिणा मारतात. वटवृक्षाची मनोभावे पूजा करतात. त्यामागचा त्यांचा उद्देश एकाच की कुंकवाचा हाच धनी सात जन्मी लाभू दे. आज आहे त्या जोडीरासोबत एक जन्म काढायला जिथे ताण येतो तिथे सात जन्माचे काय घेऊन बसलात. पण आपलं सर्व परंपरेप्रमाणे चालले आहे. या परंपरेचा विचार केला तर लक्षात येईल की याचा संबंध थेट पर्यावरणाशी आहे. निसर्ग रक्षणासाठी या परंपरा आपल्या पूर्वजांनी जाणीवपूर्वक निर्माण केल्या आहेत. वड, पिंपळ, कडुलिंब ही झाडे मोठ्या प्रमाणात प्राणवायू वतावरणात सोडतात. ही झाडे जगली तर सृष्टी जगेल. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने माणसाचे वयोमान व...

कबीराशी संवाद साधतांना...

दरवर्षी जेष्ठ पौर्णिमेला म्हणजे आमच्याकडील वटपौर्णिमेला तुझी जयंती असते. पंधराव्या शतकात तू जन्माला आलास, बालपणापासून तू हिंदु धर्माची आणि मुस्लिम धर्माची चिकित्सा करू लागला. हिंदू धर्माचे लोकं तुला नास्तिक म्हणू लागले आणि मुस्लिम धर्माचे लोकं तुला काफिर समजू लागलेत. तुझ्याबाबत अनेक चमत्कारिक गोष्टी सांगितल्या जाऊ लागल्या, पण तू  लोकांना साधं-सोपं जीवन जगण्याचं तत्वज्ञान सांगू पाहत होतास... लोकांनी एक ईश्वरवाद मानावा यासाठी झगडत होता. तुझा राम हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसलेला राम होता, जो पुढे महात्मा गांधींनी सुद्धा स्वतःचा हृदयात साठवून ठेवला. पण हा तुझा एकेश्वरवाद समाजाला कळला नाही, लोक शेवटपर्यंत तू हिंदू की मुस्लिम यावरच चर्चा करत राहिले. तू संतांची, धर्मपीठांची, पुरोहितशाहीची एवढी चिकित्सा केली की संपूर्ण पुरोहितशाहीच तुझ्या विरुद्ध उभी राहिली. तू रामाला गुरू मानलं पण दुसऱ्याला स्वतःच शिष्यत्व प्रदान करून फसविले नाही. कबीरा तुझ्या विचारांचा प्रभाव हा संपूर्ण देशभर पसरला. पंधराव्या शतकात वैदिक धर्माच्या सर्व परंपरा नाकारणे म्हणजे गंमत नव्हती. वैदिकधर्म तत्वज्ञान, अल्ल...

टक्केवारीचं गणित...

मला लहानपणापासून टक्केवारीचं कोडं कधी समजलंच नाही. जे लोक कायम टक्केवारीत बोलतात, त्यांच्या बुद्धिमत्तेला खरंच दाद द्यावी लागणार. एकदा एकाला एक बातमी सांगताना तो व्यक्ती म्हणाला 'तुमची बातमी ७० टक्के खरी तर ३० टक्के खोटी आहे'. मी विचारलं कसं? त्या बातमीत तुम्ही जन्मवर्ष चुकीचे सांगितले. फक्त जन्मवर्ष चुकीचे सांगितले म्हणून ३० टक्के चूक बातमीत कशी काय होऊ शकते?. हे मला कळलंच नाही आणि हे अतिहुशार लोकं टक्केवारी कोणत्या आधारावर काढतात देवच जाणे. समजा एका डॉक्टर कडे एक रुग्ण गेला, आणि डॉक्टरांनी औषधी देऊन आठ दिवसांनी पुन्हा बोलावलं. तो रुग्ण पुन्हा तपासणीला येतो तेव्हा डॉक्टर विचारतात किती टक्के आराम झाला? रुग्ण गोंधळून सांगतो '६५ टक्के आराम आहे' मग डॉक्टर विचारतात, 'खोकला कसा आहे?' 'ठिक आहे' मग डॉक्टर पुन्हा थांबतात..आणि मग विचारतात आता. 'तो विचार करून सांगतो आता ७० टक्के'. आता हा प्रश्न आहे की टक्केवारी या रुग्णांने कशाच्या भरोशावर सांगितली आणि डॉक्टर सुद्धा टक्केवारीवर भरोसा कसा ठेवतात? 'तू आता इतके टक्के बरा झाला आहेस आणि शंभर टक्के बर...

पुन्हा एकदा माझा शिवबा हवा आहे....

सोळाव्या शतकात आजच्या दिवशी शिवनेरी किल्यावर एक तेजस्वी तारा चमकला आणि माझा राजा जन्माला आला. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व आणि शिवराज्याभिषेक जगातल्या, महाराष्ट्राच्या पैलूंशी कसं निगडित आहे, आणि त्याच प्रेरणेने बिघडणाऱ्या महाराष्ट्राच्या परिस्थितीला कसं सुधारू शकतो? हे तितकेच तातडीने, जोमाने सांगायला मला आवडेल. "विजयाची तलवार चालून गेले, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेले, आपल्या वाघ नखाने अफजलखानचा कोथडा फाडून गेले, भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामाची कारण साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊंची.. आजही आपण म्हणतो स्वर्गात गेल्यावर देवांनी झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला." "स्वतःचा मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही, आणि अशा सामर्थ्याला हरविण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही. "  हे धाडस करून दाखवणारे आपले सर्वांचे लाडके असे थोर व्यक्तिमत्त्व असणारे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण याचा अर्थ त्यांच्या नावाचा प्रत्येक अ...

Happiest Anniversary !

काका-काकू तुम्ही माझ्या आईवडिलांसारखे आहात. काकू मला आठवते ज्यावेळेला फक्त एकदा मी तुम्हाला पहिल्यांदा भेटली होती त्यावेळेला तुम्ही या नाजूकशा सुंदर चेहऱ्यावर, चांद्रकोरप्रमाणे गोडं हसणाऱ्या दिसल्या होत्या. काका तुमच्याबद्दल काय सांगायचं, तुम्ही तर माझ्या जीवनात एक आदर्श गुरुंचं स्थान पटकावलं. तुम्हा दोघांशी नकळत झालेली भेट कदाचित गजानन महाराजांच्या कृपेने झाली असावी जी आजही मला मनातून एक आपुलकीचं नातं सांगून जातं. खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं असं तुमचंही नातं, ज्यात कोणतीही अपेक्षा न करता मिळालेली गोस्ट जी सुख देऊन जाते, त्याला तोड नसते..कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशन पेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळूक जास्त सुख देऊन जाते... आज एक नवा गंध, सुखांचा, वैभवांचा आनंद धावून आलेला आहे आणि या क्षणाला एक उजाळा देतो आहे, एक नवी दिशा, नवं स्वप्न देत आहे... "आज तुमच्या जीवनाच्या एका नाजूक वळणावरती झाल्या त्या भेटीगाठी... पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात जुळून आल्या त्या रेशीमगाठी... दोन जीवांचे प्रेम भरलेल्या रेशीमगाठीत बांधलेले... अ...

निसर्ग आणि मुले..

लहान मुलांचे आणि निसर्गाचे एक अनोखे नाते असते. निसर्गातील प्रत्येक गोष्टीचे त्यांना आपसूकच एक कुतूहल असते. मुलांच्या विकासात त्यांच्या लहानपणीचे भाव अतिशय महत्वाची भूमिका बजावत असते. 'या पृथ्वीतलावावर असणारा निसर्ग हि अतिशय गुंतागुंतीची व्यवस्था आहे. मानवाने निर्माण केलेल्या कोणत्याही माशीनपेक्षा किंवा एखाद्या यंत्राणेपेक्षा हे जास्त गुंतागुंतीचे आहे. निसर्गातील हे सर्व बदल मुले संवेदनशीलतेने टिपतात निसर्गातील वैविध्य त्यांच्या नजरेत भरते. प्राणांमधील, पक्षांमधील ते मानवी आयुष्याशी संलग्न करून बघतात.' प्राणांच्या आयुष्याशीही ही मुले स्वतः तुलना करतात. त्यांचं अगदी बारकाईने निरीक्षण करतात. बदल टिपतात. विशिष्ट प्राणी ज्याप्रमाणे वागतो तसंच वागण्याचा प्रयन्तही करतात. आकलनविषयक, सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकासामध्ये या साऱ्याची भूमिका महत्वाची आहे असे संशोधनातून सिद्ध झालेले आहेत.   मुलांना निसर्गाविषयी असणाऱ्या कुतुहलातून मोठ्या माणसांनीही खुप शिकण्यासारखं आहे. "थेअरी ऑफ माइंड " हेच सांगते , 'दुसऱ्याचा मनाचा विचार करून त्याच्या मनात काय असेल, याचा अंदाज घेऊन मुल...

एकांताचा आवाज...

एकटेपण ही तशी प्रत्येकाला बिलगलेली गोष्ट आहे. अगदी रूढ भाषेत, एकटच जन्माला येणं आणि जाणं ही गोष्ट कोणालाही टाळता आलेली नाही. एखादा कितीही गोष्टीवेल्हाळ, माणसात रमणारा माणूस असला तरी काही काळापुरता का होईना एकटेपणा त्याला हवा असतोच. मनाला चिकटलेली, नको असणारी चिरकुटं या काळात तो धुवून, काढून टाकत असतो. अर्थात, ही एकटेपणाची गोष्ट एकटेपणानच संपणारी नसते. त्याला बरच काही बिलगून आलेलं असतं. शरीराचं तसं अंतर्वस्त्र, तसंच मनाचही असावं. ते व्यक्त होतांना मग प्रथा, संकेत, नैतिकता, अनैतिकतेची वस्त्र परिधान करतं. आपल्या भोवतालाला टाळून आपण जगू शकत नाही. त्याचा अर्थ हा जो काही भोवताल आहे आपल्या विचार, जगण्याची दिशा ठरवतो. आपल्या वर्तनावर एकाच वेळी अनेक दबाव असतात. काही वेळा हा दबाव नाकरण्यातून आपण वर्तन करतो तर काही वेळा तो स्वीकारण्यातून. काही प्रक्रिया तर अगदी अंगवळणी पडल्यासारखं असतात. स्वीकार-नकाराच्या पलीकडलं त्यांचं आस्तित्व असतं. ती केवळ दैहिक नसते तर तिचे रूप हे बरेचसे भावनिक,मानसिक असते. या एकांताची मुळं खूप खोलवर आपल्या मनाशी रुजलेले असतात. भंडाऱ्याच्या डोंगरात बसलेले एकटेच तुकोबा ...

घेतला वसा टाकू नका!

लहानपणीच्या काही गोष्टीचे महत्व आणि त्यातून नेमकं आपण काय घ्यायला हवं हे आपल्याला मोठं झाल्यावर कळतं. अशीच लहानपणी वाचलेली गोष्ट...'शेवटचा घाव..!' एक माणूस नेहमीप्रमाणे लाकडं तोडण्यासाठी जंगलात गेला. काही लहान लहान काड्या गोळा केल्यानंतर आणखी काही मोठ्या फांद्या तोडाव्या म्हणून एका झाडावर चढतो. कुऱ्हाडीने एका फांदीवर सपासप घाव घालण्यास सुरुवात करतो. पण त्या झाडाच लाकूड फार चिवट असतं. बरेच घाव घातल्यानंतरही फांदी तुटत नाही. हि फांदी त्याच्या धैर्याची आणि चिकाटीची परीक्षा घेत असते. आता मात्र हा हताश होतो, धीर सुटतो. हतबल होऊन निराश अंतःकरणाने रडवलेल्या चेहऱ्याने खाली उतरतो. झाडाखालीच बसतो. काय करावं त्याला काहीच सुचत नाही! तितक्यात वाऱ्याच्या एक जोरदार झोत येतो, आणि त्या झोताने त्या झाडाची चिवट फांदी काडकन तुटते आणि पडते ती नेमकी या माणसाच्या डोक्यावरच!! परिणामी तो माणूस मरतो... ही गोस्ट वाचल्यावर मनात सहजच प्रश्न येतो, जर झाडाचं लाकूड इतकं चिवट असतं की कुऱ्हाडीचे अनेक घाव घालूनही फांदी तुटत नाही. तर मग वाऱ्याच्या एका झोताने ती फांदी तुटते कशी?? प्रश्न योग्य आहे..खरंतर ती...

अस्तित्वाचा काजळकाठ !

हा काळ, जो आजकाल अनुभवत आहोत, या काळानं माणसाचं पृथ्वीवर असणं, एवढं काही महत्वाचं नाही हेच अधोरेखित केलं!असे इशारे यापूर्वीही माणसाला मिळालेले असतीलच. या जगात जे जे काही आहे ते माझ्यासाठीच आहे ही हीन वृत्ती माणसाला दिवसेंदिवस हिंस्त्र व क्रूर बनवत आहे. वेळोवेळी येणारी संकटे आणि आपत्ती यांनी गंभीर इशारे दिलेले असावेत, पण ते साफ धुडकावून लावण्याच्या तामसी वृत्तीनं माणूस अधिकच निडर नि विकृत होत आला आहे. ही पृथ्वी, इथला निसर्ग, जीव-जंतू, पशू-पक्षी नि हे अवघ चराचर, सहजीवनाच्या, सोबतीच्या मंगलमय जगण्याला आसुसलेलं असताना, माणसाने फक्त 'मी' चाच डाव टाकला. 'या पृथ्वीचा मीच मालक असा वागत राहिला. खरंतर या जगण्याच्या, जैविक शृंखलेतून माणूस वजा झाला तर, फार काही दुष्परिणाम पृथ्वीवर व्हायचे नाहीत. उलट जे होईल ते अतिशय चांगलं होईल ते इथल्या वातावरणाला अधिक समृद्ध करेल. माणसांनी जशी दोन विध्वंसक महायुद्ध घडवून आणले, तशी युद्ध जीवनसृष्टीच्या शोधात कुठेही सापडलेली नाही!' जगण्याच्या अनुकूलतेसाठी, जीव-जातीच टिकणं, नष्ट होणं हे मात्र निसर्गही मान्य करतो! सभोवतालची झाडे वेली, वृक्षराज...

अंधश्रद्धांची झाडाझडती

सुरेश पाटोळे यांची 'चोळी' ही कादंबरी वडार समाजातील सत्य घटनांवर आधारित आहे. कादंबरीचा नायक जगन हा परिवर्तनवादी आहे. त्याची आई सीताक्का ही दारूचा व्यवसाय करते, तर वडील बापू हा खाणीवर काम करतो. जगनला शिक्षणाची आवड असून तो छत्रपती शिवाजीमहाराज, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आदर्शने प्रेरित झालेला आहे. परिवर्तनवादी वाटचालीत जुन्या प्रथा-परंपरावादी भूमिकांशी लढत असतानाच त्याला, आपल्या वडार समाजातील बायका अंगात 'चोळी ' का घालत नाहीत? असा प्रश्न पडतो. इथूनच वडार समाजाला परिवर्तनाची खरी गरज असल्याचे पाहून, जगन परिवर्तनाचा प्रारंभ स्वतःच्या घरापासून करण्याचा प्रयन्त करतो. मात्र अंधश्रद्धा, अज्ञान व परंपरेवर प्रचंड भरोसा असलेला  समाज  त्याला परिवर्तनासाठी मदत, सहकार्य व साथही देत नाहीत. जगतिकीकरणाच्या या युगात नऊवारी लुगडं नसणारी बाई आता सहवारी पातळ नेसते, पण वडार स्त्री मात्र एका दंतकथेमुळे अंगात चोळी घालत नाही, या अंधश्रद्धेची त्याला चीड येते. शिक्षण ही जीवन दृष्टी असून समाजाला शिक्षणाशिवाय मुक्ती मिळणार नाही, अशी त्याची स्पष्ट धारणा निर्...

मैत्रीची शिकवण....

मैत्री हा शब्द सगळ्यांचा आवडीचा असतो. "मैत्री खूप काही शिकवते" हे कधी वृत्तपत्रातून, कधी पुस्तकातून तर कधी सुविचारातून वाचलं होतं. पण आज ते सिद्ध झालंय... माझ्या मैत्रीच्या कट्यात असणाऱ्या मित्र-मैत्रिणीने खूप काही शिकवलं... आजोबा मला नेहामी सांगायचे. "प्रत्येकाकडे खूप सुंदर गुण असतो फक्त तो शोधावा लागतो."  आणि त्याच शोधात असताना मी माझ्या मित्र-मैत्रिणीकडून खूप काही शिकली... जान्हवी - नेहमी दुसऱ्यांसाठी त्यांचा आधारस्तंभ बनून सोबत आणि पाठीशी उभं राहायचं. कोमल - कधीच मदतीसाठी नकार न देणे आणि वेळ आली कि मोठं होऊन समजूतदारपणाने वागणे. शितल - आयुष्यात नेहमी हसत, खेळत, बिनधास्त राहणं. जयश्री - भावनांना समजून शायरी करण्याची कला. प्रांजली - कधी जीवनाच्या एखाद्या क्षणाला आपण पूर्णपणे खाली पडलो तर तितक्याच खांबीरतेने त्याला सांभाळून पुन्हा झेप घेवू शकतो. जाई - कविता बनवण्याचा सुंदर गुण अबोली - संकटाच्या वेळी स्वतः जबाबदारी स्वीकारून ती योग्यरीत्या पूर्ण करणे. मानसी - उत्तम भोळेपणा असणारा गुण. ज्योती - दुसऱ्याला त्रास न देता कुठलंही काम जर का एकटीने...

Happiest Birthday Shital.......

"हे शितल कशी आहेस?" असल्या प्रेमाने हाक मारणारे आम्ही नाही आहोत. "तर आज आम्ही दोघी जोरात नेहमी प्रमाणे हाक मारू ..हे..शिते कुठ हाय ?....चल लवकर तयारी कर ...किती वेळ लावते...बापा रे बापा....जास्त लिपिस्टिक नको लावू.... कोणी मागं लागन न.. हे बघ मी तयार होऊन आली....नेहा पण अली ...व्यवस्तीत झाले केस चल आता...किती वेळ लावशील लई मस्त दिसून राहिली...चल आता.... हे तिन्ही चार्जर एकत्र टाक... ते लॅपटॉप उचल...कोमलच्या बॅग मध्ये टाक...हे घे बॉटल पकड...झालं सगळं...आपण पहिले एम बी ए डिपार्टमेंट मध्ये जावू... नंतर HOD ला भेटू...हे कोमडी खाली उतर लवकर...ये कोमल...नेहा शीतल आपण पहिले टाईम टेबल बनवू ..हे बघ तू bussiness card बनव... तू माहिती काढ...मी ग्राफ वर काम करते....कोमल रुम मध्ये आहे का कोणी...पटापट करा मुलींनो...नाहीतर ज्योती मानसी येईल आता....." अहो , इतक्या साऱ्या गोष्टी अधून मधून का होईना पण तिघींचा गोंधळ.. तिघींमिळून जगलेले क्षण किती आगळे वेगळे विचित्र, आनंदाचे होते . आज एकीचाच आनंदाचा दिवस नाहीतर तिघींचा आहे... बाहेर अंधारात आकाश सुध्दा तारांसह झगमगत आहे.. च...

प्राचीन संस्कृतीचा खजिना...

प्राचीन काळात नेमके काय घडले होते, माणसाचा जन्म होण्याआधीचे जग कसे होते आणि त्याचा शोध कसा लागला, विविध देशातील स्मारके आणि पुरातन वस्तू, इतिहासातील नैसर्गिक घडामोडी, शतकानूशतकाची आपली जुनी सभ्यता, नाणी आणि भांडी यांचा अदमास घेणे एरवी प्रयेकालाच शक्य होत नाही. परंतु संग्रहालचे एकाच छताखाली  हि सर्व माहिती आपल्याला उपलब्ध करून देत असतात.  नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालय, ज्याला 'अजबा बंगला ' असे देखील संबोधले जाते, ती वस्तू केवळ नागपूर शहरासाठीच नाही तर संपूर्ण विधर्भासाठीही अभिमानाचा विषय आहे. हे संग्रहालय १८६३ साली ब्रिटिश कालखंडात अस्तित्वात आले. मध्यवर्ती संग्रहालयाची इमारत 'व्हिकटोरियन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना' असून नागपुरातील सिव्हिल लाईन्स भागातील बिधानभवनाच्या पश्चिमेला आहे. या संग्रहालयात प्राकृतिक इतिहास आणि अलौकिक अशा जलसंपत्तीसाठी स्वतंत्र दालने राखीव ठेवण्यात आले आहे. 'सी. पी. अँड बेरार प्रांताच्या विविध भागातून गोळा केलेली हत्यारे, टेराकटोरी भांडी, स्मृतीचिन्हे, शिलालेख, नाणी, कॉपर, प्लेट्स, हस्तलिखिते, आणि पेंटींग्स , यांचा मौलिक संग्रह...

प्रत्येकाचे रूप आगळे...

उन्हाळा तापला की आंब्याचा मोसम सुरु होतो अन मग या फळाचा दरवळणारा गोड गंध आणि मधुर रस साऱ्यांचाच मोहात पडतो. यात विविधता तरी किती? जगप्रसिद्ध हापूस पासून तर गावरानी घोटी आंब्यापर्यंत ...केसर...लंगडा.. पायरी...लाडू...नागीण...! मोठे मोठे बंगले, मध्यमवर्गीय घरापासून तर गरिबांच्या झोपडीपर्यंत सरसकट लोकप्रिय असणारा बैंगनपल्ली! शेप्या, हळद्या, तेल्या, मोसंब्या, मधाळ आणि अशा विविध आंबटगोड चवीत येणारा आणि रस काढून खाण्यापेक्षा लगेच माचवून, सरळ तोंडाला लावून, साल ओरपून, घुई चोखून खाण्यात मज्जा असणारा गावरानी आंबा! विदर्भात पूर्वी या गावरानी आंब्याचा आमराया असत. काळ बदलला आणि या आमरायाची संख्या कमी झाली. पण वडीलधारी मंडळी अजूनही सांगतात कि, विदर्भात उन्हाळ्यातला पाहूणचारच्या पंक्तीमध्ये वेगवेगळ्या चवीच्या गावरनी आंब्याचा रसाच्या चार-पाच वाट्या असत. आणि सोबत एक वाटी पाण्याची...आजकालच्या भाषेत 'फिंगर बाउल...' एका रसची चव दुसऱ्यात मिसळून जाऊ नये म्हणून!! आणि या गावरानी आंबाच्या घुया थोड्याशा पाण्यात कुस्करून वरून चवीला जरासं मीठ-साखर टाकून केलेला 'पाणरस...' म्हणजे  आजकाल आप...

Musical Moments

Musical Moments दिन निकलता था,रातें कटती थी, हम तो बस वही बोरिंग दुनिया मे जीते थे। जिंदगी मे इसी तो राह पर हम चलते थे। सर, आप कि तरह हम भी चलते हुए राही थे, जहाँ हम भी अनजान थे तुम भी अनजान थे। जिंदगी के राह पर एक मोड आ गया। जिसने इस अनजान को पहचान मे बदल दिया। सब अपने-अपने इसमे माहिर थे लेकिन, आप ने सबको मिलाके माहोल बना दिया। हम तो बस अकेलेही गुनगुनाया करते थे, आपने तो हमे महफिलमे गाना सिखा दिया। आशा तो इस बात कि है  ये महफिल बस इसी तरह बनी रहे, वक्त निकाल के अपनी कोशिशे जारी रहे। "जिस दिन आप हमारे साथ थे", ये लम्हा भी हम कैसे भूल पाऐंगे? आपको तहे दिल से शुक्रिया करू, फिर भी शब्द कम पड जाऐंगे। सर, हमे पलपल इंतजार था इस पल के लिए ये पल आया भी तो एक पल के लिए अब हर पल दुआ है इस पल के लिए काश फिर आ जाए एक पल के लिए।

प्रवासातील अनुभव (भाग 2)

प्रवासातील अनुभव (भाग 2) कितीतरी दिवसानंतर आपण फक्त काही दिवसांसाठी घरी🏠 जात असतो म्हणून माझी 🕋कॉलेजला परत येण्याची इच्छाच नव्हती. ओढ जरी घरचीच असली तरी मनाला आवरत 🙂कॉलेजला परत यावेच लागते. येतांना घडलेला एक प्रसंग..  नेहमीप्रमाणे आजही बाबा म्हणाले,"बेटा लवकर आटप आपण एक तास अगोदर पोहचायला हवं". मी म्हणाली,"बाबा आपण अर्धा तास अगोदर निघूया". बाबा काही मानले नाही शेवटी एक तास अगोदरच नागपूरच्या रेल्वे स्थानकावर 🚞आम्ही पोहोचलो.  तिकीट काढलं पण तरी एक तास वेळ होता 😶अजून ट्रेन यायला. माझे बाबापण दुसरं कोणी दिसलं कि त्यांच्याशीच गप्पा 😀आणि मी इथे कंटाळत 😔होती. माझं फक्त इकडे-तिकडे पहाणं👁, येणाऱ्या-जाणाऱ्या ट्रेन कडे कंटाळलेल्या नजरेने😒 पहाणं बस हेच सुरु होतं. आणि त्यात स्टेशनवर वस्तू विकणाऱ्यांच्या आवाज👻.  त्यातलाच एक मुलगा 👦,कदाचित आठवीतल्या वयाच्या मुलाएवढाच असावा. जोरजोराने ओरडत होता 'पानी थंडा-थंडा पानी". मी मनात म्हटलं काय मुलगा आहे, कसले घाणेरडे कपडे आहे याचे, कसला दिसतो 😒आहे, कसला अनाडी आहे. जाऊ दे रे बाबा🙅, मी पण हे काय विचार करत बसल...

निसर्ग..

"अरे मी किती सांभाळू तुम्हाला??? अरे मी किती देऊ तुम्हाला?? तुमची काही जबाबदारी आहे कि नाही??" निसर्ग आवाज देऊन सांगत होता पण स्वतः च्या गुर्मीत असलेल्या माणसांनी निसर्गाचा कधीच विचार केला नाही. माणूस आणि निसर्ग याचे युगायुगाचे नाते आहे. पण माणूस सिमेंटच्या बंगल्यात बंदिस्त झाला आणि निसर्गापासून दूर गेला. मधेच निसर्ग जपा ओरड व्हायला लागली आणि निसर्ग आपल्या घरात कुंडीत येऊन सामावला. जागा कमी असली तरी त्याने आपले बहरने सोडले नाही. पण जेव्हा माणसाने प्रचंड वट वृक्षाला बोन्साय करून कुंडीत बंदिस्त केलं आणि मग माणसात  आणि निसर्गात दुरावा निर्माण झाला.  "Do you ever walk out at night just to feel the charm and mystery of the stars?"  वरील वाक्य वाचलं आणि विचार केला खरच आपण अस कधी करतो का? आकाश तारे सगळं बघतो पण तारकांचे गूढ अनुभवाचा कधी प्रयन्तही केला नाही. निसर्गाचे गुढ कधी कोणाला कळलेच नाही. निसर्गाच्या विविध रंगी पैलूंचे अनुभव घेतले, तर निसर्गातील प्रेम, सुख, रम्याता सगळ्या भावनांचे प्रकटीकरण होईल. सकाळी फिरायला निघालं कि , हवेचा थंड स्पर्श ...