Skip to main content

टक्केवारीचं गणित...


मला लहानपणापासून टक्केवारीचं कोडं कधी समजलंच नाही. जे लोक कायम टक्केवारीत बोलतात, त्यांच्या बुद्धिमत्तेला खरंच दाद द्यावी लागणार. एकदा एकाला एक बातमी सांगताना तो व्यक्ती म्हणाला 'तुमची बातमी ७० टक्के खरी तर ३० टक्के खोटी आहे'. मी विचारलं कसं? त्या बातमीत तुम्ही जन्मवर्ष चुकीचे सांगितले. फक्त जन्मवर्ष चुकीचे सांगितले म्हणून ३० टक्के चूक बातमीत कशी काय होऊ शकते?. हे मला कळलंच नाही आणि हे अतिहुशार लोकं टक्केवारी कोणत्या आधारावर काढतात देवच जाणे. समजा एका डॉक्टर कडे एक रुग्ण गेला, आणि डॉक्टरांनी औषधी देऊन आठ दिवसांनी पुन्हा बोलावलं.
तो रुग्ण पुन्हा तपासणीला येतो तेव्हा डॉक्टर विचारतात किती टक्के आराम झाला? रुग्ण गोंधळून सांगतो '६५ टक्के आराम आहे' मग डॉक्टर विचारतात, 'खोकला कसा आहे?' 'ठिक आहे' मग डॉक्टर पुन्हा थांबतात..आणि मग विचारतात आता. 'तो विचार करून सांगतो आता ७० टक्के'.
आता हा प्रश्न आहे की टक्केवारी या रुग्णांने कशाच्या भरोशावर सांगितली आणि डॉक्टर सुद्धा टक्केवारीवर भरोसा कसा ठेवतात? 'तू आता इतके टक्के बरा झाला आहेस आणि शंभर टक्के बरा झाला कि सांग', असं टक्केवारीचा गृहपाठ देऊन त्याला घरी पाठवतात. पण हे अजबच गणित आहे हे डॉक्टरांचं !!
 वर्तमानातून आपण पावसाची टक्केवारी ऐकतो, यंदा ९० टक्के पाऊस पडणार किंवा ८० टक्के धरण भरलं. खरंतर, पाऊस आणि धरण किती टक्के भरलं हे मोजायची पद्धत आहे. आमच्या शहरात एक 'महाभाग ' थंडी सुद्धा टक्केवारीत सांगतात, यावर्षी ८० टक्केच थंडी पडली. खरंतर थंडी टक्केवारीत कशी मोजायची हे मी खूप जणांना विचारलं पण मला उत्तर नाही मिळालं. काही लोकं तर कायम टक्केवारीत बोलतात, 'मार्केट बंद आहे फक्त ६० टक्केच ग्राहक आहेत' असे ते सांगतात. बरं अशा लोकांसोबत कुठल्याही विषयावर बोला ते लगेच सांगतील कि भाजपाच्या काळात फक्त ५० टक्केच विकास झाला, आपण इकडे गोंधळतो कारण भाजपावाले म्हणतात, ' आम्ही ८० टक्के विकास केला, रस्त्यांची कामे ६५ टक्के पूर्ण झालीत, ५० टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला.' ज्वारीची पेरणी ४५ टक्के कमी झाली, मेट्रोचं काम ९० टक्केच झालं. रेल्वेमध्ये ३५ टक्के आरक्षण होतं, शालेय पोषण आहारातील ३० टक्के तांदूळ परस्पर गायब होते, एवढच काय यांना तर कुठल्या मंत्र्याला, आमदाराला किती टक्के कमिशन मिळतं हे सुद्धा माहिती असतं. म्हणजे तुम्ही फक्त  विषय काढायचा हि मंडळी चौफेर  ज्ञान असल्यासारखं देशभरातील सगळी टक्केवारी तुम्हाला तोंडपाठ सांगणार.
टक्केवारीचं काम १०० टक्क्यांपर्यंतच असते तरी काही भारी असेही सांगतात, '१०१ टक्का होईल तुमचं काम किंवा आमचं काम २०० टक्के परफेक्ट असतं'. यामुळे माझ्यासारखी गणितात सामान्य असणारी विचारात पडते, हि टक्केवारी २०० टक्क्यांपर्यंत कशी काय गेली? असो ज्याचं त्याचं टक्केवारीचं गणित असतं , मला काय करायचं आहे?

विशेष म्हणजे अशी टक्केवारी सांगणारी मंडळी कधी घराबाहेर पडत नाही, तरीही त्यांचा अभ्यास एवढा दांडगा असतो की विचारायलाच नको. प्रख्यात गणिततज्ज्ञ "रामानुजन" आता असते तर ते सुद्धा चक्रावून गेले असते या टक्केवारीचं गणित ऐकून!!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

My Drawings✏😇

कला वाट पाहतांना एक सुंदरी.....😍 माझ्या स्वप्नातली एक सुंदर परी.....💗 पक्ष्यांची उंच भरारी...🐦🕊 माझी आई..💗   नयन...👁

प्रवासातील अनुभव (भाग 2)

प्रवासातील अनुभव (भाग 2) कितीतरी दिवसानंतर आपण फक्त काही दिवसांसाठी घरी🏠 जात असतो म्हणून माझी 🕋कॉलेजला परत येण्याची इच्छाच नव्हती. ओढ जरी घरचीच असली तरी मनाला आवरत 🙂कॉलेजला परत यावेच लागते. येतांना घडलेला एक प्रसंग..  नेहमीप्रमाणे आजही बाबा म्हणाले,"बेटा लवकर आटप आपण एक तास अगोदर पोहचायला हवं". मी म्हणाली,"बाबा आपण अर्धा तास अगोदर निघूया". बाबा काही मानले नाही शेवटी एक तास अगोदरच नागपूरच्या रेल्वे स्थानकावर 🚞आम्ही पोहोचलो.  तिकीट काढलं पण तरी एक तास वेळ होता 😶अजून ट्रेन यायला. माझे बाबापण दुसरं कोणी दिसलं कि त्यांच्याशीच गप्पा 😀आणि मी इथे कंटाळत 😔होती. माझं फक्त इकडे-तिकडे पहाणं👁, येणाऱ्या-जाणाऱ्या ट्रेन कडे कंटाळलेल्या नजरेने😒 पहाणं बस हेच सुरु होतं. आणि त्यात स्टेशनवर वस्तू विकणाऱ्यांच्या आवाज👻.  त्यातलाच एक मुलगा 👦,कदाचित आठवीतल्या वयाच्या मुलाएवढाच असावा. जोरजोराने ओरडत होता 'पानी थंडा-थंडा पानी". मी मनात म्हटलं काय मुलगा आहे, कसले घाणेरडे कपडे आहे याचे, कसला दिसतो 😒आहे, कसला अनाडी आहे. जाऊ दे रे बाबा🙅, मी पण हे काय विचार करत बसल...