Skip to main content

वटवृक्ष लावूया....


५ जून जागतिक पर्यावरण दिन. नेमकी आज याच दिवशी वटपौर्णिमा आली आहे. हा चांगला योगायोग. वटपौर्णिमेला सौभाग्यवती महिला वडाच्या झाडाचे पूजन करीत त्याला प्रदक्षिणा करतात. आपल्या संस्कृतीत ही फार सुंदर परंपरा आहे. या परंपरेतील कथा काहीही असो पण आपले सर्व सण - समारंभ  निसर्गाशी जवळीक साधण्याची शिकवण देणारे आहेत. आज त्याकडे डोळस पणे बघणे गरजेचे आहे. परंपरेप्रमाणे सुहासिनी सुंदर तयार होऊन वडाच्या झाडाजवळ एकत्र येतात. त्या झाडाच्या खोडाला दोरा गुंडाळतात. प्रदक्षिणा मारतात. वटवृक्षाची मनोभावे पूजा करतात. त्यामागचा त्यांचा उद्देश एकाच की कुंकवाचा हाच धनी सात जन्मी लाभू दे. आज आहे त्या जोडीरासोबत एक जन्म काढायला जिथे ताण येतो तिथे सात जन्माचे काय घेऊन बसलात. पण आपलं सर्व परंपरेप्रमाणे चालले आहे. या परंपरेचा विचार केला तर लक्षात येईल की याचा संबंध थेट पर्यावरणाशी आहे. निसर्ग रक्षणासाठी या परंपरा आपल्या पूर्वजांनी जाणीवपूर्वक निर्माण केल्या आहेत.
वड, पिंपळ, कडुलिंब ही झाडे मोठ्या प्रमाणात प्राणवायू वतावरणात सोडतात. ही झाडे जगली तर सृष्टी जगेल. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने माणसाचे वयोमान वाढण्यास मदत होते. त्याकडे दुर्लक्ष केलं तर काय परिस्थिती होते हे आज आपण अनुभवत आहो. आम्ही पर्यावरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच करोना, चक्रीवादळ, टोळधाड, पाणीटंचाई, जागतिक तापमान वाढ असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. पर्यावरण दिनी या विषयावर आपण चिंतन करू शकलो तर अधिक बरे होईल. आपल्या हातात अधिकाधिक झाडे लावणे, पाण्याचा जपून वापर आणि संवर्धन हे नक्कीच आहे. वटसावित्रेचे पूजन करताना प्रत्येक महिलेने एक वडाचे झाड लावत त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला पाहिजे. आता ऊन थोडे कमी झाले आहेत, पावसाळी वातावरण आहे. वटसावित्री आणि पर्यावरण दिन कृतीपूर्ण साजरा करण्याची ही पर्वणीच आहे. ज्यामुळे जिथे शक्य असेल तिथे वडाचे रोप लावा. वडवृक्षरोपणातून खरं वटसावित्री पूजन करा.

Comments

Popular posts from this blog

My Drawings✏😇

कला वाट पाहतांना एक सुंदरी.....😍 माझ्या स्वप्नातली एक सुंदर परी.....💗 पक्ष्यांची उंच भरारी...🐦🕊 माझी आई..💗   नयन...👁

प्रवासातील अनुभव (भाग 2)

प्रवासातील अनुभव (भाग 2) कितीतरी दिवसानंतर आपण फक्त काही दिवसांसाठी घरी🏠 जात असतो म्हणून माझी 🕋कॉलेजला परत येण्याची इच्छाच नव्हती. ओढ जरी घरचीच असली तरी मनाला आवरत 🙂कॉलेजला परत यावेच लागते. येतांना घडलेला एक प्रसंग..  नेहमीप्रमाणे आजही बाबा म्हणाले,"बेटा लवकर आटप आपण एक तास अगोदर पोहचायला हवं". मी म्हणाली,"बाबा आपण अर्धा तास अगोदर निघूया". बाबा काही मानले नाही शेवटी एक तास अगोदरच नागपूरच्या रेल्वे स्थानकावर 🚞आम्ही पोहोचलो.  तिकीट काढलं पण तरी एक तास वेळ होता 😶अजून ट्रेन यायला. माझे बाबापण दुसरं कोणी दिसलं कि त्यांच्याशीच गप्पा 😀आणि मी इथे कंटाळत 😔होती. माझं फक्त इकडे-तिकडे पहाणं👁, येणाऱ्या-जाणाऱ्या ट्रेन कडे कंटाळलेल्या नजरेने😒 पहाणं बस हेच सुरु होतं. आणि त्यात स्टेशनवर वस्तू विकणाऱ्यांच्या आवाज👻.  त्यातलाच एक मुलगा 👦,कदाचित आठवीतल्या वयाच्या मुलाएवढाच असावा. जोरजोराने ओरडत होता 'पानी थंडा-थंडा पानी". मी मनात म्हटलं काय मुलगा आहे, कसले घाणेरडे कपडे आहे याचे, कसला दिसतो 😒आहे, कसला अनाडी आहे. जाऊ दे रे बाबा🙅, मी पण हे काय विचार करत बसल...