Skip to main content

एकांताचा आवाज...


एकटेपण ही तशी प्रत्येकाला बिलगलेली गोष्ट आहे. अगदी रूढ भाषेत, एकटच जन्माला येणं आणि जाणं ही गोष्ट कोणालाही टाळता आलेली नाही. एखादा कितीही गोष्टीवेल्हाळ, माणसात रमणारा माणूस असला तरी काही काळापुरता का होईना एकटेपणा त्याला हवा असतोच. मनाला चिकटलेली, नको असणारी चिरकुटं या काळात तो धुवून, काढून टाकत असतो. अर्थात, ही एकटेपणाची गोष्ट एकटेपणानच संपणारी नसते. त्याला बरच काही बिलगून आलेलं असतं. शरीराचं तसं अंतर्वस्त्र, तसंच मनाचही असावं. ते व्यक्त होतांना मग प्रथा, संकेत, नैतिकता, अनैतिकतेची वस्त्र परिधान करतं. आपल्या भोवतालाला टाळून आपण जगू शकत नाही. त्याचा अर्थ हा जो काही भोवताल आहे आपल्या विचार, जगण्याची दिशा ठरवतो. आपल्या वर्तनावर एकाच वेळी अनेक दबाव असतात. काही वेळा हा दबाव नाकरण्यातून आपण वर्तन करतो तर काही वेळा तो स्वीकारण्यातून. काही प्रक्रिया तर अगदी अंगवळणी पडल्यासारखं असतात. स्वीकार-नकाराच्या पलीकडलं त्यांचं आस्तित्व असतं. ती केवळ दैहिक नसते तर तिचे रूप हे बरेचसे भावनिक,मानसिक असते. या एकांताची मुळं खूप खोलवर आपल्या मनाशी रुजलेले असतात.
भंडाऱ्याच्या डोंगरात बसलेले एकटेच तुकोबा आठवतात. या एकांतांनं त्यांना जी जगाला, चराचराला पेरून धरण्याची ऊर्जा दिली त्याचं वर्णन काय करणार? आकाश मंडप, पृथ्वी असणं, त्यात सगळा आसमंत त्यांनी कवेत घेतलाय. आपल्यापर्यंत चालत-बोलत आलेले या महासंताचे अभंग हे केवळ त्यांच्या एकांताचे देणे नसले तरी त्या सर्व चिंतनाचा तळाशी दिसतो, जाणवतो. तो त्याचा विश्वव्यापी एकटेपणा. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म या विचाराच्या तळाशी लखाखून येतो तो मानवतेचा शुद्ध नितळ गारवा.
माणूस गर्दीत असला तरी तो एकटाच असतो. भोवती गोंगाट आणि आपणच आपल्याशी हरवून जाणं. हे हरवणं काही वेळेस मनाला विरंगगुडा देणारं असतं, तर कधी कुरतडणारं. त्यात जगण्याची ओढ असते, तसेच विरक्तीही. विरक्तीची भावना हेही एकटेपाणाच एक रुपडं असतं. सर्वसंगपरित्याग  ही गोष्ट सामान्यांना झेपणारी नसते तरी विरक्तीची भावना प्रत्येकाच्या मनात एक विशिष्ट टप्यावर येत असते. संसार सवरताना फार थकून गेलेला जीव विरक्तीची मागणी करतो. त्याला एकांताची ओढ लागते.
दुपारचं एखादं निवांत गावं समोर येतं कोणीतरी पारावर बसलेलं असते एकटाच. पिंपळपानांची सळसळ, पाखरांचा हलकासा किलबिलाट. शून्यात नजर हरवून बसलेलं कोणी एकटाच. शांत असलेले गावातल्या गल्याबोळ. एकटी एकटी घरं. आंगणातला विसावा. सगळ्या घरभिंती, मंदिराचा कळस, गाभाऱ्यासह एकांतात बुडून गेलेला एकांत . अशावेळी जाणवून जातो, तो गावाचा एकटेपणा खरं म्हणजे गावं, वस्ती, तांडा, पेठ, वाडी ही एक समूहभावना असते. पण तिथे हा एकटेपणा कधी कधी निर्जन तळासारखा वास करत असतो. तिथेही येतोच कधी कधी एकांताचा आवाज.
या एकटेपणाला असणाऱ्या किंवा नसणाऱ्या रूप मानता येईल का? या एकटं होऊन बुडून जाण्यात विवेक सर्वाधिक जागृत होत असावं का? या एकटेपणातून कधी एखादा राक्षसही जन्माला येत असेल का? एकांताचा ठाव घेणे आपल्याला जमेल असं नाही म्हणवत. आपल्या मनातल्या एकांताचा शोध हा आपल्या मनातला गाभाऱ्याच्या दिशेनं टाकलेलं पाऊल मानता येईल का?

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

My Drawings✏😇

कला वाट पाहतांना एक सुंदरी.....😍 माझ्या स्वप्नातली एक सुंदर परी.....💗 पक्ष्यांची उंच भरारी...🐦🕊 माझी आई..💗   नयन...👁

प्रवासातील अनुभव (भाग 2)

प्रवासातील अनुभव (भाग 2) कितीतरी दिवसानंतर आपण फक्त काही दिवसांसाठी घरी🏠 जात असतो म्हणून माझी 🕋कॉलेजला परत येण्याची इच्छाच नव्हती. ओढ जरी घरचीच असली तरी मनाला आवरत 🙂कॉलेजला परत यावेच लागते. येतांना घडलेला एक प्रसंग..  नेहमीप्रमाणे आजही बाबा म्हणाले,"बेटा लवकर आटप आपण एक तास अगोदर पोहचायला हवं". मी म्हणाली,"बाबा आपण अर्धा तास अगोदर निघूया". बाबा काही मानले नाही शेवटी एक तास अगोदरच नागपूरच्या रेल्वे स्थानकावर 🚞आम्ही पोहोचलो.  तिकीट काढलं पण तरी एक तास वेळ होता 😶अजून ट्रेन यायला. माझे बाबापण दुसरं कोणी दिसलं कि त्यांच्याशीच गप्पा 😀आणि मी इथे कंटाळत 😔होती. माझं फक्त इकडे-तिकडे पहाणं👁, येणाऱ्या-जाणाऱ्या ट्रेन कडे कंटाळलेल्या नजरेने😒 पहाणं बस हेच सुरु होतं. आणि त्यात स्टेशनवर वस्तू विकणाऱ्यांच्या आवाज👻.  त्यातलाच एक मुलगा 👦,कदाचित आठवीतल्या वयाच्या मुलाएवढाच असावा. जोरजोराने ओरडत होता 'पानी थंडा-थंडा पानी". मी मनात म्हटलं काय मुलगा आहे, कसले घाणेरडे कपडे आहे याचे, कसला दिसतो 😒आहे, कसला अनाडी आहे. जाऊ दे रे बाबा🙅, मी पण हे काय विचार करत बसल...