"अरे मी किती सांभाळू तुम्हाला???
अरे मी किती देऊ तुम्हाला??
तुमची काही जबाबदारी आहे कि नाही??"
निसर्ग आवाज देऊन सांगत होता पण स्वतः च्या गुर्मीत असलेल्या माणसांनी निसर्गाचा कधीच विचार केला नाही.
माणूस आणि निसर्ग याचे युगायुगाचे नाते आहे. पण माणूस सिमेंटच्या बंगल्यात बंदिस्त झाला आणि निसर्गापासून दूर गेला.
मधेच निसर्ग जपा ओरड व्हायला लागली आणि निसर्ग आपल्या घरात कुंडीत येऊन सामावला. जागा कमी असली तरी त्याने आपले बहरने सोडले नाही. पण जेव्हा माणसाने प्रचंड वट वृक्षाला बोन्साय करून कुंडीत बंदिस्त केलं आणि मग माणसात आणि निसर्गात दुरावा निर्माण झाला.
"Do you ever walk out at night just to feel the charm and mystery of the stars?"
वरील वाक्य वाचलं आणि विचार केला खरच आपण अस कधी करतो का? आकाश तारे सगळं बघतो पण तारकांचे गूढ अनुभवाचा कधी प्रयन्तही केला नाही. निसर्गाचे गुढ कधी कोणाला कळलेच नाही. निसर्गाच्या विविध रंगी पैलूंचे अनुभव घेतले, तर निसर्गातील प्रेम, सुख, रम्याता सगळ्या भावनांचे प्रकटीकरण होईल.
सकाळी फिरायला निघालं कि , हवेचा थंड स्पर्श आईच्या ममतेचा अनुभव देतो. कुठे कंच हिरवे झाड, तर कुठे फिकट हिरव्या रंगाचे झाड, कुठे पिवळी फुले बहरली तर कुठे पंढरा सोनचाफा डोलत आहे. मोठ्या वृक्ष यांचा सहाय्याने वेली बहरत आहे. या सगळ्यांचा अनुभव घेतला कि दाटलेलं मन स्वच्छ होऊन जातं.
खरच निसर्गाला मनापासून अनुभवा ..कधी रातराणीच्या सुगंधातून ....
कधी पारिजातकाच्या बहारातून...
कधी मोगऱ्याच्या बहारातून तर कधी जाई जुई च्या सुगंधाच्या लहारामधून...❣️
Comments
Post a Comment