Skip to main content

Posts

Showing posts from 2021

माझी मैत्री

माझे मित्रमैत्रिणी आहेत प्रेमळ स्वभावाचे, आहोत आम्ही साधे सरळ मस्तीखोर आणि मैत्रीभावाचे.. अधून मधून आला जरी कोणाला राग, तरी आम्ही करतो क्षणात त्याचा त्याग.. आमची ही मैत्री फार गोडं आहे, चव चाखून पहा किती दडलेली आहे.. आपली दोस्ती अशीच ठणठणीत राहिली पाहिजे, तिला टिकवण्याची हिंमतही जपली पाहिजे.. मैत्रीमधून अडकलं कोणी डबक्यात हे आपल्याला माहीत असणार आहे, मग आपण त्याला म्हणू "नको रे टेंशन घेऊ" उद्याचं जग आपलंच आहे..!!

जरा जगूया

जगून घेऊया क्षण हा आताचा, स्वपंखांना बळ देऊया.. डोळ्यांतील पापण्यात नवे स्वप्न रंगऊया.. प्रवासरुपी स्वपावलांना वाट शोधण्याची मुभा देऊया.. कानाला नवे तरंग ऐकण्याची प्रेरणा देऊया.. हाताच्या या मुठीला तारे मावतील इतके मेहनतीच्या आकांक्षाने विस्तृत करूया.. ओठांना सुर मधुर गाण्याचे स्वर देऊया.. या सखोल मनाच्या कोपऱ्यात निवांत शांतता विस्तारित करूया.. नियंत्रित मेंदूला सकारात्मकतेची दिशा दाखवूया.. कालची आजची सगळी चिंता सोडूया.. क्षण हा आजचा जरा जगूया.. नवा प्रवास, नवी दिशा, नवा तरंग, नवी लहर जीवनातील आपण छेडूया..!!

जगण्याचे रंग

ओंजळीतल्या जगाचे रंग न्याहाळंणं मोठं गमतीचं असतं. माणसाची, पशुपक्षांची, निसर्गाची फुलबहरण्याची धडपड सतत सुरु असते. सुखाची रंगीत बाग येथे फुललेली असते आणि मौजमजेची इंद्रधनुशी फुलपाखरं तीवर भिरभिरत असतात. कधी तडजोड, कधी लढाई असते या जगण्याचा रंगात..!

शिक्षण

मानवी जीवनात शिक्षणाचे महत्व अगाध आहे. संविधानाची वाटचाल बहात्तराव्या वर्षात आणि स्वातंत्र्याची वाटचाल पंचहत्तराव्या वर्षात होत असताना नव्या शैक्षणिक धोरणाने वेगाने होणारे जागतिक बदल टिपू नये, तथा भारतीय मूल्यव्यवस्था अधिक बळकट करण्याचा विचार करू नये ही खरे तर अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. बालकामगार, रस्त्यावरील बालके, आदिवासी समाजातील काही मुले, वीटभट्टी, दगडखाणीत काम करणाऱ्यांची मुले, आणि बांधकाम मजुरांची मुले शिक्षणापासून अजूनही वंचित असलेले दिसतात. गरीब-कष्टकऱ्यांनी दर्जात्मक शिक्षणाचा विचार करू नये असच काहीतरी झाले. एकीकडे मोफत शिक्षणाचा कायदा करायचा आणि दुसरीकडे मात्र त्याची अमलबजावणी होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी हि तर हद्द झाली. शिक्षणाच्या नावाखाली एप्रिल फूल बनवतात की काय? देशाला एकसंघ, बलशाही, धर्मनिरपेक्ष आणि मूल्यात्मकदृष्टया आधुनिक करायचे असेल तर शिक्षणाकडे गांभीर्याने पहिले जाण्याची गरज आहे. कारण असीम करुणा पोटात वागवून मानवतेचे कल्याण साधणारी सुगंधाची वसाहत म्हणजे शिक्षण! नवनिर्मितीची हजारो क्षितिज उघडून देणारा प्रज्ञानाचा उजेड म्हणजे शिक्षण! सभ्यतेची वनर...

एक संधी

संधी असतात रे भरपूर फक्त घाबरू नको, आयुष्य अतिशय विस्तारित आहे फक्त खचू नको.. प्रेम करणारे तुझ्यासाठी भरपूर असतील आणि हात जोडणारे पण मिळतील, निदान त्या लोकांसाठी तरी हसून बघ.. निजलेल्या पापण्यांना उघड जरा पहा या जगाकडे, प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच रे कोडे.. नाही नाही म्हणत उगाच रेंगाळत राहू नको, आयुष्य फार सुंदर आहे फक्त खचू नको.. कारण बळ आहे या हातात आणि स्वप्न आहे डोळ्यात, म्हणून खचू नको,खरं सांगते..

म्हातारपण

एक म्हातारे आजोबा मिळाले. आमच्यात खूप गप्पा रमल्या. पण त्यांनी सांगितलेल्या अवस्थेने माझं मन दुःखावलं. म्हातारपण कसं असतं हे त्यांनी स्पष्ट केलं. तेच मी कविता रुपात केलेलं आहे. बघता बघता डोक्यावरचे केस उडून गेले, बोलता-बोलता शब्दही तुटत गेले, एकता एकता कान बहिरे झाले..! चस्मा खराब कि डोळे खराब काही कळत नाही, काही दिसते स्पष्ट काही मात्र दिसत नाही..! थंडीत कंप करतात बोटे माझे दहाही, कापत राहतो पाय मात्र अंतर कापत नाही..!!

डायरी-पेन

चैतन्याच्या या नभी माझे अक्षर, मनाच्या पतंगाने स्वछंद उडावे..., सामावून सारे जग आमचे हे नाते कधी न तुटावे...!! भावनांचा झरझरता पाऊस अक्षरा अक्षरातून जातो ओल निर्माण करत..., याचं प्रवासातून नवी कविता प्रवसत...!! अबोल शब्दांना तुम्हीच बोलका करता..., आणि अतूट विश्वासालाही तुम्हीच दर्शविता...!! मोठे स्मितहास्य चेहऱ्यावरती खुलते..., जेव्हा डायरी-पेन माझा सोबत असते...!!

पानांशी जुळलेले नाते

वहीचं पाहिलं पान उघडलं की काय लिहावं ते सुचत नाही, कारण शब्द भरपूर असतात, शब्दांचा मेळ मात्र जुळत नाही.. मग आकाशाला आठवावे,जमिनीला आठवावे, पाण्याला आठवावे, पण प्रश्न मात्र एकच शेवटी कसं आणि काय रेखाटावे.. प्रश्न असाच मनात भिनतो, बघता-बघता वाट पुढची दाखवितो.. कडक उन्हात आकाश आकाशी रंग उधळविते, मग माझी पेनाची निळी शाईही, कागदाच्या कोऱ्या पानावर रंग खेळते.. ना शाईला ना पानाला माहित नव्हतं एवढं मात्र मान्य आहे, पण मनालाही माहित नव्हतं हे मात्र अशक्य आहे? मेंदूने हळूच इशारा केला मनाला, वही आली आता संपायला, थांबवा जरा शब्दांना, लागा आपल्या कामाला....!!!

सोपं आहे

घाबरू कशाला? जगणं तर सोपं आहे... बंद स्वतःला कोंडु कशाला? सुटणं तर सोपं आहे... उगाच रडू कशाला? हसणं तर सोपं आहे... डोळे मिटून अंधार बघू कशाला? आयुष्याचा उजेड बघणं तर सोपं आहे...!

मैत्री ही निसर्गाशी

दोन खोल्यांच्या एखादया छोटया घरकलात डोकावले तर आपल्याला काय आढळते? त्या छोट्याशा घरकुलातील सामानाच्या दाटीवाटीत एखाद-दुसरी कुंडी असतेच. दरवर्षी मे महिन्याच्या सुट्टीत लोक मोठ्या संख्येने काश्मीरला, सिमल्याला जात असतात. या साऱ्या गोष्टी काय सांगतात? 'वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे' हे तुकारामांचे अनुभवाचे बोल सर्वांच्याच रक्तात भिनलेले आहेत. नाहीतरी माणूस तरी काय? निसर्गाचेच लेकरू ना! त्याला आपल्या इतर भावंडांविषयी ओढ असणारच. आजच्या या विज्ञानयुगात तो यंत्राच्या जंजाळात जितका जितका अडकतो तितके त्याचे मन अधिकाधिक निसर्गाकडे खेचले जाते. म्हणून तर यंत्राच्या जगात जगणारा माणूस वेळात वेळ काढून दोन दिवस तरी आपल्या खेड्यातील घराकडे धाव घेतो. निसर्ग आणि मानव यांच्यातील ही मैत्री फार जुनी आहे. अगदी अनादिकालापासूनच निसर्ग हा माणसाचा सोबती आहे. आकाशातील बदलणारे रंग पाहून कवींच्या वाणीला भरती आली. या निसर्गाचे मानवावर केवढे उपकार आहेत! तो त्याची भूक भागवितो. तहान शमवितो. मंद, मधुर झुळकींनी श्रमपरिहार करतो. सुगंधित फुलांनी त्याचे जीवन सुगंधित करतो. थकल्याभागलेल्याला सावली देतो. उन्हाचा त्...

आई कुठे काय करते?

आई तुझे महत्व कितीही सांगितले तरी शब्दात कमी पडेल गं. चित्रकाराने तुझ्या गुणांचे वर्णन करावे म्हणजे रंग कमी पडण्यासारखे आहे. म्हणूनच तर म्हणतात, "आई सारखे दैवत साऱ्या जगात नाही". जेव्हा मी पावसात भिजून घरी आली तेव्हा भाऊ म्हणाला, "कशाला पावसात भिजली? सर्दी खोकला होईल की". बाबा म्हणाले, "पावसात यायची काय गरज? कुठे थांबली का नाही?" मात्र आई टॉवेलने भिजलेले केंस पुसत म्हणाली, "मूर्ख पावसा तू येईपर्यंत थांबला पण नाही". आई तुझं किती गं वेडं प्रेम, पावसाला सुद्धा थांबवायला निघालीस. खरंतर शिवाजी ची जिजाई आहेस तू, जिजाई ची शिवाई आहेस तू, माझासाठी तर लेखणीची शाई आहेस तू!! ती कधी तडपती ऊन असली, तर सावली बनते, कधी सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस असला तर छत्री बनते, कधी कडाक्याची थंडी पडली तर, अंगावर ओढवणारी गरम शाल बनते! मेहनतीचा प्रवास तूच, काळोख्यात मिळणारा उजेडंही तूच. कोरडवाहू जमिनीवर पिकं उगवणं जीला जमतं ती म्हणजे आई. माझा वेदना बघताना तुला असह्य होते पण कुठे कमी पडू नये म्हणून रनरागिणीचा रूप धारण करून रागावते. हे नाजूक पाऊलं कष्टाच्या-मेहनतीचा...

संत गाडगेबाबा एक विचार!

हल्ली ढोंगी साधू-संतांनी आपापली दुकाने थाटली आहेत. अजूनही कित्येक जण स्वैर आकाशात शुभ्रपणा दाखवण्यात मग्न आहेत. यात चूक त्यांची नाही, चूक त्यांच्या नादाला लागणाऱ्या, नीतिमत्ता गहाण टाकलेल्या मुखवट्यांची आहे. आमच्या डोक्यात संत तुकारामाची बुद्धिप्रामाण्यवादी भूमिका ते संत गाडगेबाबांचा बुरसटलेल्या विचारांना स्वच्छ करणारा खराटा असता, तर अश्या दिवसांचा सूर्योदय कायमचा अस्तास गेला असता. संताचा कर्मभूमीने सुगंधित महाराष्ट्रात अजूनही ग्रामस्वच्छता अभियान राबवावे लागते, हे खरे तर आपल्या संस्काराचे फार मोठे अपयश आहे. "मला कोणी गुरू नाही, मले कोणी चेला नाही" असे ठामपणे सांगणारे गाडगेबाबा कधी मंदिरात गेले नाही, पण त्याच्याकडे जाणारी पायवाट नेहमी स्वच्छ करत राहिले. ते कधी शाळेत गेले नाही पण सर्वसामान्यांची लेकरे शिकून मोठी व्हावीत, म्हणून अख्खी हयात खर्ची घातली. हा प्रबोधनाचा वारसा आपण पुढे न्यावा बस एवढंच! प्रबोधन रथातून बाबांनी विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जनमानसात रुजवला, तो प्रबोधनरथ समाजस्थळावर कितपत पडला आहे. "संत गाडगेबाबा केवळ व्यक्ती नाही तर तो एक विचार आहे" भयमुक्त ...

स्वातंत्र्य विचार

उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला.. नतमस्तक त्या सर्वांसाठी, ज्यांनी भारत देश घडवला..!! आज आपण सर्वे स्वातंत्र्य दिनानिमित्त जल्लोष, उत्सव साजरा करतो. पण खरंतर स्वातंत्र्य म्हणजे काय? त्याची व्याख्या आपण नीट करतो पण कर्तव्यात कुठेतरी चुकतो. मला बोलायचं स्वातंत्र्य आहे, मला राहण्याचं स्वातंत्र्य आहे आणि आणखी अनेक गोष्टींचं स्वातंत्र्य आहेच. म्हणून कसंही वागायचं, कसंही राहायचं, कसंही बोलायचं हे करून चालणार आहे का? आपला भारत पूर्णपणे स्वातंत्र्य आहे असं आपण अधोरेखित करतो. पण या भारतात स्वातंत्र्याची मर्यादा ओलांडताना मला दिसत आहे. भारतात राहणारे काही स्वतःला फारच स्वातंत्र्य असल्यासारखं वागतात. साधं उदाहरण सांगायचं म्हणजे, रस्त्यावरून जात असताना आपल्या बॅगमध्ये असलेला कचरा किंवा खाणं झाल्यानंतर तो कागद रस्त्यावर फेकून देणे. असे करणारे फक्त कोणी एकटाच नसतो तर कित्येकजण या चुकीच्या वागणुकीला बळी पडतात. आणि बळी पडूनही विचार मात्र, "रोजचा कचरा साफ करणारे सरकारी कर्मचारी आहेतच" असा असतो.  अरे पण एक-एक करता -करता अनेक होतात आणि जागेवरचा कचरा सहज वाढत जातो. आणि त्या कचऱ्यामधे विचित्र असे...

आमचं नागपूर

नागपूरचे आराध्य दैवत आहे टेकडीचा गणपती, आमच्या नागपूर शहराची काय वर्णावी महती..! नागपूर शहर आहे महाराष्ट्राची उपराजधानी, भारताच्या इतिहासात आहे प्रसिद्ध संत्रानगरी..! नागपूरला जोपासल्या जातात संस्कृती आणि परंपरा, जुन्या नव्याशी सांगड घालणे हाच आमुचा मंत्र खरा..! नागपूरला लाभला आहे ऐतिहासिक वारसा, भविष्याचा वेध घेऊन नवनिर्मितीचा आरसा..! वाडा, घरे, फ्लॅट यांनी राखली नागपूरची शान, वृद्ध, तरुण, मुले यांचा जमतो मेळ छान..! कर्तृत्ववान व्यक्तींचा आहे आम्हाला अभिमान, खरच आमचं शहर आहे महान..! दिक्षाभूमी, संघभूमी, चर्च आणि मशिस, सर्वधर्म समभावाचे हेच आहे प्रतिक..! सण उत्सवाचा घातला जातो मेळ, क्रीडा, चित्रकला, संगीत, नृत्यांचाही खेळला जातो खेळ..! स्वच्छ सुंदर नागपूर शहर हाच अमुचा ध्यास, पर्यावरणाचा समतोल राखला जातो खास..! धावत्या मेट्रोची आहे आम्हाला उत्सुकता फार, आधुनिकतेशी नाते जोडणे हेच जीवनाचे सार..! शिक्षण हेच आमुच्या जीवनाचे तंत्र, सुख-समाधानी राहणे हाच अमुचा जगण्याचा मंत्र..!

रम्य हा पावसाळा

पावसाळा हा बहुतेक सर्वांनाच आवडतो. लहान मुलांना तर हा ऋतू अत्यंत आवडीचा असा ऋतू आहे. कारण या काळात आईवडिलांनी कितीही रागवलं तरी पावसाच्या सरीत जाणूनबुजून भिजतांना फार मजा वाटत असते. त्यातच त्या चिखलात नाचतांना व कपडे भरवतांनाही फारच गंमत येते. पावसाच्या पाण्यात चिंब चिंब भिजण्यात   सर्वात जास्त मजा ग्रामीण भागात असते. पावसाळ्यात सतत पडणारं थंड पाणी. त्यातच जमीनीत उगविलेली हिरवळ जणू डोळ्याचं पारणं फेडीत असते. त्यातच या गवतावरून त्या गवतावर उडणाऱ्या फुलचुख्या मन मोहून टाकत असतात. त्यातच रंगबेरंगी दिसणारे वा मन मोहून टाकणारे फुलपाखरूही आपल्या अजब रंग व ढंगांनी आकर्षित करीत असतात. त्यातच अधून मधून बेडकांचे डराव डराव ऐकायला येत असते पावसाची ही हलकीशी सर, त्यातच खाली हिरवळ, सोसाट्याचा मंद मंद वारा, ढगांचा आवाज व विजेचा गडगडाहट त्यातच कधी इंद्रधनुष्य. खरंच पावसाळा हा ऋतू जरी लोकांना आवडत नसेल पण तरी पावसाची रम्यता इतकी आहे की ती बोटावर सहज मोजता येत नाही. आणि म्हणून असचं वाटतं की हा रमणीय पावसाळा कधी संपूच नये!

क्षितिज

दुःख जेव्हा जीवनाला कवेत घेऊन मिरवतं, तेव्हा कुठलाही पर्याय समोर राहत नाही आणि मग ते दुःखच आपलं सोबती बनतं. दुःखाला एक प्रकारच गूढ सौंदर्य प्राप्त होतं. त्या गूढ सौंदर्यला तनमनावर पांघरून कवींची कविता जन्म घेते. पण ही साधना सगळ्यांना कुठे साध्य होते. त्यासाठी ग्रेसांसारखे कवी लाखात एक जन्मतात आणि त्यांच्या लेखणीतून कवितांचा महामेरू तयार होतो. ग्रेसांच्या कवितेने सांजेशी हितगुज साधत आपलं दुःख देखणं केलंय. क्षितिजाला सांज झाली की कसली ओढ लागते ना! वसुंधरेच्या कुशीत शिरायची. जणू सांजेला दुःख झालं की फुलं कोमेजली आणि पाखरांचा थवा घरी परतताना दिसला की मनी आनंद पेरावा. "क्षितिजास लागे कशी ओढ वेडी,  तुझ्या गावाची वाट चाले पुढे.. फुलांच्या नशिबात कोमेजने अन, थवा पाखरांचा उदासी उडे.." तुझ्या शब्दांमध्ये इतकं सामर्थ्य आहे की तुझ्याशी बोलल्यावर माझ्या पापण्या आपोआप ओलावतात, ज्या कधीच्या भावनाशून्य होऊन एक ओलेतेपण हरवून बसल्या होत्या. त्या तुझ्याशी बोलल्यावर आपोआप भावनेच्या गंगेमध्ये न्हातात. मग तू कितीही दुःख उरी पेरलं असलंस तरी ती ओढ, ती आपुलकी, ते प्रेम तुझ्या शब्दांनी सांभाळलंय म्हणू...

निसर्ग

आज स्वप्नी माझा निसर्ग आला खरा, का कुणा विचारू दिसला का तुम्हा ! निजले होते मी एकांती झाडाखाली, उठल्यावरी दिसले निसर्ग हा समोरी ! होती राने-वने नी खळखळणारी नदी, डोंगराची ती रांगे होती नदी किनारी ! डोंगराच्या मधूनी सूर्य हा उगवला, का कुणा विचारू दिसला का तुम्हा !! रंगेबिरंगी फुलं हे बागेत फुललेले,  वाटे मला जणू का किती सुंदर बहरले ! पक्षांचा थवा हा आकाशी उडाला,  तिकडे हळूच हा वाऱ्याचा शहारा ! हो अशी नवी पहाट दिसली ही मला, का कुणा विचारू दिसला का तुम्हा !! मन आनंदी झाले दृश्य पाहून सारे, वाटे मला हे कधी न विसरावे ! निसर्ग दृश्य हे नयनी असे रमले, स्वप्नी माझा हा निसर्ग भेटला, वाटे मला हा भेटेल का पुन्हा..!!

मनामनातला पाऊस

मानवी मन, त्यात उठवणाऱ्या भावना आणि अल्हादलेली सृष्टी खूप अनोखं रसायन आहे हे. कविमनाला उभारी देणारा हा पाऊस पावसाळ्यात कवींची झोळी भरून टाकतो. मनात दाटलेलं मळभ सरींसोबत कवी माळत असतो. पाऊस ही भावनाच कवी मनासाठी सुखदायी असते. एक अप्रतिम कवितेचा नजराना कवितेतून कवी पावसात मांडत असतो. पाऊस हा मनाला व्यक्त करणारा साधन आहे असही मनाला हरकत नाही. अंगभर थंडगार शिरशिरी आणणारा हा पाऊस मानवी मनाचे असंख्य कंगोरे उलगडत जातो. * पाऊस म्हणजे चिखल सारा..   पाऊस म्हणजे मरगळ.. पाऊस म्हणजे गार वारा.. पाऊस म्हणजे हिरवळ..* कवी सौमित्राच्या या ओळी ऐकल्या तर पाऊस अधिक समृद्ध असल्यासारखा वाटतो. आकाशातून थेट कोसळणाऱ्या पावसाचा येणाच्या सांगावा मिळतो, तेव्हा उभा नांगर धरून शेतकरीही सज्ज होतो. पावसाच्या वाटेवर शेतकऱ्यांच्या भविष्याची स्वप्ने टक लावून बसली असतात. शेताला हिरवा शालू नेसवायला, कपड्यांना चिखलात माखवायला, मातीत स्वतःला रंगवायला तो आसुसलेला असतो. पावसाचं रुसणं, फुगणं, कधीही येणं, न सांगताच जाणं हे सगळं तो अनुभवतो.  त्याच्या वेळेवर येण्यानं माती ओली झाली तर शेतकऱ्यांची आभाळभर स्वप्ने पुढे साकारत...

पत्रं

  हल्ली पोस्ट ऑफिस(डाक घर) या नावाशी आपला तसा कमी संपर्क येतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे सुद्धा आठवत नसेल की आपण या आधी केव्हा पोस्ट ऑफिसमध्ये गेलो होतो. आता प्रत्येकाकडे मोबाईल आला आहे परंतु एक काळ होता जेव्हा टेलिफोन सुद्धा क्वचितच बघायला मिळायचं. तेव्हा सगळेजण ख्यालीखुशाली कळवायला पत्र लिहायचे. ते तिकीट, पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्र इत्यादी. आज आपल्याला कोणाशी बोलायचे असल्यास लगेच फोन करून मोकळे होतो, किंवा व्हाट्सअँपवर मेसेज पाठवून, हल्ली एकमेकांचे स्टेटस बघून आपल्याला एकमेकांबद्दल कळतं. पण पत्रांची मज्जा काहीतरी वेगळीच होती. माझं पत्रांशी नातं जुळलं ते लहानपणी.  बाबा नेहमी कुठलाही सण असला की जवळच्या नातेवाईकांना शुभेच्छांचे पत्र पाठवायचे. त्यामुळे नातेवाईकांची नावांची, पत्ता या सगळ्यांची यादी बनवायला बाबा मला सांगत असे. पत्र लिहिताना सुख-दुःख अशा भावना व्यक्त करायचे किंवा मोठांचा आशीर्वाद, लहान मुलांसाठी गोड गोडं पापा. आणि हे सगळे पत्र टाकण्यात खूपच कुतूहल वाटत असे. पोस्टमन काका आमचे दैवत. त्यामुळे ते आले की सगळ्यांना फार आनंद व्हायचा. कारण कितीतरी दिवसानंतर पत्राचं उत्तर...

रमाईची शिकवण!!

  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन घडविण्यात रमाईचा मोठा वाटा आहे. रमाई म्हणजे बाबासाहेबांची सावली. रमाईच्या जीवनाच्या अनेक घटना आहेत पण काही तर हृदयाला स्पर्श करणाऱ्या आहेत. एका प्रसंगी बाबासाहेबांच्या सत्कार समारंभात रमाईला नेसायला लुगडे नव्हते. तेव्हा रमाईने बाबासाहेबांचा फेटा लुगडे म्हणून घातला. गरिबीची केवढी मोठी शोकांतिका!  पण रमाईच्या त्यागामुळे आज लाखो महिलांचे जीवनच बदलून गेले आहे. असं म्हणतात, "रमाबाई संसारात रमल्या आणि भीमराव पुस्तकात".  बाबासाहेब तहानभूक विसरून पुस्तक वाचण्यात दंग असत. एकदा जेवण्याची वेळ झाली असता रमाबाईंनी त्यांच्यापुढे जेवणाचे ताट ठेवले. पण जेव्हा रमाबाई परत आल्या तरी बाबासाहेबांनी जेवण केलं नव्हतं. मग रमाईने वाचत असलेल्या पुस्तकाचे पानं उघडत म्हणाल्या, "बायकोशी कसं वागावे, कुटुंबाशी कसं वागावे हे लिहिलं असेल तेवढं मला वाचून दाखवा". बाबासाहेब हसले आणि म्हणाले, "अगं वेडे असं काहीही नाही लिहिलंय यात'.  बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक संकटात रमाई संघर्षारत राहिल्या, हालअपेष्टा, दुःख गरिबी यावर मात केली. बाबासाहेबांपर्यं...

रंग त्यांचा वेगळा..

  आज चित्र काढत असताना, सहज एका काकूने म्हटलं, "काय चित्र काढत बसलीस, काहीतरी महत्वाचं काम कर.." मग काय चित्र काढूच नये? की काढावं.  खरंतर बालमानसशास्त्रात चित्रांना आगळेवेगळे महत्व आहे. चित्रे काढणे हे व्यक्त होण्याचे माध्यम आहे. भिंती, फरशी  खराब होते असे असंख्य कारणे तयार असतातच.  'हे नको करू, ते नको करू' या गोष्टींमुळे मुलांच्या मनावर  प्रचंड तणाव येतो. मग दुष्परिणाम हेच की त्यांची काल्पनिक शक्ती किंवा विचार करण्याची, प्रदर्शित करण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची वृत्ती विकसित होत नाही. मग मोकळेपणाने चित्र काढणे, खेळणे, बागडने हाच त्यावर उपाय. नुकतीच घडलेली एक गोष्ट बघा, माझ्या मैत्रिणीच्या छोट्या बहिनेने एक चित्र काढलं आणि ते आम्हाला दाखवलं. त्यात तिने लाल नदी काढली.  म्हणून काकू ओरडली या भावनेने की, "काय हे रक्त काढलं म्हणून". कोव्हिडमुळे तिचीही मानसिकता थोडी नाजूक झाली होती. ती आमच्या सर्वांमधून लहान होती आणि म्हणून तिची कल्पकता, विचार खरे तर आपल्याही कल्पनाशक्तीच्या पलीकडे असू शकते. मला वाटतं की त्या लाल नदीला रक्त म्हणून सीमित करता येणार नाही, त्यात न...

मी करोना बोलतोय!

  नमस्कार ,  मी करोना विषाणू बोलतोय.  माझा विशेष परिचय देण्याची गरज नाही, मी सर्वपरिचित आहे. मला देशांच्या सीमा माहित नाही ना मला वर्ण, जात, धर्म कळते. एकमेकांमध्ये भेद करणे हा माणसाचा स्वभाव आहे माझा नाही कारण मी विषाणू आहे!   माझा जन्म कुठे झाला हा वादाचा विषय आहे. परंतु एक मात्र नक्की माझा आगमनाने स्वतःला सर्वव्यापी, सर्वज्ञानी समजणाऱ्या मानवी अहंकाराला मोठा धक्का बसलायं. संपूर्ण सृष्टीवर स्वतःचा एकाधिकार गाजवणाऱ्या मानवाला माझ्या येण्याने कळले असेल की, तो फक्त सृष्टीचा एक छोटा भाग आहे, संपूर्ण सृष्टी नाही. या भूतलावर अनेक जीव-जंतू, प्राणी, पक्षी आहेत आणि त्याचाही या पृथ्वीवर मानवा इतकाच आधिकार आहे. माझ्यामुळे कधीही कल्पना न केलेली परिस्थिती मानवावर ओढवली. ओसाड शहरे, निर्मनुष्य रस्ते, गाड्यांचा धूर नाही, उद्योगांचा गोंगाट नाही..सगळीकडे स्मशान शांतता. याच काळात पर्यावर्णनाने सुटकेचा श्वास घेतला. वृक्षांची ताजी हवा, प्राणांचा मुक्तसंचार, स्वच्छ प्रवाहित नद्या, दूरवरून दिसणारे स्पष्ट डोंगर, म्हणजे संपूर्ण निसर्ग त्याच्या मूळ स्वरूपात आहे. मी नसतो तर  कदाचित...

प्राधान्य

  मागच्या आठवड्यात आई आणि मी एका दादाला भेटले. अधून मधून कधी दुकानात हार घ्यायला येत असतो दरवेळी फार कमी बोलतो पण या वेळी जरा  गप्पा जास्तच रंगल्या. त्यात आईने सहज विचारलं  "कि काय करत आहे तू आता?" त्यावर तो म्हणाला, "स्पर्धा परीक्षा पुढच्या महिन्यात आहे, त्याच वेळी एमए प्रथम वर्षाची पण परीक्षा आहे. समजतच नाही काय करू ते? " प्रश्न लक्षात आला. तो होतकरू होता आणि स्पर्धा परीक्षेची पण तयारी जोमात सुरु होती. आई म्हणाली तुला एक साधी गोष्ट सांगू का? ऐकशील न..आमच्या दोघांचाही "हो" ऐकल्यावर आईने गोष्ट सांगण्यास सुरुवात केली.  एकदा एक शेतकरी गावातील  एका माणसाकडे गेला आणि त्याला म्हणाला, "समजतच नाही काय करावं ते? शेतात पऱ्हाटी पेरली होती मात्र त्यात एवढं तण उगवलं कि पऱ्हाटीच्याही वर गेलं..समजतच नाही काय करावं?" त्यावर त्या माणसाने उत्तर दिलं, "सोपं आहे, पऱ्हाटी उपटून टाक". शेतकरी ठणक्यात म्हणाला,"काहीही का काहीही सांगता! अशी कशी उपटून टाकणार." यावर तो माणूस म्हणाला, "अरे भल्या माणसा उत्तर तर तुझ्याच कडे आहे." आईची गोष्ट ऐकून,...

आयुष्याची वाट नेमकी कुठे?

 आयुष्य शब्द उच्चारताच आपल्या जीवनातल्या संपूर्ण आयुष्याची आठवण येते. मग त्यात इतिहास असो वा भविष्य. कधी आयुष्य हसत-हसत हसवतं, तर कधी रडत-रडत रडवतं. कधी हसत रडवतं तर कधी रडत हसवतं.  नेमका ऊन सावली असल्याचा खेळ हा आपल्या सोबत खेळून निघून जातं. कधी त्याचं रूप हे नदीतल्या खळखळणाऱ्या पाण्यासारखं असतं तर कधी समुद्राच्या लाटांसारखं. कधी एकाच क्षणाला खूप काही देऊन जातं तर कधी एकाच क्षणाला खूप काही घेऊन जातं.  जीवनात येणाऱ्या प्रत्येकाशी ओळख करून देतो आणि नकळत प्रत्येकांबद्दल भावना निर्माण करून निघून जातं. आणि या भावनातच कधी कुणाबद्दल राग, कधी चीड, कधी प्रेम उत्साह तर कधी समाधान निर्माण होते. कधी याच आयुष्यात त्या बांधलेल्या धाग्याप्रमाणे गुंतल्यासारखं वाटतं तर कधी संथ पाणी असलेल्या नदी किनाऱ्यासमोर बसून थंडगार वाऱ्याचा आस्वाद आणि मोकळा श्वास घेतल्या सारखं वाटतं. आयुष्याची व्याख्या कशी करायची तेच नेमकं कळत नाही? कारण प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळं असतं, बदलत असतं.  "आयुष्याच्या आयुष्यात आयुष्य जगणं फार कठीण आहे कि सोपं हे आयुष्यच शिकवतं" .  आयुष्याचा रस्ता तर खडतर असतो पण ...