आज चित्र काढत असताना, सहज एका काकूने म्हटलं, "काय चित्र काढत बसलीस, काहीतरी महत्वाचं काम कर.." मग काय चित्र काढूच नये? की काढावं.
खरंतर बालमानसशास्त्रात चित्रांना आगळेवेगळे महत्व आहे. चित्रे काढणे हे व्यक्त होण्याचे माध्यम आहे. भिंती, फरशी खराब होते असे असंख्य कारणे तयार असतातच.
'हे नको करू, ते नको करू' या गोष्टींमुळे मुलांच्या मनावर प्रचंड तणाव येतो. मग दुष्परिणाम हेच की त्यांची काल्पनिक शक्ती किंवा विचार करण्याची, प्रदर्शित करण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची वृत्ती विकसित होत नाही. मग मोकळेपणाने चित्र काढणे, खेळणे, बागडने हाच त्यावर उपाय.
नुकतीच घडलेली एक गोष्ट बघा, माझ्या मैत्रिणीच्या छोट्या बहिनेने एक चित्र काढलं आणि ते आम्हाला दाखवलं. त्यात तिने लाल नदी काढली. म्हणून काकू ओरडली या भावनेने की, "काय हे रक्त काढलं म्हणून". कोव्हिडमुळे तिचीही मानसिकता थोडी नाजूक झाली होती. ती आमच्या सर्वांमधून लहान होती आणि म्हणून तिची कल्पकता, विचार खरे तर आपल्याही कल्पनाशक्तीच्या पलीकडे असू शकते. मला वाटतं की त्या लाल नदीला रक्त म्हणून सीमित करता येणार नाही, त्यात नक्कीच लहान पंखाने घेतलेली झेप दडलेली असू शकते!!!
Comments
Post a Comment