Skip to main content

रमाईची शिकवण!!

 


महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन घडविण्यात रमाईचा मोठा वाटा आहे. रमाई म्हणजे बाबासाहेबांची सावली. रमाईच्या जीवनाच्या अनेक घटना आहेत पण काही तर हृदयाला स्पर्श करणाऱ्या आहेत.

एका प्रसंगी बाबासाहेबांच्या सत्कार समारंभात रमाईला नेसायला लुगडे नव्हते. तेव्हा रमाईने बाबासाहेबांचा फेटा लुगडे म्हणून घातला. गरिबीची केवढी मोठी शोकांतिका! 

पण रमाईच्या त्यागामुळे आज लाखो महिलांचे जीवनच बदलून गेले आहे. असं म्हणतात, "रमाबाई संसारात रमल्या आणि भीमराव पुस्तकात". 

बाबासाहेब तहानभूक विसरून पुस्तक वाचण्यात दंग असत. एकदा जेवण्याची वेळ झाली असता रमाबाईंनी त्यांच्यापुढे जेवणाचे ताट ठेवले. पण जेव्हा रमाबाई परत आल्या तरी बाबासाहेबांनी जेवण केलं नव्हतं. मग रमाईने वाचत असलेल्या पुस्तकाचे पानं उघडत म्हणाल्या, "बायकोशी कसं वागावे, कुटुंबाशी कसं वागावे हे लिहिलं असेल तेवढं मला वाचून दाखवा". बाबासाहेब हसले आणि म्हणाले, "अगं वेडे असं काहीही नाही लिहिलंय यात'. 

बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक संकटात रमाई संघर्षारत राहिल्या, हालअपेष्टा, दुःख गरिबी यावर मात केली. बाबासाहेबांपर्यंत दुःखाची झळ कधी पोहुचू दिली नाही. मातेसाठी तिचा मुलगा मरण पावणे यासारखे जगात दुसरे दुःख नाही. रमाईचे तर एका पाठोपाठ तीन मुलगे आणि एक मुलगी औषधपाण्याविना तडफडून मरण पावले. 

बाबासाहेब व रमाबाई राजगृहात राहत असताना बाबासाहेबांना अचानक विदेशात जावे लागत होते. बाबासाहेबांनी धारवडच्या वराळे या आपल्या मित्राकडे काही दिवसासाठी रमाईला पाठविले. वराळे काका लहान मुलांचे वसतिगृह चालवत होते. त्यांच्या आवारात नेहमी लहान मुले खेळायला येत असत. दोन-चार दिवसात रमाईला त्या लहान मुलांचा लळा लागला. दोन दिवस झाले तरी मुले आवारात दिसले नाही म्हणून रमाईने काकांना विचारले. काका म्हणाले की मुले तीन दिवसापासून उपशी आहेत. वसतिगृहाला अन्नधान्यासाठी मिळणारे अनुदान अजून मिळाले नाही. हे सांगतांना वराळे काकांचा कंठ दाटून आला. तत्क्षणी रमाईने कपाटातील डब्यातील सोन्याच्या बांगड्या वराळे काकांना दिल्या आणि म्हणाल्या, "या बांगड्या विका किंवा गहाण ठेवा पण मुलांच्या जेवणाची त्वरित सोय करा". यावर बाबासाहेब काय म्हणतील याचा त्यांनी क्षणभरही विचार नाही केला. सोन्याच्या मुल्यापेक्षा त्यांच्या मनातील मुलांप्रती करुणा मौल्यवान ठरली. अशिक्षित असूनही बाबासाहेबांच्या कर्तृत्वला साजेशी आणि स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता रमाईत होती.

अशी ही आपल्या सर्वांची थोर रमाबाई!

Comments

Popular posts from this blog

My Drawings✏😇

कला वाट पाहतांना एक सुंदरी.....😍 माझ्या स्वप्नातली एक सुंदर परी.....💗 पक्ष्यांची उंच भरारी...🐦🕊 माझी आई..💗   नयन...👁

प्रवासातील अनुभव (भाग 2)

प्रवासातील अनुभव (भाग 2) कितीतरी दिवसानंतर आपण फक्त काही दिवसांसाठी घरी🏠 जात असतो म्हणून माझी 🕋कॉलेजला परत येण्याची इच्छाच नव्हती. ओढ जरी घरचीच असली तरी मनाला आवरत 🙂कॉलेजला परत यावेच लागते. येतांना घडलेला एक प्रसंग..  नेहमीप्रमाणे आजही बाबा म्हणाले,"बेटा लवकर आटप आपण एक तास अगोदर पोहचायला हवं". मी म्हणाली,"बाबा आपण अर्धा तास अगोदर निघूया". बाबा काही मानले नाही शेवटी एक तास अगोदरच नागपूरच्या रेल्वे स्थानकावर 🚞आम्ही पोहोचलो.  तिकीट काढलं पण तरी एक तास वेळ होता 😶अजून ट्रेन यायला. माझे बाबापण दुसरं कोणी दिसलं कि त्यांच्याशीच गप्पा 😀आणि मी इथे कंटाळत 😔होती. माझं फक्त इकडे-तिकडे पहाणं👁, येणाऱ्या-जाणाऱ्या ट्रेन कडे कंटाळलेल्या नजरेने😒 पहाणं बस हेच सुरु होतं. आणि त्यात स्टेशनवर वस्तू विकणाऱ्यांच्या आवाज👻.  त्यातलाच एक मुलगा 👦,कदाचित आठवीतल्या वयाच्या मुलाएवढाच असावा. जोरजोराने ओरडत होता 'पानी थंडा-थंडा पानी". मी मनात म्हटलं काय मुलगा आहे, कसले घाणेरडे कपडे आहे याचे, कसला दिसतो 😒आहे, कसला अनाडी आहे. जाऊ दे रे बाबा🙅, मी पण हे काय विचार करत बसल...