आयुष्य शब्द उच्चारताच आपल्या जीवनातल्या संपूर्ण आयुष्याची आठवण येते. मग त्यात इतिहास असो वा भविष्य. कधी आयुष्य हसत-हसत हसवतं, तर कधी रडत-रडत रडवतं. कधी हसत रडवतं तर कधी रडत हसवतं.
नेमका ऊन सावली असल्याचा खेळ हा आपल्या सोबत खेळून निघून जातं. कधी त्याचं रूप हे नदीतल्या खळखळणाऱ्या पाण्यासारखं असतं तर कधी समुद्राच्या लाटांसारखं. कधी एकाच क्षणाला खूप काही देऊन जातं तर कधी एकाच क्षणाला खूप काही घेऊन जातं.
जीवनात येणाऱ्या प्रत्येकाशी ओळख करून देतो आणि नकळत प्रत्येकांबद्दल भावना निर्माण करून निघून जातं. आणि या भावनातच कधी कुणाबद्दल राग, कधी चीड, कधी प्रेम उत्साह तर कधी समाधान निर्माण होते. कधी याच आयुष्यात त्या बांधलेल्या धाग्याप्रमाणे गुंतल्यासारखं वाटतं तर कधी संथ पाणी असलेल्या नदी किनाऱ्यासमोर बसून थंडगार वाऱ्याचा आस्वाद आणि मोकळा श्वास घेतल्या सारखं वाटतं. आयुष्याची व्याख्या कशी करायची तेच नेमकं कळत नाही? कारण प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळं असतं, बदलत असतं.
"आयुष्याच्या आयुष्यात आयुष्य जगणं फार कठीण आहे कि सोपं हे आयुष्यच शिकवतं".
आयुष्याचा रस्ता तर खडतर असतो पण तरीही तो सोपा वाटतो कारण नकळत काही गोष्टी आपण करतो. जेव्हा कळतं तेव्हा तोच रस्ता विचकट, अडकणारा गुलाबाच्या काट्यासारखा वाटतो.
कधी डोळ्यात अश्रू असताना सुद्धा आयुष्याचा नट बनून आयुष्यात असणाऱ्या लोकांसाठी हसावं लागतं. कधी या गोड हसणाऱ्या ओठांच्या मागचं लपलेलं दुःख कोणी ओळखतं तर काहींना तर त्याची भुरळच पडते.
कधी काही गोष्टींना पकडून आयुष्याची वाट लावायला निघत असतो तर कधी अर्जुना प्रमाणे धैर्य आणि शौर्याने आयुष्य घडवायला निघत असतो.
हाच आयुष्य स्वतंत्र मिळाल्यानंतर शिवाजी महाराजांसारखा गजर करायला लावतो तर कधी टोकदार तिर लागणाऱ्या रावनाप्रमाणे तडपत मरायला लावतो. यात खरा बदलाव तर आयुष्याला येत असतो आपलं मनही तेच असतं, डोकही तेच असतं. आपल्याला दुसऱ्यांशी खेळायला आवडतं म्हणून आयुष्यालाही आपल्या सोबत खेळायला आवडतं.
का म्हणून इतके वर्ष आयुष्याशी खेळायचं, का म्हणून त्याला इतकं जवळून घ्यायचं, का त्याच्या सोबत जगायचं.
आयुष्याने त्याच्या आयुष्यात फक्त एक भाग बनवण्याचा प्रयत्न केला आणि आपण सगळे बनलो. खूप झालं हे पुरेसे झालं..
"शेवटी मला एवढंच सांगायला आवडेल..आता आयुष्यचा एक भाग नाही मला अख्ख आयुष्य जगायला आवडेलं.."
Comments
Post a Comment