पावसाळा हा बहुतेक सर्वांनाच आवडतो. लहान मुलांना तर हा ऋतू अत्यंत आवडीचा असा ऋतू आहे. कारण या काळात आईवडिलांनी कितीही रागवलं तरी पावसाच्या सरीत जाणूनबुजून भिजतांना फार मजा वाटत असते. त्यातच त्या चिखलात नाचतांना व कपडे भरवतांनाही फारच गंमत येते. पावसाच्या पाण्यात चिंब चिंब भिजण्यात सर्वात जास्त मजा ग्रामीण भागात असते. पावसाळ्यात सतत पडणारं थंड पाणी. त्यातच जमीनीत उगविलेली हिरवळ जणू डोळ्याचं पारणं फेडीत असते. त्यातच या गवतावरून त्या गवतावर उडणाऱ्या फुलचुख्या मन मोहून टाकत असतात.
त्यातच रंगबेरंगी दिसणारे वा मन मोहून टाकणारे फुलपाखरूही आपल्या अजब रंग व ढंगांनी आकर्षित करीत असतात. त्यातच अधून मधून बेडकांचे डराव डराव ऐकायला येत असते पावसाची ही हलकीशी सर, त्यातच खाली हिरवळ, सोसाट्याचा मंद मंद वारा, ढगांचा आवाज व विजेचा गडगडाहट त्यातच कधी इंद्रधनुष्य. खरंच पावसाळा हा ऋतू जरी लोकांना आवडत नसेल पण तरी पावसाची रम्यता इतकी आहे की ती बोटावर सहज मोजता येत नाही. आणि म्हणून असचं वाटतं की हा रमणीय पावसाळा कधी संपूच नये!
Comments
Post a Comment