हल्ली ढोंगी साधू-संतांनी आपापली दुकाने थाटली आहेत. अजूनही कित्येक जण स्वैर आकाशात शुभ्रपणा दाखवण्यात मग्न आहेत. यात चूक त्यांची नाही, चूक त्यांच्या नादाला लागणाऱ्या, नीतिमत्ता गहाण टाकलेल्या मुखवट्यांची आहे. आमच्या डोक्यात संत तुकारामाची बुद्धिप्रामाण्यवादी भूमिका ते संत गाडगेबाबांचा बुरसटलेल्या विचारांना स्वच्छ करणारा खराटा असता, तर अश्या दिवसांचा सूर्योदय कायमचा अस्तास गेला असता.
संताचा कर्मभूमीने सुगंधित महाराष्ट्रात अजूनही ग्रामस्वच्छता अभियान राबवावे लागते, हे खरे तर आपल्या संस्काराचे फार मोठे अपयश आहे.
"मला कोणी गुरू नाही, मले कोणी चेला नाही" असे ठामपणे सांगणारे गाडगेबाबा कधी मंदिरात गेले नाही, पण त्याच्याकडे जाणारी पायवाट नेहमी स्वच्छ करत राहिले. ते कधी शाळेत गेले नाही पण सर्वसामान्यांची लेकरे शिकून मोठी व्हावीत, म्हणून अख्खी हयात खर्ची घातली. हा प्रबोधनाचा वारसा आपण पुढे न्यावा बस एवढंच! प्रबोधन रथातून बाबांनी विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जनमानसात रुजवला, तो प्रबोधनरथ समाजस्थळावर कितपत पडला आहे.
"संत गाडगेबाबा केवळ व्यक्ती नाही तर तो एक विचार आहे"
भयमुक्त समाज निर्माण करणारा हा विचार आहे.
हा विचार तुमच्या मनातील धर्म, ग्रह, तारे, कुंडली यातून येणारे भय काढून टाकतो. हा विचार समाजाला नवी दिशा देतो. ती ही प्रकाशाची!!
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!
Comments
Post a Comment