हल्ली पोस्ट ऑफिस(डाक घर) या नावाशी आपला तसा कमी संपर्क येतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे सुद्धा आठवत नसेल की आपण या आधी केव्हा पोस्ट ऑफिसमध्ये गेलो होतो. आता प्रत्येकाकडे मोबाईल आला आहे परंतु एक काळ होता जेव्हा टेलिफोन सुद्धा क्वचितच बघायला मिळायचं. तेव्हा सगळेजण ख्यालीखुशाली कळवायला पत्र लिहायचे. ते तिकीट, पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्र इत्यादी. आज आपल्याला कोणाशी बोलायचे असल्यास लगेच फोन करून मोकळे होतो, किंवा व्हाट्सअँपवर मेसेज पाठवून, हल्ली एकमेकांचे स्टेटस बघून आपल्याला एकमेकांबद्दल कळतं. पण पत्रांची मज्जा काहीतरी वेगळीच होती. माझं पत्रांशी नातं जुळलं ते लहानपणी. बाबा नेहमी कुठलाही सण असला की जवळच्या नातेवाईकांना शुभेच्छांचे पत्र पाठवायचे. त्यामुळे नातेवाईकांची नावांची, पत्ता या सगळ्यांची यादी बनवायला बाबा मला सांगत असे. पत्र लिहिताना सुख-दुःख अशा भावना व्यक्त करायचे किंवा मोठांचा आशीर्वाद, लहान मुलांसाठी गोड गोडं पापा. आणि हे सगळे पत्र टाकण्यात खूपच कुतूहल वाटत असे.
पोस्टमन काका आमचे दैवत. त्यामुळे ते आले की सगळ्यांना फार आनंद व्हायचा. कारण कितीतरी दिवसानंतर पत्राचं उत्तर कळायचं. त्यांचा आगमनाची सोय घरी नेहमीच असायची. त्यांना बसवून पाणी, चहा कधी तर नाश्ता पण व्हायचा. त्याच बरोबर घराच्या मंडळींशी त्यांनी सादर केलेल्या नातेवाईकांचा भावना, हावभाव रंगायचा. या बदलत्या परिस्थितीनुसार फोन, टॅबलेट इत्यांदींमुळे पत्राचं नातं तुटतयं.
या सगळ्यांची खंत थोडीफार का होईना पण अजून तरी वाटतंय. कारण पत्रं फक्त पत्र नसायचं ते एक परस्पर रडवणारं हसवणारं माणुसकीचं नातं असायचं..!
Comments
Post a Comment