Skip to main content

Posts

Showing posts from 2022

गोव्याची अविस्मरणिय ट्रिप

भर दुपारी गोव्याला निघालो प्रवास तो आमचा कारमधला त्यामुळे वाहनांची काळजी नव्हती. सूर्याचे कडक ऊन काचेवर बरसत होते. त्या बारसत्या उन्हात पुन्हा सूर्याकडे बघितलं कि डोळे मिचमिचयचे. या शहराच्या रस्त्यातून आपली गाडी खेड्यात यावी हि वाट होती. मग संध्याकाळ होताच ती खेडाच्या गाभाऱ्यात शिरली. मोकळा रस्ता नि संध्याकाळची ती वेळ. तर्हेतर्हेच्या पानाफुलांचा गंध नि आकाशातल्या विविध रंगी रंगलेल्या रंगछटा. इतकं सुंदर हे निसर्ग. कधी वाटे हाताच्या एका मुठीत पकडावासा पण फक्त भास-आभास दाखवतं हे निसर्ग. खिडकीची काच बंद असताना वाऱ्याचा आभास नव्हता पण निसर्ग रंगाची छटा डोळ्यांमध्ये सतत झळकत होती. प्रत्येक वाट संपल्यानंतर वारा पुन्हा पुन्हा भेटायला येत आहे असं सतत वाटायचं. मन हर्षाने फुलत राहिलं कधी त्या उपमा दिलेल्या आकाशाकडे डोकावून बघताना तर कधी मलाच मी विसरताना. वाहनांची शर्यत लागल्याप्रमाणे समोरच्या प्रत्येक गाडीला मागे टाकत आमची गाडी पुढे चालली होती. वळणावरती वळण आलेत पण वेग मात्र एकशे साठ. विमान बनून उडवते कि काय? असं झालय आम्हाला. रात्रीच्या अंधारात वाटेत कुत्रे-मांजर दिसले कि ग...

व्यसनमुक्ति निर्धार

कित्येकदा ऑफिस मधून घरी येताना आयटी पार्कच्या रस्त्यावरील दुकानांमध्ये तरुण वयोगटातील मुले सिगारेट पितांना दिसतात. कधी घोळक्यात तर कधी एकटे ओढताना दिसतात. याने पर्यावरण तर दूषित होतं आणि आसपासच्या लोकांनाही श्वास घेताना त्रास जाणवतो. आणि हा विषय जर चर्चेत आणला तर त्यांना नकोसं होतं. कुणी म्हणतात, "It's just for fun and just maintain standard of living". हे ऐकून तर मी मात्र विचारात पडले. हल्ली तर शिक्षणासाठी बाहेर गेलेले विध्यार्थी कुसंगतीमुळे व्यसनाच्या वाईट मार्गावर जातात. नशा व अपयशाची नैराश्य यातून तरुणांच्या अनेक पार्ट्या होतात. व्यसनाचे अनेक दुष्परिणाम समाजामध्ये पाहायला मिळतात. व्यसनामुळे तरुणांची तेजस्विता नष्ट होते. अनेक रोगांना बळी पडून व्यसनाधीन माणसांना अकाली मृत्यू येत आहे. आणि म्हणूनच व्यसन लावून न घेणे हा कदाचित व्यसन मुक्तीचा पहिला मार्ग असू शकतो. आधी गावात एखादा जर दारू प्यायला तर अख्खा गाव, तो चुकीची गोष्ट करत आहे, या नजरेतून त्याच्याकडे बघत असे. आजची परिस्थिती विरुद्ध झाली आहे. प्रतिष्ठेच्या नावाखाली एखादा जर व्यसन नसेल करत, तर तो चुकीचं करत आहे य...

आनंदाचे वाटप

आजी नेहमी सांगायची की आपण आपल्या गुणांवरून स्वभावावरून ओळखले जातो. चांगला स्वभाव नि चांगले गुण असले की ती व्यक्ती चांगली आहे असं प्रत्येकाला वाटतं. पण याहीपेक्षा पलीकडची पायरी चढणारे असतातच. जे स्वतः करिता, परिवाराकरिता नि दुसऱ्यांकरिता पण जगतात. आयुष्याच्या या वाटेवर पुन्हा एकदा एका नवीन व्यक्तीशी ओळख झाली. भारदस्त व्यक्तित्व, आनंदी स्वभावाचे नि नेहमी हसत राहणारे असं काहीसं माझ्या दृष्टिकोनातून त्यांचं व्यक्तिमत्व. आमची फार छान ओळख झाली नि मैत्री पण. म्हणून कधी ते आम्हाला छान गोष्टी सांगतात तर कधी आम्ही त्यांना. त्या दिवशी पण बोलता बोलता त्यांनी सहज संगितलं, की आज छोटूच्या शाळेत आम्ही दान करून आलोय. ऐकून कानाला फार छान वाटलं कारण इतके मोठे असूनही कुठलाही गर्व न बाळगता कुणालाही मदत करणं हे त्यांच्या मूळ स्वभावातच. आणि म्हणतात ना की सद्गुणांची ज्योत जवळ असली की प्रकाशाला कुणीही थांबवू शकत नाही. हीच गोष्ट दसऱ्याला मी एका दादाला सांगितली. तर त्यानी पाच हार जास्त घेतले. मी सहज विचारलं का दादा? ते म्हणाले की आज दसऱ्याला वस्तुंना हार चढवणे/ त्यांची पूजा करणे नियम आहे. यातून काही ह...

त्यांच्याकरिता

रोजप्रमाणे त्या दिवशी पण ती ऑफिस मधून घरी जायला निघाली. मोठे रस्ते नि अजूबाजुला सिमेंट रेतीचे मोठया इमारती बघून तिला आनंद झाला. तिला कळलं की आपला भारत वेगाने प्रगतशील होत आहे. हा विचार करत ती पुढचं पाऊल टाकत गेली. समोर तिला एक गाय दिसली, तहानलेली होती त्यामुळे रस्त्यावर साचलेलं पाणी पीत होती. तिला पाणी कमी पडू नये म्हणून तिने आपल्या बॉटल मधील पाणी दिलंय. ती पुढे निघाली. पण तिला पाण्याचं असलं कुठलाही स्रोत नाही दिसला ज्यात या परिसरात राहणाऱ्या जनावरांना-पक्ष्यांना पाणी देता येईल. तिचे विचार सुरू, भारत प्रगतशील च्या मार्गावर वेगाने भरारी घेत आहे. पण मग या वातावरणाची, पक्षांची-जनावरांची काळजी घेणं का विसरतोय? त्या दिवसापासून तिने या प्राणी-पक्षांसाठी पाणी ठेवायला सुरुवात केली. आज आपणही करूया नि एक पाऊल पुढे टाकूया.

मजा

दोन मिनिटात मॅगी तयार होणार, अर्ध्या तासात मशीन ने कपडे धुतले जातील,एका सेकंदाच्या आत हा संदेश दुसऱ्याला पाठवण्यात येईल , सोशल मीडिया अप्स ने एकासेकंदाच्या आत इमोशन बदलता येईल , दिवसाला मोबाईल द्वारे नाईट मोड पण सुरु करता येईल. तंत्रध्यानाचे असे कितीतरी उदाहरणे द्यावे तितके कमीच . काम तर सोपं झालं पण टाइम मॅनेजमेंट च्या धुंदीत संयम ठेवणे विसरतो आहे . लवकर पोहोचण्याच्या धुंदीत जाताना हवेचा अनुभव घेणं विसरतो असं काका म्हणाले. मी थोड्यावेळ स्तब्ध राहून ऐकत होते आणि नंतर विषय निघाला तो सभोवताली जीवनाचा. मग काय! काकांचं बोलणं मात्र सुरूच . पोरी शॉवर पेक्षा पावसाच्या पाण्यात भिजण्यात मजा आहे , कधी रस्तात एक मिनटं थांबून या भीरभिरणाऱ्या फुलपाखरांकडे बघण्यात मजा आहे, खचलं तरी संपलं नाही तर धीर धरण्यात आनंद आहे, पूजा दुसऱ्याच्या हातून नाही तर स्वतःच्या हातून करण्यात मजा आहे, पक्ष्यांसाठी आणि जनावरांसाठी अंगणात पाणी आणि खाऊ ठेवण्यात मजा आहे, प्रशंसा स्वतःची करण्यापेक्षा दुसऱ्यांची करण्यात मजा आहे, कपडे खराब होईल हा विचार करण्यापेक्षा साचलेल्या पाण्यात उड्या मारण्यात मजा आहे, न ...

वेगवान पाऊस

थांब जरा म्हटल्यावर तरीही आलास तू, भिजवू नको म्हटल्यावर तरीही भिजवले तू, छत्री नाही सांगितल्यावर सुद्धा जोरात पडलास तू, त्या गरिबांच्या घरी पाणी साचतंय पण निरंतर राहिला तू, रस्त्यावरची दुकाने उठवावी लागणार ठाऊक असताना येत राहिला तू, पूर आला नदीला पण बरसत राहिला तू, घर लागली वाहायला पण सतत राहिला तू, माणसं लागली मरायला पण वेग वाढवला तू, इतकं सगळं झाल्यावर सुद्धा शेवटी नाही थांबला तू..?

झेप

आज उडण्याची इच्छा होती पण हिंमत नव्हती. कारण मला उडवणारे माझे पंख तर पूर्णपणे भिजलेले होते. प्रयत्न करणे सोडून देणं हे मात्र चुकीचं असेल माझ्याकरीता म्हणून भिजलेले पंख फडफडायला लागले. मग वाऱ्याची साथ आणि सूर्याने तर कडक ऊन पंखावरती पडून हे पंख कोरडे केले. यांच्या मदतीमुळे पंख कोरडे झाले नि उडण्याची पण इच्छा आहे फक्त हिंमत नाही अजून. मान वर करून हे डोळे आभाळाकडे बघत राहिले तेव्हा या धारणीने हाक मारली. या धरती मातेने 'विजयी भव' म्हणत कपाळावर माती टिळक लावून दिला. आभाळ म्हणालं, 'आम्हाला विश्वास आहे तू नक्कीच इथवर पोहोचशील'. माझी धरती आई म्हणाली,'परत येताना जिंकण्याचा आनंद सोबत घेऊन ये'. या विश्वासाच्या हिमतीसोबत मी उंच भरारी घेतली... ती म्हणजे झेप.

माझं आयुष्य

माझं आयुष्य . मला वाटतं माझं आयुष्य सुगंधित फुलाप्रमाणे आहे , मग जिथे असेल तिथे सुगंध दरवळणे कधीच सोडत नाही . कधी वाटतं माझं आयुष्य भरभरून बहरलेल्या झाडाप्रमाणे आहे , जे वादळात खंबीरपणे उभं राहतं , जे कडक उन्हात छायेसाठी आलेल्याना सावली देतं नि पावसात छत्री बनतं . कधी वाटतं माझं आयुष्य फुलपाखरू प्रमाणे आहे विविधरंगी , कुठल्याही रंगात गेलं तर एक तरी रंग नक्कीच मिसळेल. कधी वाटतं माझं आयुष्य जलाप्रमाणे आहे , चव तर नाही पण महत्वाचं . कधी वाटतं माझं आयुष्य सूर्याच्या तेजाचं नि चंद्राच्या शीतलतेचं आहे . कधी वाटतं माझं आयुष्य सागरासारखं आहे , जिथे मर्यादा आहेत पण पंख कापून आत ठेवणारा पिंजरा नाही . मर्यादा जरी असल्या तरी लाटा खुशाल मर्यादेपर्यंत जाऊन मानमर्जीने वापस येतात . हो ना आयुष्य तर फारच सुंदर आहे

योग्य कि अयोग्य ?

योग्य कि अयोग्य ? हा प्रश्न कदाचित कित्येकदा माझ्या समोर असतो. आज पुन्हा एकदा हाच प्रश्न समोर होता. गोष्ट फार छोटीशी. आजीचं निधन झालं त्यामुळे घरी दुःखाचं वातावरण होत . जुनी चालत आलेली परंपरा आणि विधी - नियम . असं नाही चालणार / ते करू नये , असं सुरूच होत . नेहमी प्रमाणे मी आजही देवाजवळ दिवा लावला. अगदी निर्मळ मानाने - भावेने देवाकडे प्रार्थना केली . या परिस्थितीत येवढ मोठं वादळ माझ्यापुढे उभं राहील याची कल्पना नव्हतीच मला . सगळे माझ्यावरती ओरडायला लागले . "घरी कोणी मरण पावलं आणि हिला देवापुढे दिवा लावायचं सुचतंय ". मी शांत बसणाऱ्यांमधून नव्हतीच , मी प्रश्न केला ,"तुमच्या मधून सांगा मला कोणीतरी कि दिवा का लावू नये? ". त्यात मला उत्तर मात्र हेच मिळालं "देवावरची नाराजगी ". मग मी म्हणाले ,"मला मान्य आहे हे सगळं. मी फक्त आजवर, या विधी- नियम फक्त बघितले पण प्रमाण तर अजून सुद्धा नाही मिळालं मला . कोणाला मरण आलं तर देवाजवळ दिवा लावणे हे कसं चुकीचं ठरू शकतं?, त्यामुळे फार मोठा अनर्थ किंवा पाप घडेल हे मान्य नाही मला . मला माहित आहे यावेळेला सगळे दुःखात आ...

विचार

आज तिने छान फुले तोडली. एक सुंदर हार तयार केला. देवघर सुंदर फुलांनी सजवलं नि देवाजवळ रांगोळी काढली, हार चढवला नि प्रार्थना केली. "देवा सगळ्यांच दुःख दूर कर". तिकडून तिची आई आली. हे सगळं बघताच ती खूप खुश झाली. नि तिला म्हणाली, "माझी गुणाची बाळ ग". ही आनंदाची वेळ कधी संपूच नये असं तिला वाटलं. नंतर क्षणात पूर यावा तसच झालंय. जेव्हा तिच्या आईला कळलं की तिला पाळी आली, तिने लगेच मुलीवरती ओरडणं सुरू केलं. "तुला मी कितीदा सांगितलं की पाळी आली असता देवाला हात लावायचा नाही, दूर राहायचं, पण तू तर ऐकतच नाही". तिने बनवलेला सुंदर हार पण देवापासून काढण्यात आला. त्यात पाहुणे आले आणि पाहुण्यांमध्ये तर चर्चेचा विषयच बनला. तिच्या मनात असंख्य प्रश्न होते पण उत्तर तिला समाधानकारक कधी मिळालच नाही. अस कित्येकदा तिच्या बाबतीत नाही तर माझ्याही बाबतीत घडलंय. खरंच मुलींना पाळी आली की इतकं का बंधन असतं की तिने साधं आपलं मन सुद्धा देवासमोर व्यक्त न करावं? देवा समोर का जाऊ नये? मंदिरात जाऊ नये हे असले कसले बंधन? मुलींना पाळीत शारीरिक त्रासासोबत मानसिक तणावही जाणवतो. मग शांत, समाधानी...

जगावे ते दुसऱ्यांसाठी

कधी कधी ना मी फारच आनंदी असते. मग रत्यावरून जातांना काका काकुंशी बोलते , आजी आजोबांशी बोलते आणि माझ्या प्रिय बालमित्रांसोबतही बोलते . आज तर एका काकांशी भेट झाली . कडक नि भारदस्त व्यक्तित्व त्यांचं . क्षणात त्यांनी मला त्यांचा मुठीतच घेतलं बघा . आम्ही खूप बोललो निदान अर्धा तास तर झालेच असावेत . मिल्ट्रीत काम करतात असं त्यांनी सांगितलं . तसं विचाराने पण फार मोठे बरं . मला म्हणाले "शिक्षण याचं महत्त्व फक्त नोकरी पुरतं सीमित नसावे तर ते असं ध्येय साध्य करण्यासाठी असावं ज्यात दुसऱ्याचं हित सुद्धा लपलेलं असेल" . शिक्षणाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळाच. इतका पैसा आणि नौकर असून सुद्धा आजूबाजूला पडलेल्या रस्त्यावरचा कचरा वेळ मिळेल तेव्हा साफ करतात . खरंच माणूस मोठा शिक्षणाने मिळवलेल्या मोठ्या नौकरी मुळेच नाही तर ते छोट्या छोट्या सुधारणे मुळेही मोठी होतात . अश्या दृष्टिकोन ठेवणाऱ्यांची आणि अश्या सुधारणेची या भारताला आजही गरज आहे. कारण कुठलीही गोस्ट आपल्या देशातल्या माती पेक्षा मोठी असू शकत नाही.

दया

रोजप्रमाणे आजही मी त्याच रस्त्या वरून जात होती. नि त्या सफाई करणाऱ्या काकुंची भेट होणार हे नक्की माहीत होतं. नेहमी एक गोडं हास्य टिपलेलं असतं बघा. मग काय त्यांना बघून मग मी पण हसली. पण आज तर त्यांनी कमालच केली. खरच केली का की मलाच अस वाटतं हे नाही माहीत. रस्त्यावरचा आजूबाजूला पडलेला पूर्ण कचरा त्यांनी गोळा केला. आणि आता त्याला जाळणार तर त्यात त्यांना एका प्लास्टिक मध्ये बांधलेल्या शिळ्या चपाती भेटल्या. त्यांनी त्या प्लास्टिक मध्ये बांधलेल्या चपाती काढल्या नि आमचा बाजूला उभ्या असलेल्या दोन गाईला टाकल्या. खरंतार कचऱ्या सोबत त्या चपाती जाळल्या गेल्या असत्या पण त्यांच्यात असलेल्या दयेचा सागर खळखळून जागा झाला. काकू कमी शिक्षित असून सुद्धा काहीही न बोलता शिक्षणाचा खरा उपयोग, मनात करुणा आणि अन्नपूर्णा मातेचा आदर करावा ही शिकवण दिली.

सहज

मोकळेपणाने उडायचे आहे आभाळात या, बेधुंद व्हायचं आहे निसर्गात या... चिखलात भरलेल्या पावलांना स्वच्छ करून पुन्हा या मातीत भरावयाचे आहेत, कितीही पैसे कामावला तरी आपल्या माणसांना मात्र जपायचं आहे... ओढ नि अतुरतेची वाट या डोळ्यांना बस एकच आहे, ती म्हणजे समाजाला सकारात्मकतेने बदलवताना आणि बदलताना बघायचं आहे...

Happiest Birthday Pranu......

प्रेमाचं आणि आपुलकीच नातं सहज जुळलं, मग बहिणीचं आणि मैत्रीचं नातं अलगद बनलं... पानांवर साठवून ठेवलेल्या थेंबांसारखे हे रंग, रोज रोज हलके भांडून घट्ट झाले हे बंध... पावसाळी झालेल्या वातावरणात तुझा गाडीवर जाऊन यायची मला मजा, कधी रागावली थोडी तर वाटले देईल आता ही सजा... कधी धैर्याने समोर नेणारी मशाल बनायची, तर कधी तू माझी सुरक्षतेची ढाल असायची... मैत्रीचे मोठे वादे मला कधीच करता आले नाही, पण मैत्रीच्या नात्यात सापडणाऱ्याला कधीच सोडता आले नाही... मैत्री ही विश्वासाची, मैत्री ही आनंदाची, मैत्री ही हसण्याची हसवण्याची... ही अशी माझी मैत्रीची बादशाहा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..

आज दिवस पावसाळी

स्वच्छंद वारा आणि आज नभ असे रंगले, नैसर्गिक परिसराचा आस्वाद घेत मी मात्र दंगले... कळींची फुलली फुले, पाने गळती सुरू झाली, अशा या सुंदर वातावरणाने आज बघा कमालच केली... पावसाचे हे ओले थेंब पडती जेव्हा अंगावरती, सगळे विसरुनी गुंतलेले मन पुन्हा पुन्हा मोकळे होती... जेव्हा कागदाचे जहाज पाण्यावरती अलगद तरंगते, तेव्हा आमचे कोलगेट चे दात आणि ओठ फार खुलून हसते... अश्या या पावसाळी झालेल्या वातावरणात जेव्हा समोर येतं गरमा-गरम चहा आणि त्याचा सुगंध, तर वाट न बघता तो चहा पिताना होतो आम्ही भरभरून दंग... खरंतर अजूनही खूप सुचतंय, कळत नाही आता या कवितेचा कसा करू अंत.... !!!