भर दुपारी गोव्याला निघालो प्रवास तो आमचा कारमधला त्यामुळे वाहनांची काळजी नव्हती. सूर्याचे कडक ऊन काचेवर बरसत होते. त्या बारसत्या उन्हात पुन्हा सूर्याकडे बघितलं कि डोळे मिचमिचयचे. या शहराच्या रस्त्यातून आपली गाडी खेड्यात यावी हि वाट होती. मग संध्याकाळ होताच ती खेडाच्या गाभाऱ्यात शिरली. मोकळा रस्ता नि संध्याकाळची ती वेळ. तर्हेतर्हेच्या पानाफुलांचा गंध नि आकाशातल्या विविध रंगी रंगलेल्या रंगछटा. इतकं सुंदर हे निसर्ग. कधी वाटे हाताच्या एका मुठीत पकडावासा पण फक्त भास-आभास दाखवतं हे निसर्ग. खिडकीची काच बंद असताना वाऱ्याचा आभास नव्हता पण निसर्ग रंगाची छटा डोळ्यांमध्ये सतत झळकत होती. प्रत्येक वाट संपल्यानंतर वारा पुन्हा पुन्हा भेटायला येत आहे असं सतत वाटायचं. मन हर्षाने फुलत राहिलं कधी त्या उपमा दिलेल्या आकाशाकडे डोकावून बघताना तर कधी मलाच मी विसरताना. वाहनांची शर्यत लागल्याप्रमाणे समोरच्या प्रत्येक गाडीला मागे टाकत आमची गाडी पुढे चालली होती. वळणावरती वळण आलेत पण वेग मात्र एकशे साठ. विमान बनून उडवते कि काय? असं झालय आम्हाला. रात्रीच्या अंधारात वाटेत कुत्रे-मांजर दिसले कि ग...
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!