भर दुपारी गोव्याला निघालो प्रवास तो आमचा कारमधला त्यामुळे वाहनांची काळजी नव्हती.
सूर्याचे कडक ऊन काचेवर बरसत होते. त्या बारसत्या उन्हात पुन्हा सूर्याकडे बघितलं कि डोळे मिचमिचयचे.
या शहराच्या रस्त्यातून आपली गाडी खेड्यात यावी हि वाट होती.
मग संध्याकाळ होताच ती खेडाच्या गाभाऱ्यात शिरली.
मोकळा रस्ता नि संध्याकाळची ती वेळ. तर्हेतर्हेच्या पानाफुलांचा गंध नि आकाशातल्या विविध रंगी रंगलेल्या रंगछटा.
इतकं सुंदर हे निसर्ग.
कधी वाटे हाताच्या एका मुठीत पकडावासा पण फक्त भास-आभास दाखवतं हे निसर्ग. खिडकीची काच बंद असताना वाऱ्याचा आभास नव्हता पण निसर्ग रंगाची छटा डोळ्यांमध्ये सतत झळकत होती. प्रत्येक वाट संपल्यानंतर वारा पुन्हा पुन्हा भेटायला येत आहे असं सतत वाटायचं. मन हर्षाने फुलत राहिलं कधी त्या उपमा दिलेल्या आकाशाकडे डोकावून बघताना तर कधी मलाच मी विसरताना. वाहनांची शर्यत लागल्याप्रमाणे समोरच्या प्रत्येक गाडीला मागे टाकत आमची गाडी पुढे चालली होती. वळणावरती वळण आलेत पण वेग मात्र एकशे साठ. विमान बनून उडवते कि काय? असं झालय आम्हाला.
रात्रीच्या अंधारात वाटेत कुत्रे-मांजर दिसले कि गाडीच्या लाईटने त्यांचे डोळे चमकायचे. मग वाटे कि कदाचित भुतांची इमारत इथेच कुठेतरी असावी. एखादा तरी भूत दिसावा याची आम्हाला आतुरता होती पण शेवटपर्यंत दिसलाच नाही. कदाचित गाडीतल्या भुतांना बघून सगळे भुतं पळाले असावे अशी गमतीची चर्चा सुरूच. मग विचित्र घाबरणारी - हसवणारी आवाज काढायचा. मधेच बदलून कार रेसिंगच्या खेळामधली आवाजे काढायला सुरुवात झाली.
गाडीत असताना गंमतीसोबत आवडते गाणेही सुरु होते. त्यामुळे ह्या प्रवासाला संपणारी सीमा नसावी असं मला वाटायला लागलं. प्रत्येक गोष्टीवरती खळखळून हसणं आणि गाणे गुणगुणत गाडीमधील गोडवा वाढत चाललेला होता. आमच्या छोटूच "मनुका " गाणं हे फार आवडतं. तुम्हाला हि प्रश्न पडलाच कि नाही? "मनुका गाणं ". एका अतिशय सुंदर गाण्याचं नाव आमच्या छोटूने "मनुका" म्हणून ठेवलाय बर का. हा प्रवास संपला तो अंबोली घाटला.
"अंबोली घाट" हे छोटंसं सुंदर असं निसर्गाने तयार केलेला धबधबा. मग छोटंसं का होईना याही धबधबाने भुरळच पाडली बघा. वरून वेगात उसळणारं पाणी सतत वाहताना बघितलंय. मग त्या छोटाश्या पहाडावरून चढायचं नि पाणी हातात घेऊन तुषार सिंचनाप्रमाणे उडवायचे. आणि त्या सकाळच्या प्रहरी गरम चहा-पाव नि मॅगी खाल्यानंतर निघालो ते विलाला. वीला म्हणजे एक इमारत जिथे घरां सोबत "स्विमिंग पूल" आणि खेळण्यासाठी छान रुंद जागा असते. तिथे मी आणि छोटू चेंडू खेळताना बघून बाकीच्यांची पण चेंडू खेळायची हौस वाढली. रात्रीला "डॉक्टर माफिया आणि व्हिलेजर्स", "पूल गेम्स" पण खूप खेळले सगळे. ज्याच्यावरती डाव मग त्याने काय करायचे हे सगळे मिळून सुचवायचे.
गोव्याला खरेदी हि आम्ही केली कोणी कपडे घेतले तर कोणी टोपी-दागिने. ऊन फार कडक होत त्यात माझी खरेदी म्हणजे पाण्याची बॉटल्स घायचे आणि तहान लागलेल्यानी मागितली कि त्याची तहान भागवायची.
दुसऱ्यादिवशी रात्रीला आम्ही सगळे समुद्र बघायला निघालो. खूप नाचलो समुद्र काठावरती पण आमचं नाचणं काही थांबेना. मी तर समुद्राकडे रात्रीलाही एकटक पाहत होते कारण अथांग मायेचं सागर माझा समोर मला मिळालं. रात्रीला ते समुद्र कदाचित बरोबर नाही दिसलं. पण दुपारला मात्र डोळेभरून ते समुद्र मी बघितलं. जवळ उभं राहिलं कि धावत येणाऱ्या लाटा पायांना स्पर्श करून निघून जात होत्या. पण तो क्षणभराच्या स्पर्शानेही मन समाधानी नि आनंदून जायचं. किनाऱ्याच्या लाटांसोबत खेळण्याचीही आपली वेगळीच मजा. समुद्राचे खेळ खेळताना तर कधी भीती, गंमत नि मजा वाटली. समुद्रपाण्याच्या आत जाऊन विविधरंगी मासे बघायचे, तर कधी फुग्यावर बसून अख्य समुद्र न्ह्याहाळायचं, तर कधी वेगवान गाडी समुद्रावरती चालवायची, आणखी कितीतरी खेळ खेळून झालाय.
"दूधसागर धबधबा" ला जेव्हा पोहोचलो तेव्हा कळलं कि भारतातला दुसरा मोठा धबधबा आहे. इतकं ऊन असून सुद्धा तिथलं पाणी शुद्ध नि थंडगार होतं. विशेषतः "चेन्नई एक्सप्रेस" या चित्रपटामधील हा धबधबा म्हणून ओळख.
माझ्यासाठी मी बघितलेल्या समुद्राचं आकर्षण मनी वाढत राहिलं. तिथून कधी कसं घराच्या दिशेने वळण घेतले याचा पत्ता सुद्धा लागला नाही.
येताना मात्र या निसर्गाचं रूप बघण्याशिवाय माझ्याकडे काहीच राहील नाही. जंगलातून गाडी जात असताना उंच दरीतून "रोलर कोस्टर राईड" आम्ही अनुभवली. एका "विऊ पॉईंट" वरती जेव्हा आम्ही थांबलो. तेव्हा वाटलं अख्ख निसर्ग आपण जिंकलाय. बेधुंद वारा सुटलेला नि खोलवर दरी. कॅमेरामध्ये कसं आणू या सर्वांना मला माहित नाही पण डोळ्यात माझा अजूनही साठवून ठेवलाय. शेवटी सांगू तरी काय?
निसर्गाच्या प्रेमात तर आधीच होते आणखी त्याकडे बघून खोलवर त्याच्या प्रेमात पडले नि निसर्गरंगीन प्रेमात अडकून बसले.
कधी वाटे हाताच्या एका मुठीत पकडावासा पण फक्त भास-आभास दाखवतं हे निसर्ग. खिडकीची काच बंद असताना वाऱ्याचा आभास नव्हता पण निसर्ग रंगाची छटा डोळ्यांमध्ये सतत झळकत होती. प्रत्येक वाट संपल्यानंतर वारा पुन्हा पुन्हा भेटायला येत आहे असं सतत वाटायचं. मन हर्षाने फुलत राहिलं कधी त्या उपमा दिलेल्या आकाशाकडे डोकावून बघताना तर कधी मलाच मी विसरताना. वाहनांची शर्यत लागल्याप्रमाणे समोरच्या प्रत्येक गाडीला मागे टाकत आमची गाडी पुढे चालली होती. वळणावरती वळण आलेत पण वेग मात्र एकशे साठ. विमान बनून उडवते कि काय? असं झालय आम्हाला.
रात्रीच्या अंधारात वाटेत कुत्रे-मांजर दिसले कि गाडीच्या लाईटने त्यांचे डोळे चमकायचे. मग वाटे कि कदाचित भुतांची इमारत इथेच कुठेतरी असावी. एखादा तरी भूत दिसावा याची आम्हाला आतुरता होती पण शेवटपर्यंत दिसलाच नाही. कदाचित गाडीतल्या भुतांना बघून सगळे भुतं पळाले असावे अशी गमतीची चर्चा सुरूच. मग विचित्र घाबरणारी - हसवणारी आवाज काढायचा. मधेच बदलून कार रेसिंगच्या खेळामधली आवाजे काढायला सुरुवात झाली.
गाडीत असताना गंमतीसोबत आवडते गाणेही सुरु होते. त्यामुळे ह्या प्रवासाला संपणारी सीमा नसावी असं मला वाटायला लागलं. प्रत्येक गोष्टीवरती खळखळून हसणं आणि गाणे गुणगुणत गाडीमधील गोडवा वाढत चाललेला होता. आमच्या छोटूच "मनुका " गाणं हे फार आवडतं. तुम्हाला हि प्रश्न पडलाच कि नाही? "मनुका गाणं ". एका अतिशय सुंदर गाण्याचं नाव आमच्या छोटूने "मनुका" म्हणून ठेवलाय बर का. हा प्रवास संपला तो अंबोली घाटला.
"अंबोली घाट" हे छोटंसं सुंदर असं निसर्गाने तयार केलेला धबधबा. मग छोटंसं का होईना याही धबधबाने भुरळच पाडली बघा. वरून वेगात उसळणारं पाणी सतत वाहताना बघितलंय. मग त्या छोटाश्या पहाडावरून चढायचं नि पाणी हातात घेऊन तुषार सिंचनाप्रमाणे उडवायचे. आणि त्या सकाळच्या प्रहरी गरम चहा-पाव नि मॅगी खाल्यानंतर निघालो ते विलाला. वीला म्हणजे एक इमारत जिथे घरां सोबत "स्विमिंग पूल" आणि खेळण्यासाठी छान रुंद जागा असते. तिथे मी आणि छोटू चेंडू खेळताना बघून बाकीच्यांची पण चेंडू खेळायची हौस वाढली. रात्रीला "डॉक्टर माफिया आणि व्हिलेजर्स", "पूल गेम्स" पण खूप खेळले सगळे. ज्याच्यावरती डाव मग त्याने काय करायचे हे सगळे मिळून सुचवायचे.
गोव्याला खरेदी हि आम्ही केली कोणी कपडे घेतले तर कोणी टोपी-दागिने. ऊन फार कडक होत त्यात माझी खरेदी म्हणजे पाण्याची बॉटल्स घायचे आणि तहान लागलेल्यानी मागितली कि त्याची तहान भागवायची.
दुसऱ्यादिवशी रात्रीला आम्ही सगळे समुद्र बघायला निघालो. खूप नाचलो समुद्र काठावरती पण आमचं नाचणं काही थांबेना. मी तर समुद्राकडे रात्रीलाही एकटक पाहत होते कारण अथांग मायेचं सागर माझा समोर मला मिळालं. रात्रीला ते समुद्र कदाचित बरोबर नाही दिसलं. पण दुपारला मात्र डोळेभरून ते समुद्र मी बघितलं. जवळ उभं राहिलं कि धावत येणाऱ्या लाटा पायांना स्पर्श करून निघून जात होत्या. पण तो क्षणभराच्या स्पर्शानेही मन समाधानी नि आनंदून जायचं. किनाऱ्याच्या लाटांसोबत खेळण्याचीही आपली वेगळीच मजा. समुद्राचे खेळ खेळताना तर कधी भीती, गंमत नि मजा वाटली. समुद्रपाण्याच्या आत जाऊन विविधरंगी मासे बघायचे, तर कधी फुग्यावर बसून अख्य समुद्र न्ह्याहाळायचं, तर कधी वेगवान गाडी समुद्रावरती चालवायची, आणखी कितीतरी खेळ खेळून झालाय.
"दूधसागर धबधबा" ला जेव्हा पोहोचलो तेव्हा कळलं कि भारतातला दुसरा मोठा धबधबा आहे. इतकं ऊन असून सुद्धा तिथलं पाणी शुद्ध नि थंडगार होतं. विशेषतः "चेन्नई एक्सप्रेस" या चित्रपटामधील हा धबधबा म्हणून ओळख.
माझ्यासाठी मी बघितलेल्या समुद्राचं आकर्षण मनी वाढत राहिलं. तिथून कधी कसं घराच्या दिशेने वळण घेतले याचा पत्ता सुद्धा लागला नाही.
येताना मात्र या निसर्गाचं रूप बघण्याशिवाय माझ्याकडे काहीच राहील नाही. जंगलातून गाडी जात असताना उंच दरीतून "रोलर कोस्टर राईड" आम्ही अनुभवली. एका "विऊ पॉईंट" वरती जेव्हा आम्ही थांबलो. तेव्हा वाटलं अख्ख निसर्ग आपण जिंकलाय. बेधुंद वारा सुटलेला नि खोलवर दरी. कॅमेरामध्ये कसं आणू या सर्वांना मला माहित नाही पण डोळ्यात माझा अजूनही साठवून ठेवलाय. शेवटी सांगू तरी काय?
निसर्गाच्या प्रेमात तर आधीच होते आणखी त्याकडे बघून खोलवर त्याच्या प्रेमात पडले नि निसर्गरंगीन प्रेमात अडकून बसले.
Comments
Post a Comment