आज तिने छान फुले तोडली. एक सुंदर हार तयार केला. देवघर सुंदर फुलांनी सजवलं नि देवाजवळ रांगोळी काढली, हार चढवला नि प्रार्थना केली. "देवा सगळ्यांच दुःख दूर कर". तिकडून तिची आई आली. हे सगळं बघताच ती खूप खुश झाली. नि तिला म्हणाली, "माझी गुणाची बाळ ग". ही आनंदाची वेळ कधी संपूच नये असं तिला वाटलं. नंतर क्षणात पूर यावा तसच झालंय. जेव्हा तिच्या आईला कळलं की तिला पाळी आली, तिने लगेच मुलीवरती ओरडणं सुरू केलं. "तुला मी कितीदा सांगितलं की पाळी आली असता देवाला हात लावायचा नाही, दूर राहायचं, पण तू तर ऐकतच नाही". तिने बनवलेला सुंदर हार पण देवापासून काढण्यात आला. त्यात पाहुणे आले आणि पाहुण्यांमध्ये तर चर्चेचा विषयच बनला.
तिच्या मनात असंख्य प्रश्न होते पण उत्तर तिला समाधानकारक कधी मिळालच नाही. अस कित्येकदा तिच्या बाबतीत नाही तर माझ्याही बाबतीत घडलंय. खरंच मुलींना पाळी आली की इतकं का बंधन असतं की तिने साधं आपलं मन सुद्धा देवासमोर व्यक्त न करावं? देवा समोर का जाऊ नये? मंदिरात जाऊ नये हे असले कसले बंधन? मुलींना पाळीत शारीरिक त्रासासोबत मानसिक तणावही जाणवतो. मग शांत, समाधानी, आणि क्षणभर का होईना पण मन आनंदी होण्यासाठी देवाचा आसरा घेतला तर त्यात तिने काय चुकीचं वागलं?
मग एका स्त्री ला सकारात्मकतेची ऊर्जा मिळत आहे हे कसं चुकीचं असू शकतं? कुठल्या दृष्टिकोनातून हा विचार मोठे मुलींसामोर ठेवतात हे माहीत नाही, कुठल्या धर्मात, प्रथेत किंवा नियमात असेल तर हा पूर्णपणे चुकीचा आहे. स्त्री ला आदिशक्ती म्हणतात ना मग तिच्या पासून तिचा हक्क किंवा अधिकार आनंद हिरावून घ्यावा इतका अधिकार नकोत कुठल्या माणसाला. पाळी हा कुठला ही लाजेचा, धार्मिक कार्यात अशुभेचा विषय नाही आहे तर हे प्रत्येक स्त्रीची शक्ती आहे.
समाज सुधारणेसाठी सकारात्मक, चांगले आणि योग्य विचारांची गरज आहे.
समाजात वर्षानुवर्षेचालत आलेल्या नियमांमध्ये बदल होणं कठीण असतं पण सुरुवात नक्कीच कुठून तरी व्हायला हवीच. मग ती लवकर का नाही!!
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!
Comments
Post a Comment