कधी कधी ना मी फारच आनंदी असते. मग रत्यावरून जातांना काका काकुंशी बोलते , आजी आजोबांशी बोलते आणि माझ्या प्रिय बालमित्रांसोबतही बोलते .
आज तर एका काकांशी भेट झाली . कडक नि भारदस्त व्यक्तित्व त्यांचं . क्षणात त्यांनी मला त्यांचा मुठीतच घेतलं बघा . आम्ही खूप बोललो निदान अर्धा तास तर झालेच असावेत . मिल्ट्रीत काम करतात असं त्यांनी सांगितलं . तसं विचाराने पण फार मोठे बरं . मला म्हणाले "शिक्षण याचं महत्त्व फक्त नोकरी पुरतं सीमित नसावे तर ते असं ध्येय साध्य करण्यासाठी असावं ज्यात दुसऱ्याचं हित सुद्धा लपलेलं असेल" . शिक्षणाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळाच. इतका पैसा आणि नौकर असून सुद्धा आजूबाजूला पडलेल्या रस्त्यावरचा कचरा वेळ मिळेल तेव्हा साफ करतात . खरंच माणूस मोठा शिक्षणाने मिळवलेल्या मोठ्या नौकरी मुळेच नाही तर ते छोट्या छोट्या सुधारणे मुळेही मोठी होतात . अश्या दृष्टिकोन ठेवणाऱ्यांची आणि अश्या सुधारणेची या भारताला आजही गरज आहे. कारण कुठलीही गोस्ट आपल्या देशातल्या माती पेक्षा मोठी असू शकत नाही.
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!
Comments
Post a Comment