आज उडण्याची इच्छा होती पण हिंमत नव्हती. कारण मला उडवणारे माझे पंख तर पूर्णपणे भिजलेले होते. प्रयत्न करणे सोडून देणं हे मात्र चुकीचं असेल माझ्याकरीता म्हणून भिजलेले पंख फडफडायला लागले. मग वाऱ्याची साथ आणि सूर्याने तर कडक ऊन पंखावरती पडून हे पंख कोरडे केले.
यांच्या मदतीमुळे पंख कोरडे झाले नि उडण्याची पण इच्छा आहे फक्त हिंमत नाही अजून.
मान वर करून हे डोळे आभाळाकडे बघत राहिले तेव्हा या धारणीने हाक मारली. या धरती मातेने 'विजयी भव' म्हणत कपाळावर माती टिळक लावून दिला. आभाळ म्हणालं, 'आम्हाला विश्वास आहे तू नक्कीच इथवर पोहोचशील'. माझी धरती आई म्हणाली,'परत येताना जिंकण्याचा आनंद सोबत घेऊन ये'.
या विश्वासाच्या हिमतीसोबत मी उंच भरारी घेतली... ती म्हणजे झेप.
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!
Comments
Post a Comment