कित्येकदा ऑफिस मधून घरी येताना आयटी पार्कच्या रस्त्यावरील दुकानांमध्ये तरुण वयोगटातील मुले सिगारेट पितांना दिसतात. कधी घोळक्यात तर कधी एकटे ओढताना दिसतात.
याने पर्यावरण तर दूषित होतं आणि आसपासच्या लोकांनाही श्वास घेताना त्रास जाणवतो. आणि हा विषय जर चर्चेत आणला तर त्यांना नकोसं होतं. कुणी म्हणतात, "It's just for fun and just maintain standard of living". हे ऐकून तर मी मात्र विचारात पडले.
हल्ली तर शिक्षणासाठी बाहेर गेलेले विध्यार्थी कुसंगतीमुळे व्यसनाच्या वाईट मार्गावर जातात. नशा व अपयशाची नैराश्य यातून तरुणांच्या अनेक पार्ट्या होतात. व्यसनाचे अनेक दुष्परिणाम समाजामध्ये पाहायला मिळतात. व्यसनामुळे तरुणांची तेजस्विता नष्ट होते. अनेक रोगांना बळी पडून व्यसनाधीन माणसांना अकाली मृत्यू येत आहे. आणि म्हणूनच व्यसन लावून न घेणे हा कदाचित व्यसन मुक्तीचा पहिला मार्ग असू शकतो.
आधी गावात एखादा जर दारू प्यायला तर अख्खा गाव, तो चुकीची गोष्ट करत आहे, या नजरेतून त्याच्याकडे बघत असे. आजची परिस्थिती विरुद्ध झाली आहे. प्रतिष्ठेच्या नावाखाली एखादा जर व्यसन नसेल करत, तर तो चुकीचं करत आहे या दृष्टिकोनातून बघितल्या जातं.
आज बरेचसे मुलं आपले आदर्श कलाकारांना मानतात. मग ते चित्रपटांमध्ये आनंद साजरा करायचा असला की पार्टीत दारू पिताना दिसतात. दुःख झाले की सिगारेट ओढताना दिसतात. आजकालची मुले तर अनुकरणशील आहे आणि त्यांना जस दिसतं तसेच ते वागतात. मग आनंद झाला तरीही सिगारेट ओढायची आणि दुःख झाल तरीही, असंच त्यांना वाटतं. हीच जर का मानसिकता असली तर भारताचं भवितव्य कुठल्या दिशेला जाईल? याचा विचार आपण नक्कीच करू शकतो. मानसिकता बदलण्यासाठी आपण जे निर्व्यसनी आहेत, जे समाजासाठी कामे करतात त्यांना आपण आदर्श मानू शकतो. मग कदाचित योग्य विचार करणारी मानसिकता तयार होईल.
"It is not for sale to minors" असं लिहून असून सुध्या, लहान मुले बळी पडत आहे याची मला खंत वाटते. दुसरा मुद्दा असा की समाजात "social drinker" पण फार आहेत. जागतिक आरोग्य संस्थानातर्फे पंचवीस वर्ष्यापूर्वी हे सांगण्यात आले होते. हेच "social drinker" पुढे ३% "alcoholic drinker" झालेत आणि आज त्याची संख्या ५०% पर्यंत आलेली आहे. व्यसनाचा विरोध असूनही ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राहतो आहे आणि आपल्याला माहीत सुध्या आहे की महाराजांवरती अधिक संकटे आली पण ते कधीच व्यसनेच्या आहारी गेले नाहीत. व्यसन आम्ही आनंदासाठी करतोय अशी चुकीची मानसिकता समाजात पसरत आहे. जी वस्तू स्वतःचा आरोग्यासाठी, परिवारासाठी आणि समाजासाठी घातक असू शकते ती कशी आनंद देऊ शकेल? यावर आपण गांभीर्याने विचार करायला हवा. आणि ठरवायला हवं.
"नव्या पिढीच्या एकच ध्यास,
दारू-सिगारेट सोडून घेऊया मोकळा श्वास..
नवे युग नवा निर्धार,
व्यसनाला करूया आपण हद्दपार.."
हल्ली तर शिक्षणासाठी बाहेर गेलेले विध्यार्थी कुसंगतीमुळे व्यसनाच्या वाईट मार्गावर जातात. नशा व अपयशाची नैराश्य यातून तरुणांच्या अनेक पार्ट्या होतात. व्यसनाचे अनेक दुष्परिणाम समाजामध्ये पाहायला मिळतात. व्यसनामुळे तरुणांची तेजस्विता नष्ट होते. अनेक रोगांना बळी पडून व्यसनाधीन माणसांना अकाली मृत्यू येत आहे. आणि म्हणूनच व्यसन लावून न घेणे हा कदाचित व्यसन मुक्तीचा पहिला मार्ग असू शकतो.
आधी गावात एखादा जर दारू प्यायला तर अख्खा गाव, तो चुकीची गोष्ट करत आहे, या नजरेतून त्याच्याकडे बघत असे. आजची परिस्थिती विरुद्ध झाली आहे. प्रतिष्ठेच्या नावाखाली एखादा जर व्यसन नसेल करत, तर तो चुकीचं करत आहे या दृष्टिकोनातून बघितल्या जातं.
आज बरेचसे मुलं आपले आदर्श कलाकारांना मानतात. मग ते चित्रपटांमध्ये आनंद साजरा करायचा असला की पार्टीत दारू पिताना दिसतात. दुःख झाले की सिगारेट ओढताना दिसतात. आजकालची मुले तर अनुकरणशील आहे आणि त्यांना जस दिसतं तसेच ते वागतात. मग आनंद झाला तरीही सिगारेट ओढायची आणि दुःख झाल तरीही, असंच त्यांना वाटतं. हीच जर का मानसिकता असली तर भारताचं भवितव्य कुठल्या दिशेला जाईल? याचा विचार आपण नक्कीच करू शकतो. मानसिकता बदलण्यासाठी आपण जे निर्व्यसनी आहेत, जे समाजासाठी कामे करतात त्यांना आपण आदर्श मानू शकतो. मग कदाचित योग्य विचार करणारी मानसिकता तयार होईल.
"It is not for sale to minors" असं लिहून असून सुध्या, लहान मुले बळी पडत आहे याची मला खंत वाटते. दुसरा मुद्दा असा की समाजात "social drinker" पण फार आहेत. जागतिक आरोग्य संस्थानातर्फे पंचवीस वर्ष्यापूर्वी हे सांगण्यात आले होते. हेच "social drinker" पुढे ३% "alcoholic drinker" झालेत आणि आज त्याची संख्या ५०% पर्यंत आलेली आहे. व्यसनाचा विरोध असूनही ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राहतो आहे आणि आपल्याला माहीत सुध्या आहे की महाराजांवरती अधिक संकटे आली पण ते कधीच व्यसनेच्या आहारी गेले नाहीत. व्यसन आम्ही आनंदासाठी करतोय अशी चुकीची मानसिकता समाजात पसरत आहे. जी वस्तू स्वतःचा आरोग्यासाठी, परिवारासाठी आणि समाजासाठी घातक असू शकते ती कशी आनंद देऊ शकेल? यावर आपण गांभीर्याने विचार करायला हवा. आणि ठरवायला हवं.
"नव्या पिढीच्या एकच ध्यास,
दारू-सिगारेट सोडून घेऊया मोकळा श्वास..
नवे युग नवा निर्धार,
व्यसनाला करूया आपण हद्दपार.."
Comments
Post a Comment