लहानपणीच्या काही गोष्टीचे महत्व आणि त्यातून नेमकं आपण काय घ्यायला हवं हे आपल्याला मोठं झाल्यावर कळतं. अशीच लहानपणी वाचलेली गोष्ट...'शेवटचा घाव..!'
एक माणूस नेहमीप्रमाणे लाकडं तोडण्यासाठी जंगलात गेला. काही लहान लहान काड्या गोळा केल्यानंतर आणखी काही मोठ्या फांद्या तोडाव्या म्हणून एका झाडावर चढतो. कुऱ्हाडीने एका फांदीवर सपासप घाव घालण्यास सुरुवात करतो. पण त्या झाडाच लाकूड फार चिवट असतं. बरेच घाव घातल्यानंतरही फांदी तुटत नाही. हि फांदी त्याच्या धैर्याची आणि चिकाटीची परीक्षा घेत असते. आता मात्र हा हताश होतो, धीर सुटतो. हतबल होऊन निराश अंतःकरणाने रडवलेल्या चेहऱ्याने खाली उतरतो. झाडाखालीच बसतो. काय करावं त्याला काहीच सुचत नाही! तितक्यात वाऱ्याच्या एक जोरदार झोत येतो, आणि त्या झोताने त्या झाडाची चिवट फांदी काडकन तुटते आणि पडते ती नेमकी या माणसाच्या डोक्यावरच!! परिणामी तो माणूस मरतो...
ही गोस्ट वाचल्यावर मनात सहजच प्रश्न येतो, जर झाडाचं लाकूड इतकं चिवट असतं की कुऱ्हाडीचे अनेक घाव घालूनही फांदी तुटत नाही. तर मग वाऱ्याच्या एका झोताने ती फांदी तुटते कशी??
प्रश्न योग्य आहे..खरंतर ती फांदी केवळ एका वाऱ्याच्या झोताने तुटावी अशी नसतेच! परंतु, त्या माणसाच्या कुऱ्हाडीने घातलेल्या अनेक घावांमुळे ती फांदी तुटायला आलेली असते. ती तुटण्यासाठी हवा असतो फक्त आणखी एक घाव. जो घालण्याआधीच माणूस धीर सोडतो, निराश होतो, हताश होतो, मनोबल गमावून हतबल होऊन बसतो आणि एक वऱ्याच्या झोत घात करतो!!
मित्रानो, आपण आपल्या आयुष्यात अनेकदा असेच वागत असतो आणि म्हणूनच जीवतोड मेहनत करून हाती काहीच लागत नाही केवळ निराशाच पदरी पडते. अशावेळी आपण आपल्या नशिबाला दोष देतो. मात्र, अश्यावेळी जर थोडासा संयम बाळगला, थोडे धैर्य ठेऊन चिकाटीने प्रयन्तरत राहिले, तर यश अगदी काही पावलांवर आपली वाट बघत उभे असते!!
आजची परिस्थिती सुद्धा अशीच आहे कोरोना अतिशय चिवट रोग आहे सारे जग त्याच्याशी दोन हात करताना हतबल होताना आपल्याला दिसत आहे. आपल्या देशातील परिस्थिती मात्र त्या तुलनेत बरीच चांगली म्हणावी अशी आहे. आणि त्याचं कारण आहे आपले संपूर्ण प्रशासन-आपले पुलिस, डॉक्टर, नर्सेसपासून ते सर्वसामान्य जनतेने सुरवातीपासून अगदी मनापासून या चिवट रोगावर घाव घालण्यासाठी केलेले प्रयन्त!!
कोणी प्रत्यक्ष सेवाकार्य करुन तर बहुसंख्य सामान्य जनतेने आपल्या घरात राहून, बाहेर न निघता या लोकडाऊनच्या काळात आपल्या परीने या चिवट विषयानुर घाव घातले आहेत. अजूनही कोरोनाचा संपूर्ण पडाव झालेला नाही. हा विषाणू आपल्या संयमाची, धैर्याची आणि मनोबलाची परीक्षा बघतो आहे. मात्र, आपल्या आजारावरच्या अनेक घावांनी त्याचा प्रभाव अनेक पटीने निश्चितच कमी झाला आहे. त्याची शक्ती कमी करण्यात आपला एक एक घाव कमी येतो आहे. फांदी अजून तुटली नसली तरी आपण चिकाटीने पुढील आणखी काही घाव घातले तर परिणाम काही दिवसांतच आपल्याला दिसतील. मात्र, आपण धीर सोडला, निराश झालो, आपले मनोबल गमविले आणि प्रयत्न सोडून खाली बसलो तर मात्र एक हलकासा झोत आपल्याला कपाळमोक्ष करणार हे निश्चित!! तेव्हा आता धीर सोडू नका. आतापर्यंत दाखवलेले धैर्य असेच कायम ठेवा. शासनातर्फे करण्यात येणाऱ्या आव्हानाला योग्य प्रतिसाद देऊन पुढील आणखी काही काळ केवळ प्रशासनाच्या सूचनेचे प्रामाणिकपणे पालन करा. स्वस्थ रहा, सावध रहा, सुरक्षित रहा, स्वास्थ सांभाळा, काळजी घ्या पण काळजी करू नका!!
रडू नका, चिडू नका,
घेतला वसा टाकू नका!!
लॉकडाऊन पाळा!! कोरोनाला टाळा!!
👍💐nice
ReplyDelete👌👍
ReplyDelete☝️
ReplyDelete✍️ 😍 👌👌
Ty☺☺😊
ReplyDelete