Skip to main content

प्रत्येकाचे रूप आगळे...


उन्हाळा तापला की आंब्याचा मोसम सुरु होतो अन मग या फळाचा दरवळणारा गोड गंध आणि मधुर रस साऱ्यांचाच मोहात पडतो.
यात विविधता तरी किती?
जगप्रसिद्ध हापूस पासून तर गावरानी घोटी आंब्यापर्यंत ...केसर...लंगडा.. पायरी...लाडू...नागीण...!
मोठे मोठे बंगले, मध्यमवर्गीय घरापासून तर गरिबांच्या झोपडीपर्यंत सरसकट लोकप्रिय असणारा बैंगनपल्ली!
शेप्या, हळद्या, तेल्या, मोसंब्या, मधाळ आणि अशा विविध आंबटगोड चवीत येणारा आणि रस काढून खाण्यापेक्षा लगेच माचवून, सरळ तोंडाला लावून, साल ओरपून, घुई चोखून खाण्यात मज्जा असणारा गावरानी आंबा!
विदर्भात पूर्वी या गावरानी आंब्याचा आमराया असत. काळ बदलला आणि या आमरायाची संख्या कमी झाली. पण वडीलधारी मंडळी अजूनही सांगतात कि, विदर्भात उन्हाळ्यातला पाहूणचारच्या पंक्तीमध्ये वेगवेगळ्या चवीच्या गावरनी आंब्याचा रसाच्या चार-पाच वाट्या असत. आणि सोबत एक वाटी पाण्याची...आजकालच्या भाषेत 'फिंगर बाउल...' एका रसची चव दुसऱ्यात मिसळून जाऊ नये म्हणून!!
आणि या गावरानी आंबाच्या घुया थोड्याशा पाण्यात कुस्करून वरून चवीला जरासं मीठ-साखर टाकून केलेला 'पाणरस...' म्हणजे  आजकाल आपण बंद डब्यांमधून, बाटललांमधून विकत घेतो ती फ्रुटी...तसच आपण पाणरास आणि ताक एकत्र करून वर जिऱ्याची फोडणी दिली कि होतो तो 'फजिता...!' प्रत्येक आंब्याची चव वेगळी असली तरी कुठलाही आंबा मोहात पडतोच...मग 'हापूस 'च फळांचा राजा आणि बाकीच्यांना त्याची सर येऊच शकत नाही असला अभिमान...किंवा "तो हापूस काय नुसताच गोड बैंगनपल्लीचा आंबटगोडपणा त्यात नाही " असं नावं ठेवणं!
हे हवंच कशाला..??
माणसाचंसुध्दा तसंच नाही का?
 इथे व्यक्ती तितक्या प्रकृती !!पण प्रत्येकात काही ना काही गुण-दोष असणारच. एखाद्याच्या गुणांनी भारावून जावून त्याच्यावर डोळे झाकून भरवसा ठेवण जसं वाईट, तसंच एखाद्याला कुठलाच गुण नाही असं म्हणून सरसकट वाईट ठरवणंसुद्धा आयोग्यच नाही का !!
शेवटी गदिमांची क्षमा मागून आणि त्यांच्याच एका गीताचा आधार घेऊन म्हणावसं वाटतं...

"प्रत्येकाचे रुप आगळे, 
प्रत्येकाचे रंग वेगळे,
 कुणा म्हणावे सरस न कळे,
ज्याच्या त्याच्या गुणांस जाणा
अन करा त्यांस स्वीकार...
असे हा निसर्ग जादूगर...
असे हा निसर्ग जादूगार..."

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

My Drawings✏😇

कला वाट पाहतांना एक सुंदरी.....😍 माझ्या स्वप्नातली एक सुंदर परी.....💗 पक्ष्यांची उंच भरारी...🐦🕊 माझी आई..💗   नयन...👁

प्रवासातील अनुभव (भाग 2)

प्रवासातील अनुभव (भाग 2) कितीतरी दिवसानंतर आपण फक्त काही दिवसांसाठी घरी🏠 जात असतो म्हणून माझी 🕋कॉलेजला परत येण्याची इच्छाच नव्हती. ओढ जरी घरचीच असली तरी मनाला आवरत 🙂कॉलेजला परत यावेच लागते. येतांना घडलेला एक प्रसंग..  नेहमीप्रमाणे आजही बाबा म्हणाले,"बेटा लवकर आटप आपण एक तास अगोदर पोहचायला हवं". मी म्हणाली,"बाबा आपण अर्धा तास अगोदर निघूया". बाबा काही मानले नाही शेवटी एक तास अगोदरच नागपूरच्या रेल्वे स्थानकावर 🚞आम्ही पोहोचलो.  तिकीट काढलं पण तरी एक तास वेळ होता 😶अजून ट्रेन यायला. माझे बाबापण दुसरं कोणी दिसलं कि त्यांच्याशीच गप्पा 😀आणि मी इथे कंटाळत 😔होती. माझं फक्त इकडे-तिकडे पहाणं👁, येणाऱ्या-जाणाऱ्या ट्रेन कडे कंटाळलेल्या नजरेने😒 पहाणं बस हेच सुरु होतं. आणि त्यात स्टेशनवर वस्तू विकणाऱ्यांच्या आवाज👻.  त्यातलाच एक मुलगा 👦,कदाचित आठवीतल्या वयाच्या मुलाएवढाच असावा. जोरजोराने ओरडत होता 'पानी थंडा-थंडा पानी". मी मनात म्हटलं काय मुलगा आहे, कसले घाणेरडे कपडे आहे याचे, कसला दिसतो 😒आहे, कसला अनाडी आहे. जाऊ दे रे बाबा🙅, मी पण हे काय विचार करत बसल...