Skip to main content

Posts

Showing posts from May, 2020

Happiest Anniversary !

काका-काकू तुम्ही माझ्या आईवडिलांसारखे आहात. काकू मला आठवते ज्यावेळेला फक्त एकदा मी तुम्हाला पहिल्यांदा भेटली होती त्यावेळेला तुम्ही या नाजूकशा सुंदर चेहऱ्यावर, चांद्रकोरप्रमाणे गोडं हसणाऱ्या दिसल्या होत्या. काका तुमच्याबद्दल काय सांगायचं, तुम्ही तर माझ्या जीवनात एक आदर्श गुरुंचं स्थान पटकावलं. तुम्हा दोघांशी नकळत झालेली भेट कदाचित गजानन महाराजांच्या कृपेने झाली असावी जी आजही मला मनातून एक आपुलकीचं नातं सांगून जातं. खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं असं तुमचंही नातं, ज्यात कोणतीही अपेक्षा न करता मिळालेली गोस्ट जी सुख देऊन जाते, त्याला तोड नसते..कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशन पेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळूक जास्त सुख देऊन जाते... आज एक नवा गंध, सुखांचा, वैभवांचा आनंद धावून आलेला आहे आणि या क्षणाला एक उजाळा देतो आहे, एक नवी दिशा, नवं स्वप्न देत आहे... "आज तुमच्या जीवनाच्या एका नाजूक वळणावरती झाल्या त्या भेटीगाठी... पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात जुळून आल्या त्या रेशीमगाठी... दोन जीवांचे प्रेम भरलेल्या रेशीमगाठीत बांधलेले... अ...

निसर्ग आणि मुले..

लहान मुलांचे आणि निसर्गाचे एक अनोखे नाते असते. निसर्गातील प्रत्येक गोष्टीचे त्यांना आपसूकच एक कुतूहल असते. मुलांच्या विकासात त्यांच्या लहानपणीचे भाव अतिशय महत्वाची भूमिका बजावत असते. 'या पृथ्वीतलावावर असणारा निसर्ग हि अतिशय गुंतागुंतीची व्यवस्था आहे. मानवाने निर्माण केलेल्या कोणत्याही माशीनपेक्षा किंवा एखाद्या यंत्राणेपेक्षा हे जास्त गुंतागुंतीचे आहे. निसर्गातील हे सर्व बदल मुले संवेदनशीलतेने टिपतात निसर्गातील वैविध्य त्यांच्या नजरेत भरते. प्राणांमधील, पक्षांमधील ते मानवी आयुष्याशी संलग्न करून बघतात.' प्राणांच्या आयुष्याशीही ही मुले स्वतः तुलना करतात. त्यांचं अगदी बारकाईने निरीक्षण करतात. बदल टिपतात. विशिष्ट प्राणी ज्याप्रमाणे वागतो तसंच वागण्याचा प्रयन्तही करतात. आकलनविषयक, सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकासामध्ये या साऱ्याची भूमिका महत्वाची आहे असे संशोधनातून सिद्ध झालेले आहेत.   मुलांना निसर्गाविषयी असणाऱ्या कुतुहलातून मोठ्या माणसांनीही खुप शिकण्यासारखं आहे. "थेअरी ऑफ माइंड " हेच सांगते , 'दुसऱ्याचा मनाचा विचार करून त्याच्या मनात काय असेल, याचा अंदाज घेऊन मुल...

एकांताचा आवाज...

एकटेपण ही तशी प्रत्येकाला बिलगलेली गोष्ट आहे. अगदी रूढ भाषेत, एकटच जन्माला येणं आणि जाणं ही गोष्ट कोणालाही टाळता आलेली नाही. एखादा कितीही गोष्टीवेल्हाळ, माणसात रमणारा माणूस असला तरी काही काळापुरता का होईना एकटेपणा त्याला हवा असतोच. मनाला चिकटलेली, नको असणारी चिरकुटं या काळात तो धुवून, काढून टाकत असतो. अर्थात, ही एकटेपणाची गोष्ट एकटेपणानच संपणारी नसते. त्याला बरच काही बिलगून आलेलं असतं. शरीराचं तसं अंतर्वस्त्र, तसंच मनाचही असावं. ते व्यक्त होतांना मग प्रथा, संकेत, नैतिकता, अनैतिकतेची वस्त्र परिधान करतं. आपल्या भोवतालाला टाळून आपण जगू शकत नाही. त्याचा अर्थ हा जो काही भोवताल आहे आपल्या विचार, जगण्याची दिशा ठरवतो. आपल्या वर्तनावर एकाच वेळी अनेक दबाव असतात. काही वेळा हा दबाव नाकरण्यातून आपण वर्तन करतो तर काही वेळा तो स्वीकारण्यातून. काही प्रक्रिया तर अगदी अंगवळणी पडल्यासारखं असतात. स्वीकार-नकाराच्या पलीकडलं त्यांचं आस्तित्व असतं. ती केवळ दैहिक नसते तर तिचे रूप हे बरेचसे भावनिक,मानसिक असते. या एकांताची मुळं खूप खोलवर आपल्या मनाशी रुजलेले असतात. भंडाऱ्याच्या डोंगरात बसलेले एकटेच तुकोबा ...

घेतला वसा टाकू नका!

लहानपणीच्या काही गोष्टीचे महत्व आणि त्यातून नेमकं आपण काय घ्यायला हवं हे आपल्याला मोठं झाल्यावर कळतं. अशीच लहानपणी वाचलेली गोष्ट...'शेवटचा घाव..!' एक माणूस नेहमीप्रमाणे लाकडं तोडण्यासाठी जंगलात गेला. काही लहान लहान काड्या गोळा केल्यानंतर आणखी काही मोठ्या फांद्या तोडाव्या म्हणून एका झाडावर चढतो. कुऱ्हाडीने एका फांदीवर सपासप घाव घालण्यास सुरुवात करतो. पण त्या झाडाच लाकूड फार चिवट असतं. बरेच घाव घातल्यानंतरही फांदी तुटत नाही. हि फांदी त्याच्या धैर्याची आणि चिकाटीची परीक्षा घेत असते. आता मात्र हा हताश होतो, धीर सुटतो. हतबल होऊन निराश अंतःकरणाने रडवलेल्या चेहऱ्याने खाली उतरतो. झाडाखालीच बसतो. काय करावं त्याला काहीच सुचत नाही! तितक्यात वाऱ्याच्या एक जोरदार झोत येतो, आणि त्या झोताने त्या झाडाची चिवट फांदी काडकन तुटते आणि पडते ती नेमकी या माणसाच्या डोक्यावरच!! परिणामी तो माणूस मरतो... ही गोस्ट वाचल्यावर मनात सहजच प्रश्न येतो, जर झाडाचं लाकूड इतकं चिवट असतं की कुऱ्हाडीचे अनेक घाव घालूनही फांदी तुटत नाही. तर मग वाऱ्याच्या एका झोताने ती फांदी तुटते कशी?? प्रश्न योग्य आहे..खरंतर ती...

अस्तित्वाचा काजळकाठ !

हा काळ, जो आजकाल अनुभवत आहोत, या काळानं माणसाचं पृथ्वीवर असणं, एवढं काही महत्वाचं नाही हेच अधोरेखित केलं!असे इशारे यापूर्वीही माणसाला मिळालेले असतीलच. या जगात जे जे काही आहे ते माझ्यासाठीच आहे ही हीन वृत्ती माणसाला दिवसेंदिवस हिंस्त्र व क्रूर बनवत आहे. वेळोवेळी येणारी संकटे आणि आपत्ती यांनी गंभीर इशारे दिलेले असावेत, पण ते साफ धुडकावून लावण्याच्या तामसी वृत्तीनं माणूस अधिकच निडर नि विकृत होत आला आहे. ही पृथ्वी, इथला निसर्ग, जीव-जंतू, पशू-पक्षी नि हे अवघ चराचर, सहजीवनाच्या, सोबतीच्या मंगलमय जगण्याला आसुसलेलं असताना, माणसाने फक्त 'मी' चाच डाव टाकला. 'या पृथ्वीचा मीच मालक असा वागत राहिला. खरंतर या जगण्याच्या, जैविक शृंखलेतून माणूस वजा झाला तर, फार काही दुष्परिणाम पृथ्वीवर व्हायचे नाहीत. उलट जे होईल ते अतिशय चांगलं होईल ते इथल्या वातावरणाला अधिक समृद्ध करेल. माणसांनी जशी दोन विध्वंसक महायुद्ध घडवून आणले, तशी युद्ध जीवनसृष्टीच्या शोधात कुठेही सापडलेली नाही!' जगण्याच्या अनुकूलतेसाठी, जीव-जातीच टिकणं, नष्ट होणं हे मात्र निसर्गही मान्य करतो! सभोवतालची झाडे वेली, वृक्षराज...

अंधश्रद्धांची झाडाझडती

सुरेश पाटोळे यांची 'चोळी' ही कादंबरी वडार समाजातील सत्य घटनांवर आधारित आहे. कादंबरीचा नायक जगन हा परिवर्तनवादी आहे. त्याची आई सीताक्का ही दारूचा व्यवसाय करते, तर वडील बापू हा खाणीवर काम करतो. जगनला शिक्षणाची आवड असून तो छत्रपती शिवाजीमहाराज, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आदर्शने प्रेरित झालेला आहे. परिवर्तनवादी वाटचालीत जुन्या प्रथा-परंपरावादी भूमिकांशी लढत असतानाच त्याला, आपल्या वडार समाजातील बायका अंगात 'चोळी ' का घालत नाहीत? असा प्रश्न पडतो. इथूनच वडार समाजाला परिवर्तनाची खरी गरज असल्याचे पाहून, जगन परिवर्तनाचा प्रारंभ स्वतःच्या घरापासून करण्याचा प्रयन्त करतो. मात्र अंधश्रद्धा, अज्ञान व परंपरेवर प्रचंड भरोसा असलेला  समाज  त्याला परिवर्तनासाठी मदत, सहकार्य व साथही देत नाहीत. जगतिकीकरणाच्या या युगात नऊवारी लुगडं नसणारी बाई आता सहवारी पातळ नेसते, पण वडार स्त्री मात्र एका दंतकथेमुळे अंगात चोळी घालत नाही, या अंधश्रद्धेची त्याला चीड येते. शिक्षण ही जीवन दृष्टी असून समाजाला शिक्षणाशिवाय मुक्ती मिळणार नाही, अशी त्याची स्पष्ट धारणा निर्...

मैत्रीची शिकवण....

मैत्री हा शब्द सगळ्यांचा आवडीचा असतो. "मैत्री खूप काही शिकवते" हे कधी वृत्तपत्रातून, कधी पुस्तकातून तर कधी सुविचारातून वाचलं होतं. पण आज ते सिद्ध झालंय... माझ्या मैत्रीच्या कट्यात असणाऱ्या मित्र-मैत्रिणीने खूप काही शिकवलं... आजोबा मला नेहामी सांगायचे. "प्रत्येकाकडे खूप सुंदर गुण असतो फक्त तो शोधावा लागतो."  आणि त्याच शोधात असताना मी माझ्या मित्र-मैत्रिणीकडून खूप काही शिकली... जान्हवी - नेहमी दुसऱ्यांसाठी त्यांचा आधारस्तंभ बनून सोबत आणि पाठीशी उभं राहायचं. कोमल - कधीच मदतीसाठी नकार न देणे आणि वेळ आली कि मोठं होऊन समजूतदारपणाने वागणे. शितल - आयुष्यात नेहमी हसत, खेळत, बिनधास्त राहणं. जयश्री - भावनांना समजून शायरी करण्याची कला. प्रांजली - कधी जीवनाच्या एखाद्या क्षणाला आपण पूर्णपणे खाली पडलो तर तितक्याच खांबीरतेने त्याला सांभाळून पुन्हा झेप घेवू शकतो. जाई - कविता बनवण्याचा सुंदर गुण अबोली - संकटाच्या वेळी स्वतः जबाबदारी स्वीकारून ती योग्यरीत्या पूर्ण करणे. मानसी - उत्तम भोळेपणा असणारा गुण. ज्योती - दुसऱ्याला त्रास न देता कुठलंही काम जर का एकटीने...

Happiest Birthday Shital.......

"हे शितल कशी आहेस?" असल्या प्रेमाने हाक मारणारे आम्ही नाही आहोत. "तर आज आम्ही दोघी जोरात नेहमी प्रमाणे हाक मारू ..हे..शिते कुठ हाय ?....चल लवकर तयारी कर ...किती वेळ लावते...बापा रे बापा....जास्त लिपिस्टिक नको लावू.... कोणी मागं लागन न.. हे बघ मी तयार होऊन आली....नेहा पण अली ...व्यवस्तीत झाले केस चल आता...किती वेळ लावशील लई मस्त दिसून राहिली...चल आता.... हे तिन्ही चार्जर एकत्र टाक... ते लॅपटॉप उचल...कोमलच्या बॅग मध्ये टाक...हे घे बॉटल पकड...झालं सगळं...आपण पहिले एम बी ए डिपार्टमेंट मध्ये जावू... नंतर HOD ला भेटू...हे कोमडी खाली उतर लवकर...ये कोमल...नेहा शीतल आपण पहिले टाईम टेबल बनवू ..हे बघ तू bussiness card बनव... तू माहिती काढ...मी ग्राफ वर काम करते....कोमल रुम मध्ये आहे का कोणी...पटापट करा मुलींनो...नाहीतर ज्योती मानसी येईल आता....." अहो , इतक्या साऱ्या गोष्टी अधून मधून का होईना पण तिघींचा गोंधळ.. तिघींमिळून जगलेले क्षण किती आगळे वेगळे विचित्र, आनंदाचे होते . आज एकीचाच आनंदाचा दिवस नाहीतर तिघींचा आहे... बाहेर अंधारात आकाश सुध्दा तारांसह झगमगत आहे.. च...

प्राचीन संस्कृतीचा खजिना...

प्राचीन काळात नेमके काय घडले होते, माणसाचा जन्म होण्याआधीचे जग कसे होते आणि त्याचा शोध कसा लागला, विविध देशातील स्मारके आणि पुरातन वस्तू, इतिहासातील नैसर्गिक घडामोडी, शतकानूशतकाची आपली जुनी सभ्यता, नाणी आणि भांडी यांचा अदमास घेणे एरवी प्रयेकालाच शक्य होत नाही. परंतु संग्रहालचे एकाच छताखाली  हि सर्व माहिती आपल्याला उपलब्ध करून देत असतात.  नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालय, ज्याला 'अजबा बंगला ' असे देखील संबोधले जाते, ती वस्तू केवळ नागपूर शहरासाठीच नाही तर संपूर्ण विधर्भासाठीही अभिमानाचा विषय आहे. हे संग्रहालय १८६३ साली ब्रिटिश कालखंडात अस्तित्वात आले. मध्यवर्ती संग्रहालयाची इमारत 'व्हिकटोरियन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना' असून नागपुरातील सिव्हिल लाईन्स भागातील बिधानभवनाच्या पश्चिमेला आहे. या संग्रहालयात प्राकृतिक इतिहास आणि अलौकिक अशा जलसंपत्तीसाठी स्वतंत्र दालने राखीव ठेवण्यात आले आहे. 'सी. पी. अँड बेरार प्रांताच्या विविध भागातून गोळा केलेली हत्यारे, टेराकटोरी भांडी, स्मृतीचिन्हे, शिलालेख, नाणी, कॉपर, प्लेट्स, हस्तलिखिते, आणि पेंटींग्स , यांचा मौलिक संग्रह...

प्रत्येकाचे रूप आगळे...

उन्हाळा तापला की आंब्याचा मोसम सुरु होतो अन मग या फळाचा दरवळणारा गोड गंध आणि मधुर रस साऱ्यांचाच मोहात पडतो. यात विविधता तरी किती? जगप्रसिद्ध हापूस पासून तर गावरानी घोटी आंब्यापर्यंत ...केसर...लंगडा.. पायरी...लाडू...नागीण...! मोठे मोठे बंगले, मध्यमवर्गीय घरापासून तर गरिबांच्या झोपडीपर्यंत सरसकट लोकप्रिय असणारा बैंगनपल्ली! शेप्या, हळद्या, तेल्या, मोसंब्या, मधाळ आणि अशा विविध आंबटगोड चवीत येणारा आणि रस काढून खाण्यापेक्षा लगेच माचवून, सरळ तोंडाला लावून, साल ओरपून, घुई चोखून खाण्यात मज्जा असणारा गावरानी आंबा! विदर्भात पूर्वी या गावरानी आंब्याचा आमराया असत. काळ बदलला आणि या आमरायाची संख्या कमी झाली. पण वडीलधारी मंडळी अजूनही सांगतात कि, विदर्भात उन्हाळ्यातला पाहूणचारच्या पंक्तीमध्ये वेगवेगळ्या चवीच्या गावरनी आंब्याचा रसाच्या चार-पाच वाट्या असत. आणि सोबत एक वाटी पाण्याची...आजकालच्या भाषेत 'फिंगर बाउल...' एका रसची चव दुसऱ्यात मिसळून जाऊ नये म्हणून!! आणि या गावरानी आंबाच्या घुया थोड्याशा पाण्यात कुस्करून वरून चवीला जरासं मीठ-साखर टाकून केलेला 'पाणरस...' म्हणजे  आजकाल आप...

Musical Moments

Musical Moments दिन निकलता था,रातें कटती थी, हम तो बस वही बोरिंग दुनिया मे जीते थे। जिंदगी मे इसी तो राह पर हम चलते थे। सर, आप कि तरह हम भी चलते हुए राही थे, जहाँ हम भी अनजान थे तुम भी अनजान थे। जिंदगी के राह पर एक मोड आ गया। जिसने इस अनजान को पहचान मे बदल दिया। सब अपने-अपने इसमे माहिर थे लेकिन, आप ने सबको मिलाके माहोल बना दिया। हम तो बस अकेलेही गुनगुनाया करते थे, आपने तो हमे महफिलमे गाना सिखा दिया। आशा तो इस बात कि है  ये महफिल बस इसी तरह बनी रहे, वक्त निकाल के अपनी कोशिशे जारी रहे। "जिस दिन आप हमारे साथ थे", ये लम्हा भी हम कैसे भूल पाऐंगे? आपको तहे दिल से शुक्रिया करू, फिर भी शब्द कम पड जाऐंगे। सर, हमे पलपल इंतजार था इस पल के लिए ये पल आया भी तो एक पल के लिए अब हर पल दुआ है इस पल के लिए काश फिर आ जाए एक पल के लिए।

प्रवासातील अनुभव (भाग 2)

प्रवासातील अनुभव (भाग 2) कितीतरी दिवसानंतर आपण फक्त काही दिवसांसाठी घरी🏠 जात असतो म्हणून माझी 🕋कॉलेजला परत येण्याची इच्छाच नव्हती. ओढ जरी घरचीच असली तरी मनाला आवरत 🙂कॉलेजला परत यावेच लागते. येतांना घडलेला एक प्रसंग..  नेहमीप्रमाणे आजही बाबा म्हणाले,"बेटा लवकर आटप आपण एक तास अगोदर पोहचायला हवं". मी म्हणाली,"बाबा आपण अर्धा तास अगोदर निघूया". बाबा काही मानले नाही शेवटी एक तास अगोदरच नागपूरच्या रेल्वे स्थानकावर 🚞आम्ही पोहोचलो.  तिकीट काढलं पण तरी एक तास वेळ होता 😶अजून ट्रेन यायला. माझे बाबापण दुसरं कोणी दिसलं कि त्यांच्याशीच गप्पा 😀आणि मी इथे कंटाळत 😔होती. माझं फक्त इकडे-तिकडे पहाणं👁, येणाऱ्या-जाणाऱ्या ट्रेन कडे कंटाळलेल्या नजरेने😒 पहाणं बस हेच सुरु होतं. आणि त्यात स्टेशनवर वस्तू विकणाऱ्यांच्या आवाज👻.  त्यातलाच एक मुलगा 👦,कदाचित आठवीतल्या वयाच्या मुलाएवढाच असावा. जोरजोराने ओरडत होता 'पानी थंडा-थंडा पानी". मी मनात म्हटलं काय मुलगा आहे, कसले घाणेरडे कपडे आहे याचे, कसला दिसतो 😒आहे, कसला अनाडी आहे. जाऊ दे रे बाबा🙅, मी पण हे काय विचार करत बसल...

निसर्ग..

"अरे मी किती सांभाळू तुम्हाला??? अरे मी किती देऊ तुम्हाला?? तुमची काही जबाबदारी आहे कि नाही??" निसर्ग आवाज देऊन सांगत होता पण स्वतः च्या गुर्मीत असलेल्या माणसांनी निसर्गाचा कधीच विचार केला नाही. माणूस आणि निसर्ग याचे युगायुगाचे नाते आहे. पण माणूस सिमेंटच्या बंगल्यात बंदिस्त झाला आणि निसर्गापासून दूर गेला. मधेच निसर्ग जपा ओरड व्हायला लागली आणि निसर्ग आपल्या घरात कुंडीत येऊन सामावला. जागा कमी असली तरी त्याने आपले बहरने सोडले नाही. पण जेव्हा माणसाने प्रचंड वट वृक्षाला बोन्साय करून कुंडीत बंदिस्त केलं आणि मग माणसात  आणि निसर्गात दुरावा निर्माण झाला.  "Do you ever walk out at night just to feel the charm and mystery of the stars?"  वरील वाक्य वाचलं आणि विचार केला खरच आपण अस कधी करतो का? आकाश तारे सगळं बघतो पण तारकांचे गूढ अनुभवाचा कधी प्रयन्तही केला नाही. निसर्गाचे गुढ कधी कोणाला कळलेच नाही. निसर्गाच्या विविध रंगी पैलूंचे अनुभव घेतले, तर निसर्गातील प्रेम, सुख, रम्याता सगळ्या भावनांचे प्रकटीकरण होईल. सकाळी फिरायला निघालं कि , हवेचा थंड स्पर्श ...

पाऊस...

गॅलरीमध्ये बसून पेपर वाचत होते🗒️.सूर्याचा लखलखीत☀️ असा तेज प्रकाश होता. फार गरम होत होतं कारण आज जरा सूर्य जास्त तापलेला होता. तेवढ्यात सोस्याट्याचा वारा सुटला..ढग गडागडायला लागले..वीज कडकडायला लागली..तितक्यात एक मोठं ढग सूर्यासमोर आलं..त्याने सूर्याचा काही भाग आपल्या पंखांखाली घेतला..अचानक डोळ्यांसमोर संपूर्ण दृश्य बदललं.. मेघ गर्जना झाली.. थेंब थेंब करत पावसाच्या सरी जमिनीवर पडायला लागल्या..उन्हाचे रूपांतर सावलीत झाले..वारा सैरा वैरा इकडून तिकडे पळू लागला..झाडे वेली , फुले बहरली..पावसाने अंगणात सडा शिंपला..सगळा निसर्ग हिरवा झाला.. पावसाकडे मी बघतच राहिले. पाऊस म्हणजे एक भूतकाळ , एक आठवण , पहिलं प्रेम, पहिली कविता..कधीतरी अचानक ढग दाटून यावेत, छान गार वाऱ्याची झुळूक यावी आणि पवासाचे थेंब अंगावरती पडावे.. मला लहानपाणापासून पाऊस खूप आवडायचा. पाऊस म्हटल कि, ते शाळेतून जाताना भिजणं, छत्री रेनकोट असूनही तो न वापरता मनसोक्त भिजणं, घरी आल्यानंतर आईने दिलेला गरम चहा घेऊन पुन्हा पावसात जाणं, कधी कागदाच्या होड्या बनवून खेळणं, कधी एकमेकांना चिखलात भिजवणं.. वाटायचं हा पाऊस कधी...

तिचा प्रवास...

लेखिका 'शशिकला बनकर' "स्त्री..तुझी कहाणी " या त्यांच्या पुस्तकात , त्यांनी स्त्री च्या बदलत्या रूपावर फार सुंदर ओळी लिहिल्या आहेत.... "कोंडलेले श्वास आज मुक्त झाले। भावनांनाही पंख फुटले ...। युगायुगाची तुझी वंचना, फुलवी आज मंगलचेतना..। करुण, कांचन, मन तुझे मानी.. तुझे जीवन, तुझी कहानी..।" या ओळी वाचतांना मलाही विचार आला, नेमका स्त्री चा युगायुगाचा प्रवास कसा आहे???🤔 तिच्यावर सखोल विचार करता करता तिच्याशी निगडित जगाची वास्तविकता काय आहे ? हे कळलं.😊 तिचा जन्म झाला ....तिच्याच उदरातून...😊 आणि सुरु झाला तिच्या अत्याचाराचा प्रवास.....🛣️ काही वर्षे तिचं आस्तित्व फक्त चुलीपर्यंत होतं..😔 तीच आस्तित्व त्या चार  दिवसात घरातल्या वाळीत टाकलेल्या कोपऱ्यात होतं.... नवरा गेल्यानंतर डोक्यावरचे केस काढून त्या लाल कापडात गुंडाळलेलं होतं...😔 तिला जगू देत होते.. कारण तिच्यात गर्भाशय होतं..🤰 आणि त्याच उदरातून तिला स्वतंत्र करायला जन्म झाला तिचा..☺️ तिने तिला शिकवलं🗒️..त्या चुलीपुढून उठून ती दाराबाहेर आली..तिला मारलं..तिला जाळलं🔥..तिच्यावर अत्या...

😊माझी चिऊताई...

"हे हाय!!!"👋🏻   मी गॅलरीमधून डोकावून पाहिलं👁️ पण कुणीच नव्हतं.. "असेल कुणीतरी.." "हे अगं मीच आहे. " "हो पण मला तू दिसत 👁️नाही आहे आणि मी तुला ओळखतही नाही" "जरा तुझे भिरभिरणारे डोळे👀 खाली करून बघ, तुझा हाताजवळच 🤚🏻आहे मी" खाली बघितलं तर ती एक चिमणी होती. आपली बालपणाची मैत्रीण. ती - "कशी आहेस?"😃 मी - "काय गं , सगळा कंटाळा आलाय या  lockdown मुळे 😔, पण बरं झालं तू भेटलीस, आता दोघी मिळून जाम गप्पा मारुया😃" ती - "हो 😊, खूप गोडं दिसायला लागलीस गं तू.." मी - " तू पण न 😇, तू मात्र जशीच्या तशीच दिसते😍" ती - "तुला आठवते आपण लहानपणी खूप मस्ती करायचो😆, त्यावेळी तुला बोलताही येत नव्हतं तरी खूप गप्पा मारायचो😂, एकदा तर रांगतारांगता तू तुझा हात माझ्या पायावर दिला होता आणि अजूनही दुखतो तो..🙂" मी - "sorry , आता तर मला माफ कर माझी चिऊताई🥰 , हो मला सगळं आठवतं. तू चिऊ -चिऊ तुझं गाणं म्हणत इकडून - तिकडे अंगणात खेळायची 🤩 आणि तुला पकडण्यासाठी पूर्ण आंगण फिरून , माझे कपडे घाणेर...