आला पर्जन्याचा काळ। बरवे उत्साह सुकाळ।। ग्रीष्मातले सर्वे आळोखे। देऊनि मिटले, सर्व पिळोखे।। आळोखेपिळोखे देऊन कसा तरी लोटायचा ग्रीष्म काळ संपून उत्साहवर्धक पर्जन्याचा काळ येतो. त्याच्या सुगंधाने तो आल्याची चाहूल लागते. वाजत गाजत सडे शिंपडीत, अत्तर उधळीत पर्जन्य ऋतू येतो. आकाशापासून धरतीपर्यंत संपूर्ण वातावरण आणि त्यातील चराचर व जडाजड सर्व प्राणिमात्र त्याच्या स्वागताला तयार असतात. महाराष्ट्रातील जुन्या पिढीतील श्रेष्ठ कवयित्री शांता शेळके यांनी आपल्या लेखणीने या पर्जन्याचे गोडवे गाऊन आपल्या शब्दांच्या हिंदोळ्यावर मराठी रसिकांना झुलविले आहे. पाऊस आला वारा आला। पान लागले नाचू। थेंब तपोरे गोरे गोरे। भर भर गारा वेचू। अवकाळी पाऊस अंगतुकासारखा येतो. हवामान खात्याचे अंदाज चुकवत तो स्वतःच काढलेल्या मुहूर्तावर येतो. बेसावध असलेल्यांना आपल्या धो धो सरींनी चिंब भिजवून काढतो. अशा अवेळी आलेल्या पावसावरील आपलाही राग क्षणभरातच निवळतो आणि आपणही त्याचा आगमनाचे स्वागत करतो. ग्रीष्माने झालेली अंगाची लाही संपण्याचा आनंद. पण अवकाळीच तो. ग्रीष्म म्हणतो माझा वेळ अजून संपला नाही आहे. तू कशाला आलास? ग्रीष्...
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!