Skip to main content

Posts

Showing posts from July, 2020

पाऊस ...!!

आला पर्जन्याचा काळ। बरवे उत्साह सुकाळ।। ग्रीष्मातले सर्वे आळोखे। देऊनि मिटले, सर्व पिळोखे।। आळोखेपिळोखे देऊन कसा तरी लोटायचा ग्रीष्म काळ संपून उत्साहवर्धक पर्जन्याचा काळ येतो. त्याच्या सुगंधाने तो आल्याची चाहूल लागते. वाजत गाजत सडे शिंपडीत, अत्तर उधळीत पर्जन्य ऋतू येतो. आकाशापासून धरतीपर्यंत संपूर्ण वातावरण आणि त्यातील चराचर व जडाजड सर्व प्राणिमात्र त्याच्या स्वागताला तयार असतात. महाराष्ट्रातील जुन्या पिढीतील श्रेष्ठ कवयित्री शांता शेळके यांनी आपल्या लेखणीने या पर्जन्याचे गोडवे गाऊन आपल्या शब्दांच्या हिंदोळ्यावर मराठी रसिकांना झुलविले आहे. पाऊस आला वारा आला। पान लागले नाचू। थेंब तपोरे गोरे गोरे। भर भर गारा वेचू। अवकाळी पाऊस अंगतुकासारखा येतो. हवामान खात्याचे अंदाज चुकवत तो स्वतःच काढलेल्या मुहूर्तावर येतो.  बेसावध असलेल्यांना आपल्या धो धो सरींनी चिंब भिजवून काढतो. अशा अवेळी आलेल्या पावसावरील आपलाही राग क्षणभरातच निवळतो आणि आपणही त्याचा आगमनाचे स्वागत करतो. ग्रीष्माने झालेली अंगाची लाही संपण्याचा आनंद. पण अवकाळीच तो. ग्रीष्म म्हणतो माझा वेळ अजून संपला नाही आहे. तू कशाला आलास? ग्रीष्...

गुरू आणि गुरुदक्षिणा..!!

भारतीय संस्कृतीत संत व गुरू परंपरा सर्वात श्रेष्ठ आहे.  आपण सर्वजण आहोत ते आपल्या आईबाबांमुळे. ते दोघेही आपले प्रथम गुरू आहेत. ते जन्मापासून ज्या प्रेमाने आपले लालन पालन करतात. सर्व प्राथमिक अवस्थेत मदत करतात.  चालायला बोलायला शिकवतात. आई व बाबा दोघांचेही त्यात सारखेच योगदान असते. आई आणि बाबा आपल्या मुलांचे अहित कधीच करीत नाही. त्यामुळे या दोघांनाही सारखाच दर्जा असतो. मुलांना शिस्त, धाक, नकळत बाबांमुळेच असतो. आपला मुलगा/ मुलगी खूप यशस्वी व्हावी, याकिरता बाबा पण खूप कष्ट करतात. त्यांचे वागणे, सवयी, बोलणे, याचा नकळत मुलांवर परिणाम होत असतो. ते आपल्या मुलांसाठी रोल मॉडेलच असतात.   तर आई सारखे दैवत दुसरे या जगात नाही. आईबाबांचे ऋण आपण फेडूच शकत नाही. त्यामुळेच  आपल्याकडून त्यांना अपेक्षित असलेली त्यांची स्वप्ने पूर्ण करणे ही त्यांच्याप्रती आपली गुरुदक्षिणा होय. व्यक्तीच्या वयानुसार त्यांचे विश्व बदलते. समाजात वावर वाढतो. व्यवहार ज्ञान देणारे शिक्षक हे त्याचे गुरू होतात. आईबाबांनी आपल्या पंखांना बळ दिले असते मात्र उडण्याची क्षमता गुरुजी देत असतात. शाळेचे शिक्षक अनेक विषया...

सकाळ वर्णन..!!

आकाशातील तारे हळूहळू अदृश्य होऊ लागले. एखादाच प्रभावी तारा आपले तेजस्वी अस्तित्त्व दाखवीत होता. पण, एकंदरीत मावळतीचे वेध त्यांना लागले होते. पूर्वेकडचे आकाश आता विविध रंगांनी उधळून निघाले होते. एखाद्या चित्रकाराने , आडवे तिडवे फटके आपल्या कॅनव्हासवर मरावेत त्याप्रमाणे क्षणाक्षणाला पहाट दृश्य बदलत होते.  बघता बघता पूर्व क्षितिजाची कडा सोनेरी होऊ लागली. गुडूप दडलेल्या परिसराला हळूहळू जाग येत होती. पक्षांच्या किलबिलाटाने झाडांनाही जाग आली होती. आता सूर्य बराच वर आला होता. पूर्वेकडील तेजस्वी क्षितिज आपले अस्तीत्व क्षणाक्षणाला विस्तारित होते!!!

श्रावण..!

जाता जाता आषाढाने घातली सुरेल साद... हलकेच झेलून घेत श्रावण देऊन बसला प्रतिसाद... तुषार्त धरेला हवा होता चिंब पाऊस धुव्वाधार काळ्या ढगांच्या पखालीतून... तेव्हा आषाढही कोसळला घनघोर... हिरव्या शालूसवे आता वसुंधराही सजली आहे... रिमझिम सरींची आस श्रावणात तिलाही आहे... मनभावन हा सावन मांगल्य देण्या येतो... जगण्याच्या परावरती ऊनसवली होऊन जातो... कुठे वेगात धबधबा... कुठे स्वच्छ तरल झरा... हिरव्या रानाचे हिरवे गुपित... जपण्या येती श्रावण धारा... यावेळी माझा रंग जरा भासतो ना न्यारा... परिवर्तन घडविणाऱ्या  करोनाचा हा प्रताप सारा...

झुक झुक अगीनगाडी...

रेल्वे प्रवास मला माझ्या लहानपणापासूनच अत्यंत ओढ लावणारा, उत्कंठा वाढवणारा असा वाटत आला आहे. 'झुकझुक अगीनगाडी' लहानपणी कोळशाचा इंधनावर चालणाऱ्या रेल्वेगाड्या फार वेगळ्या प्रवासाच्या अनुभव द्यायच्या. धूर, खिडकीतून बाहेर पाहण्याचा प्रयन्त केल्यास डोळ्यात जाणारे कोळशाचे बारीक कण आणि त्यामुळे डोळे लाल होऊन पाणी यायचे..अशा अनेक आठवणी रेल्वे प्रवासाशी निगडीत आहेत. वेगवेगळे लोक, वेगवेगळी भाषा बोलणारे, वेगवेगळ्या स्थानकांवर उतरणारे आणि चढणारे.. कधी सहकूटुंब प्रवास करणारे तर कधी एकट्याचाच प्रवास.. मधेच येणारे विक्रेते तर कधी चेकिंगसाठी अचानक चक्कर टाकून जाणारे रेल्वे सुरक्षा दल. प्रत्येक प्रवास एक वेगळा अनुभव देणारा असतो. मला प्रवासात रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंनी दिसणाऱ्या गोष्टी पाहायला फार आवडतात. शेत, रस्ते, नद्या, पूल आणि बरंच काही. प्रवासाचा अन्य कोणताही प्रकार रेल्वेच्या प्रवासाइतका वेगळा भारत- नजीक नेऊ शकणार नाही. रेल्वे प्रवास दरम्यान आपण जे काही पाहतो ते अवर्णनीय असते. भारतातील रेल्वेचा प्रवास आपणाला आपल्या संस्कृतीचा, आपल्या लोकांच्या आणखी जवळ घेऊन जातो. सोबत ...

आभाळ आणि बाबा....

प्रत्येकदा कवितेत लिहिलेला शब्दांचे अर्थ तेच असतात असं नसतं. जर कवितेत पृथ्वी हा शब्द रेखाटला असेल तर त्या पृथ्वीची तुलना आईशी पण होऊ शकते. तसेच आपल्या बाबांची/ वडिलांची तुलना मी पावसात दाटलेल्या आभाळाशी करते आहे.   लहानपणी आपल्याच बाबाला भिणारी मी आज डोळे वर करून नजरेशी नजर मिळून बोलत आहे. लहानपणी रागवणारा माझा बाप आज मायेच्या प्रेमाने विरघळत आहे. तर कविता सुरु करतेय.. गच्च काळ्या ढगांनी भरलेलं काळंकुट्ट आभाळ, भीती वाटते त्याची कधी कधी, पळणार तरी कुठे आपण त्याच्यापासून, त्याने डोळे उघडले तर, लक्ष-लक्ष एकदाच? फोडून काढलं तर,  पावसाच्या चाबकाने विजेचा तिसरा डोळा भयकरी रागामध्ये, आमीत लपेटून टाकेल आपल्याला? त्याच्या डोळ्याला डोळे भिडवायची काय, मान वर करून पाहण्याची सुद्धा हिंमत नाही, सृष्टीच्या आतलं काहूर जाणवत असतं खरंतर... जीव मुठीत धरून आपलं क्षुद्र जगणं जगत राहणे, एवढच आपल्या हातात, तिची इच्छा असते आपला संवाद व्हावा आभाळाशी, पण तीही मुक्याने आपलं कडू सत्य पचवत राहते, आतले कढ आतच दाबत राहते, हळूहळू अंतर वाढतं, वाढतच जातं, क्रांती करायला लागतं मन वा...

बदल गरजेचा आहे..

ज्या समाजाला आपण आपलं मानतो त्या समाजातले काही जण वेड्यासारखे वागतात. एक साधं उदाहरण घ्या, करोना व्हायरस चीन मध्ये धुमाकूळ घालत असताना आमच्या नागपुरातील काही फार बिनधास्त होते. म्हणे नागपुरी खर्रा करोना व्हायरस वर रामबाण उपाय आहे! गमतीचा भाग सोडला तर नागपूर मध्येच नाही तर अनेक शहरांमध्ये, खेडेगावांमध्ये खर्राचे सेवन होते. आणि मग हे खर्रावीर 'सारे विश्वाची माझे घर' समजून कुठेही थुंकतात. गाडी चालवतांना कोण कुठे थुंकेल आणि थुंकीचे तुषार कुठून तुमच्या अंगावर येतील कळणारही नाही.  थुंकणाऱ्याला मात्र त्याचे काहीही वाटत नाही.  खर्रा खाऊन बोलणाऱ्याची तऱ्हाही वेगळीच. थुंकायचही नाही आणि बोलायचही आहे. जर बोलणे महत्त्वाचे असेल तर इतका बहुमूल्य खर्रा थुंकावा लागतो किंवा गिळावा लागतो. थुंकणाऱ्याला कलाप्रेमींचा दर्जा द्यायला पाहिजे, भिंत कुठलीही असो तिथे त्यांचा कॅनव्हास असतो. बिना ब्रश आणि रंगाशिवाय चित्र रेखाटली जातात. 'इथे थुंकू नये' अश्या सल्यावरच जाणूनबुजून थुंकले जाते. 'इथे थुंकू नये' च्याऐवजी आता देवी देवतांची चित्र लावली जात आहे. तरीही यांना काही फरक पडल्याचे दिसू...