Skip to main content

Posts

Showing posts from May, 2023

एकच प्याला

उन्हाळ्याचे दिवस असले कि ऊन तर असणारच. आणि त्यात नवताप सूरू झाला कि आणखी जास्त असते. अरे इतक्या उन्हात निघायचं का हा प्रश्न माणसाला उन्हात जाण्यापासून थांबवतो. आज ऊन फार जास्त आहे असे म्हणून सूर्याकडे सारखी तक्रार सुरु असतें. अलीकडे मजुरांना बघितलं तर, ते या कडक उन्हातही काम करताना दिसतात कारण त्यांना सवय झालेली असतें. त्रास होतो म्हणून उन्हात जाऊ नये किंवा फिरू नये हा जर विचार केला, तर मला हे कडक ऊन कसं अनुभवयाला मिळेल?. जेव्हा सूर्य स्वतः जळून या संपूर्ण पृथ्वीतलावर उजेड करतो, मग आपण या उन्हाला का भ्यायचं?. या विचाराने आम्हा सर्वांचं जेवण झालं कि, आम्ही तिघेही भर उन्हात फिरायला निघतो. त्यात उमेशचंद्र सर, अभिलाष दादा आणि मी. जितके चटके लागतात उन्हाचे त्यापेक्षा कितीतरी पटीने उन्हात फिरायची मज्जा आहे हे आम्हाला आता माहिती आहे. हसत हसत गप्पागोष्टी करत चालताना, मंद हवेने हलताना झाडांच्या पाना-फुलांकडे बघायचं. सामान्य किंवा गरीब काकांना मदत व्हावी या विचाराने, हिराव्यांकंच झाडांच्या गर्द सावलीत, रस्त्याच्या बाजूला टपरी वरील, उसाच्या गाडीजवळ येऊन थांबायचं. ऊस वाल्या काकांची तर मज्जाच व...

हसणं

हसणं काय असतं? हसणं जे नाती जपायला शिकवतं.. हसणं जे नाती बनवायला शिकवतं.. हसणं जे दुःख विसरायला शिकवतं.. हसणं जे सौंदर्य वाढवतं.. हसणं जे मनाला आनंदी आणि प्रसन्न ठेवतं.. हसणं जे उत्साह वाढवतं.. हसणं जे सकारात्मकतेची ऊर्जा देतं.. हसणं जे आयुष्य जगायला शिकवतं.. हसणं तर खरंच कमाल आहे, जेव्हा फक्त दोन सेकंदाच्या हसण्याने आपला फोटो छान येतो तेव्हा विचार करा दररोज हसण्याने आयुष्य किती सुंदर होईल..!

गर्दी कि माणुसकी

काही दिवसापासून बसमध्ये गर्दी असल्याने घरी जाणं माझं ऑटोने असायचं. पण का कुणास ठाऊक आज बसने जायची इच्छा झाली. बस आली, बसमध्ये एकपण सीट नाही आणि वरून उभे राहणाऱ्यांची पण गर्दी फार. या दाटीमुळे माझा चेहरा हिरमुसला पण रोज जाणाऱ्या काकांचा चेहरा थोडासा पण चिमला नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. "बेटा आप इधर हो जाओ" असं म्हणतं त्यांनी मला उभं राहायला जागा दिली. ते म्हणाले, "एकदा माणसाला सवय झाली कि मग त्रास जाणंवत नसतो. त्यांच्या या बोलण्याने मी पण सहमत झाले कारण, कधी-कधी साध्या गोष्टी साध्य करण्यासाठी पण खूप कष्ट करावे लागतात. मग का म्हणून वेडेवाकडे चेहरे बनून करायचं, हसत हसत करायचं, असच मला त्या काका कडून समजलं. या गोष्टी व्यतिरिक्त आणखी एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे, एका म्हाताऱ्या आजोबांना, एका तरुण मुलाने स्वतः उठून त्यांना बसण्याकरिता सीट दिली. तरुणांमध्ये ताकद तर असते पण दयेचा सागर ही हवा. बसमध्ये दोन सीट वर तिघांना बसतानाही बघितलं. हे सगळं बस मध्ये बघून वाटलं कि माणसांसाठी माणसांना लागणारी माणुसकी वाढत चालली आहे.

गुण प्रत्येकाचे

प्रत्येकामध्ये निरनिराळे गुण असतातच. त्या गुणामुळे मैत्री, आनंद आणि नाती टिकून राहते. माणसांमधील चांगले गुण माहित करून घेण्याच्या प्रयत्नात मला माझा आयुष्यात फार चांगली माणसं मिळाली आहेत. आणि माझ्या ऑफिस मधील मंडळीची तर गंमतचं वेगळी. प्रत्येकामध्ये भरभरून गुण भरलेले आहेत. त्यातील जे गुण मला त्यांच्यात आवडलेत ते सांगायला मला नक्कीच आवडेल. आजू बाजू कोणीही असो पण एकाग्रतेने काम करणारी ती हर्षल.. हो तर हो आणि नाही तर नाही असे, स्पष्टपणे सांगणारे अमोल दादा.. सगळे शांत असताना, एखाद प्रश्न विचारून, चेहऱ्यावरती हसू आणणारे अभिलाष दादा.. बिंदास अशी वैष्णवी.. शांततेत हर्षाने विचारांना सहमत देणारी अमृता ताई.. मोठी असतांनाही छोटी दिसणारी आणि आवडीने माझ्याकरिता सुगंधित फुलं आणणारी शिवानी.. सकारात्मक्तेचे धडे शिकवणारे संतोष सर.. सगळ्यांना मिळावं म्हणून सगळ्याची काळजीपूर्वक काळजी घेणारी प्रतीक्षा मॅडम.. उत्तम मार्गदर्शक आणि कितीही मोठी जबाबदारी डोक्यावरती असताना, स्वतः हसून दुसऱ्यांना हसविणारे उमेशचंद्र सर.. काही क्षणासाठी का होईना पण कामातून वेळ काढून, आम्हाला वरती येऊन भेट देणारी शालू म...

नकळत जुळलेली मैत्री

बोलक्या स्वभाव असणाऱ्या माणसांची नाती सहजतेने जुळत जाते. मग अनोळखी व्यक्तींशीही घट्ट नातं जोडलं जातं. आणि माझ्याही बाबतीत काहीतरी असच घडलं असावं. कधी कोणी मदत केली म्हणून तर कधी कोणाला मदत केली म्हणून, अशीच ती नाती बनत जातात आणि मैत्री होत जाते. अनोळखी मैत्रीच्या सहवासात कधी मोलाचा उपदेशही मिळतो. अशीच मैत्री आणि मित्र-मैत्रिणींची साथ मागील काही महिन्यांपासून मला मिळत चालली आहे. पायी जात असताना,'चल बस कि गाडीवर' म्हणणारी अबोली, मुलीप्रमाणे जपणारे आणि त्रास होऊ नये म्हणून ऑफिस पर्यंत सोडून देणारे काका, बसमध्ये किंवा ऑटोत बसले असताना सारखे माझ्यासोबत गप्पागोष्टींचे खेळ रंगवणारे अंकिता आणि प्रियंका. आणखी काही अनोळखी मित्र-मैत्रिणींची भेट सतत होत असते मात्र त्यांचं नाव विचारनं राहून जातं किंवा सांगितलं असतानाही मी विसरून जाते. ही अशी माझ्यासोबतची अनोळखी मैत्री काही काळापूर्ती राहणार हे ठाऊक असताना सुद्धा मला फार मोलाची वाटते.

रम्य हा पाऊस

गडद निळेशार आभाळातुन पावसाचे पाणी हळू हळू पडायला सुरुवात झाली. पावसाचा वेग वाढत होता आणि मधेच कमी व्हायचा. जसजशी माझी पाऊलं रस्त्यावरून पुढे पुढे जातं होती तसतसा हा पाऊस मला वेगवेगळा भासू लागला. कधी वाटलं झाडाच्या पानांवरून टिपटीप बरसणारा हा पाऊस.. तर कधी तापलेल्या धरणीला शीतल करणारा हा पाऊस.. कधी रस्त्यावर ओला सडा शिंपणारा हा पाऊस.. तर कधी मातीला ओलावा देऊन सुगंध चोहीकडे दरवळणारा हा पाऊस.. कधी जोरात पडून वाचण्यासाठी लोकांना पळवून लावणारा हा पाऊस.. तर कधी हलके पडून स्वतःचा नादात बेधुंद करणारा हा पाऊस.. खरंतर नजरेच्या स्पर्शामधूनी आणि नाजुकशा हसण्यामधूनी हा पाऊस मला बावरणारा, सवारणारा आणि अंगावरती गोडं शहारे आणणारा वाटतो. जितकं कौतुक करावं या रम्य पावसाचं तितके माझ्यासाठी कमीच!