उन्हाळ्याचे दिवस असले कि ऊन तर असणारच. आणि त्यात नवताप सूरू झाला कि आणखी जास्त असते. अरे इतक्या उन्हात निघायचं का हा प्रश्न माणसाला उन्हात जाण्यापासून थांबवतो. आज ऊन फार जास्त आहे असे म्हणून सूर्याकडे सारखी तक्रार सुरु असतें. अलीकडे मजुरांना बघितलं तर, ते या कडक उन्हातही काम करताना दिसतात कारण त्यांना सवय झालेली असतें. त्रास होतो म्हणून उन्हात जाऊ नये किंवा फिरू नये हा जर विचार केला, तर मला हे कडक ऊन कसं अनुभवयाला मिळेल?. जेव्हा सूर्य स्वतः जळून या संपूर्ण पृथ्वीतलावर उजेड करतो, मग आपण या उन्हाला का भ्यायचं?. या विचाराने आम्हा सर्वांचं जेवण झालं कि, आम्ही तिघेही भर उन्हात फिरायला निघतो. त्यात उमेशचंद्र सर, अभिलाष दादा आणि मी. जितके चटके लागतात उन्हाचे त्यापेक्षा कितीतरी पटीने उन्हात फिरायची मज्जा आहे हे आम्हाला आता माहिती आहे. हसत हसत गप्पागोष्टी करत चालताना, मंद हवेने हलताना झाडांच्या पाना-फुलांकडे बघायचं. सामान्य किंवा गरीब काकांना मदत व्हावी या विचाराने, हिराव्यांकंच झाडांच्या गर्द सावलीत, रस्त्याच्या बाजूला टपरी वरील, उसाच्या गाडीजवळ येऊन थांबायचं. ऊस वाल्या काकांची तर मज्जाच व...
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!