Skip to main content

Posts

Showing posts from August, 2022

झेप

आज उडण्याची इच्छा होती पण हिंमत नव्हती. कारण मला उडवणारे माझे पंख तर पूर्णपणे भिजलेले होते. प्रयत्न करणे सोडून देणं हे मात्र चुकीचं असेल माझ्याकरीता म्हणून भिजलेले पंख फडफडायला लागले. मग वाऱ्याची साथ आणि सूर्याने तर कडक ऊन पंखावरती पडून हे पंख कोरडे केले. यांच्या मदतीमुळे पंख कोरडे झाले नि उडण्याची पण इच्छा आहे फक्त हिंमत नाही अजून. मान वर करून हे डोळे आभाळाकडे बघत राहिले तेव्हा या धारणीने हाक मारली. या धरती मातेने 'विजयी भव' म्हणत कपाळावर माती टिळक लावून दिला. आभाळ म्हणालं, 'आम्हाला विश्वास आहे तू नक्कीच इथवर पोहोचशील'. माझी धरती आई म्हणाली,'परत येताना जिंकण्याचा आनंद सोबत घेऊन ये'. या विश्वासाच्या हिमतीसोबत मी उंच भरारी घेतली... ती म्हणजे झेप.

माझं आयुष्य

माझं आयुष्य . मला वाटतं माझं आयुष्य सुगंधित फुलाप्रमाणे आहे , मग जिथे असेल तिथे सुगंध दरवळणे कधीच सोडत नाही . कधी वाटतं माझं आयुष्य भरभरून बहरलेल्या झाडाप्रमाणे आहे , जे वादळात खंबीरपणे उभं राहतं , जे कडक उन्हात छायेसाठी आलेल्याना सावली देतं नि पावसात छत्री बनतं . कधी वाटतं माझं आयुष्य फुलपाखरू प्रमाणे आहे विविधरंगी , कुठल्याही रंगात गेलं तर एक तरी रंग नक्कीच मिसळेल. कधी वाटतं माझं आयुष्य जलाप्रमाणे आहे , चव तर नाही पण महत्वाचं . कधी वाटतं माझं आयुष्य सूर्याच्या तेजाचं नि चंद्राच्या शीतलतेचं आहे . कधी वाटतं माझं आयुष्य सागरासारखं आहे , जिथे मर्यादा आहेत पण पंख कापून आत ठेवणारा पिंजरा नाही . मर्यादा जरी असल्या तरी लाटा खुशाल मर्यादेपर्यंत जाऊन मानमर्जीने वापस येतात . हो ना आयुष्य तर फारच सुंदर आहे

योग्य कि अयोग्य ?

योग्य कि अयोग्य ? हा प्रश्न कदाचित कित्येकदा माझ्या समोर असतो. आज पुन्हा एकदा हाच प्रश्न समोर होता. गोष्ट फार छोटीशी. आजीचं निधन झालं त्यामुळे घरी दुःखाचं वातावरण होत . जुनी चालत आलेली परंपरा आणि विधी - नियम . असं नाही चालणार / ते करू नये , असं सुरूच होत . नेहमी प्रमाणे मी आजही देवाजवळ दिवा लावला. अगदी निर्मळ मानाने - भावेने देवाकडे प्रार्थना केली . या परिस्थितीत येवढ मोठं वादळ माझ्यापुढे उभं राहील याची कल्पना नव्हतीच मला . सगळे माझ्यावरती ओरडायला लागले . "घरी कोणी मरण पावलं आणि हिला देवापुढे दिवा लावायचं सुचतंय ". मी शांत बसणाऱ्यांमधून नव्हतीच , मी प्रश्न केला ,"तुमच्या मधून सांगा मला कोणीतरी कि दिवा का लावू नये? ". त्यात मला उत्तर मात्र हेच मिळालं "देवावरची नाराजगी ". मग मी म्हणाले ,"मला मान्य आहे हे सगळं. मी फक्त आजवर, या विधी- नियम फक्त बघितले पण प्रमाण तर अजून सुद्धा नाही मिळालं मला . कोणाला मरण आलं तर देवाजवळ दिवा लावणे हे कसं चुकीचं ठरू शकतं?, त्यामुळे फार मोठा अनर्थ किंवा पाप घडेल हे मान्य नाही मला . मला माहित आहे यावेळेला सगळे दुःखात आ...

विचार

आज तिने छान फुले तोडली. एक सुंदर हार तयार केला. देवघर सुंदर फुलांनी सजवलं नि देवाजवळ रांगोळी काढली, हार चढवला नि प्रार्थना केली. "देवा सगळ्यांच दुःख दूर कर". तिकडून तिची आई आली. हे सगळं बघताच ती खूप खुश झाली. नि तिला म्हणाली, "माझी गुणाची बाळ ग". ही आनंदाची वेळ कधी संपूच नये असं तिला वाटलं. नंतर क्षणात पूर यावा तसच झालंय. जेव्हा तिच्या आईला कळलं की तिला पाळी आली, तिने लगेच मुलीवरती ओरडणं सुरू केलं. "तुला मी कितीदा सांगितलं की पाळी आली असता देवाला हात लावायचा नाही, दूर राहायचं, पण तू तर ऐकतच नाही". तिने बनवलेला सुंदर हार पण देवापासून काढण्यात आला. त्यात पाहुणे आले आणि पाहुण्यांमध्ये तर चर्चेचा विषयच बनला. तिच्या मनात असंख्य प्रश्न होते पण उत्तर तिला समाधानकारक कधी मिळालच नाही. अस कित्येकदा तिच्या बाबतीत नाही तर माझ्याही बाबतीत घडलंय. खरंच मुलींना पाळी आली की इतकं का बंधन असतं की तिने साधं आपलं मन सुद्धा देवासमोर व्यक्त न करावं? देवा समोर का जाऊ नये? मंदिरात जाऊ नये हे असले कसले बंधन? मुलींना पाळीत शारीरिक त्रासासोबत मानसिक तणावही जाणवतो. मग शांत, समाधानी...

जगावे ते दुसऱ्यांसाठी

कधी कधी ना मी फारच आनंदी असते. मग रत्यावरून जातांना काका काकुंशी बोलते , आजी आजोबांशी बोलते आणि माझ्या प्रिय बालमित्रांसोबतही बोलते . आज तर एका काकांशी भेट झाली . कडक नि भारदस्त व्यक्तित्व त्यांचं . क्षणात त्यांनी मला त्यांचा मुठीतच घेतलं बघा . आम्ही खूप बोललो निदान अर्धा तास तर झालेच असावेत . मिल्ट्रीत काम करतात असं त्यांनी सांगितलं . तसं विचाराने पण फार मोठे बरं . मला म्हणाले "शिक्षण याचं महत्त्व फक्त नोकरी पुरतं सीमित नसावे तर ते असं ध्येय साध्य करण्यासाठी असावं ज्यात दुसऱ्याचं हित सुद्धा लपलेलं असेल" . शिक्षणाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळाच. इतका पैसा आणि नौकर असून सुद्धा आजूबाजूला पडलेल्या रस्त्यावरचा कचरा वेळ मिळेल तेव्हा साफ करतात . खरंच माणूस मोठा शिक्षणाने मिळवलेल्या मोठ्या नौकरी मुळेच नाही तर ते छोट्या छोट्या सुधारणे मुळेही मोठी होतात . अश्या दृष्टिकोन ठेवणाऱ्यांची आणि अश्या सुधारणेची या भारताला आजही गरज आहे. कारण कुठलीही गोस्ट आपल्या देशातल्या माती पेक्षा मोठी असू शकत नाही.

दया

रोजप्रमाणे आजही मी त्याच रस्त्या वरून जात होती. नि त्या सफाई करणाऱ्या काकुंची भेट होणार हे नक्की माहीत होतं. नेहमी एक गोडं हास्य टिपलेलं असतं बघा. मग काय त्यांना बघून मग मी पण हसली. पण आज तर त्यांनी कमालच केली. खरच केली का की मलाच अस वाटतं हे नाही माहीत. रस्त्यावरचा आजूबाजूला पडलेला पूर्ण कचरा त्यांनी गोळा केला. आणि आता त्याला जाळणार तर त्यात त्यांना एका प्लास्टिक मध्ये बांधलेल्या शिळ्या चपाती भेटल्या. त्यांनी त्या प्लास्टिक मध्ये बांधलेल्या चपाती काढल्या नि आमचा बाजूला उभ्या असलेल्या दोन गाईला टाकल्या. खरंतार कचऱ्या सोबत त्या चपाती जाळल्या गेल्या असत्या पण त्यांच्यात असलेल्या दयेचा सागर खळखळून जागा झाला. काकू कमी शिक्षित असून सुद्धा काहीही न बोलता शिक्षणाचा खरा उपयोग, मनात करुणा आणि अन्नपूर्णा मातेचा आदर करावा ही शिकवण दिली.