Skip to main content

Posts

Showing posts from July, 2021

आमचं नागपूर

नागपूरचे आराध्य दैवत आहे टेकडीचा गणपती, आमच्या नागपूर शहराची काय वर्णावी महती..! नागपूर शहर आहे महाराष्ट्राची उपराजधानी, भारताच्या इतिहासात आहे प्रसिद्ध संत्रानगरी..! नागपूरला जोपासल्या जातात संस्कृती आणि परंपरा, जुन्या नव्याशी सांगड घालणे हाच आमुचा मंत्र खरा..! नागपूरला लाभला आहे ऐतिहासिक वारसा, भविष्याचा वेध घेऊन नवनिर्मितीचा आरसा..! वाडा, घरे, फ्लॅट यांनी राखली नागपूरची शान, वृद्ध, तरुण, मुले यांचा जमतो मेळ छान..! कर्तृत्ववान व्यक्तींचा आहे आम्हाला अभिमान, खरच आमचं शहर आहे महान..! दिक्षाभूमी, संघभूमी, चर्च आणि मशिस, सर्वधर्म समभावाचे हेच आहे प्रतिक..! सण उत्सवाचा घातला जातो मेळ, क्रीडा, चित्रकला, संगीत, नृत्यांचाही खेळला जातो खेळ..! स्वच्छ सुंदर नागपूर शहर हाच अमुचा ध्यास, पर्यावरणाचा समतोल राखला जातो खास..! धावत्या मेट्रोची आहे आम्हाला उत्सुकता फार, आधुनिकतेशी नाते जोडणे हेच जीवनाचे सार..! शिक्षण हेच आमुच्या जीवनाचे तंत्र, सुख-समाधानी राहणे हाच अमुचा जगण्याचा मंत्र..!

रम्य हा पावसाळा

पावसाळा हा बहुतेक सर्वांनाच आवडतो. लहान मुलांना तर हा ऋतू अत्यंत आवडीचा असा ऋतू आहे. कारण या काळात आईवडिलांनी कितीही रागवलं तरी पावसाच्या सरीत जाणूनबुजून भिजतांना फार मजा वाटत असते. त्यातच त्या चिखलात नाचतांना व कपडे भरवतांनाही फारच गंमत येते. पावसाच्या पाण्यात चिंब चिंब भिजण्यात   सर्वात जास्त मजा ग्रामीण भागात असते. पावसाळ्यात सतत पडणारं थंड पाणी. त्यातच जमीनीत उगविलेली हिरवळ जणू डोळ्याचं पारणं फेडीत असते. त्यातच या गवतावरून त्या गवतावर उडणाऱ्या फुलचुख्या मन मोहून टाकत असतात. त्यातच रंगबेरंगी दिसणारे वा मन मोहून टाकणारे फुलपाखरूही आपल्या अजब रंग व ढंगांनी आकर्षित करीत असतात. त्यातच अधून मधून बेडकांचे डराव डराव ऐकायला येत असते पावसाची ही हलकीशी सर, त्यातच खाली हिरवळ, सोसाट्याचा मंद मंद वारा, ढगांचा आवाज व विजेचा गडगडाहट त्यातच कधी इंद्रधनुष्य. खरंच पावसाळा हा ऋतू जरी लोकांना आवडत नसेल पण तरी पावसाची रम्यता इतकी आहे की ती बोटावर सहज मोजता येत नाही. आणि म्हणून असचं वाटतं की हा रमणीय पावसाळा कधी संपूच नये!

क्षितिज

दुःख जेव्हा जीवनाला कवेत घेऊन मिरवतं, तेव्हा कुठलाही पर्याय समोर राहत नाही आणि मग ते दुःखच आपलं सोबती बनतं. दुःखाला एक प्रकारच गूढ सौंदर्य प्राप्त होतं. त्या गूढ सौंदर्यला तनमनावर पांघरून कवींची कविता जन्म घेते. पण ही साधना सगळ्यांना कुठे साध्य होते. त्यासाठी ग्रेसांसारखे कवी लाखात एक जन्मतात आणि त्यांच्या लेखणीतून कवितांचा महामेरू तयार होतो. ग्रेसांच्या कवितेने सांजेशी हितगुज साधत आपलं दुःख देखणं केलंय. क्षितिजाला सांज झाली की कसली ओढ लागते ना! वसुंधरेच्या कुशीत शिरायची. जणू सांजेला दुःख झालं की फुलं कोमेजली आणि पाखरांचा थवा घरी परतताना दिसला की मनी आनंद पेरावा. "क्षितिजास लागे कशी ओढ वेडी,  तुझ्या गावाची वाट चाले पुढे.. फुलांच्या नशिबात कोमेजने अन, थवा पाखरांचा उदासी उडे.." तुझ्या शब्दांमध्ये इतकं सामर्थ्य आहे की तुझ्याशी बोलल्यावर माझ्या पापण्या आपोआप ओलावतात, ज्या कधीच्या भावनाशून्य होऊन एक ओलेतेपण हरवून बसल्या होत्या. त्या तुझ्याशी बोलल्यावर आपोआप भावनेच्या गंगेमध्ये न्हातात. मग तू कितीही दुःख उरी पेरलं असलंस तरी ती ओढ, ती आपुलकी, ते प्रेम तुझ्या शब्दांनी सांभाळलंय म्हणू...

निसर्ग

आज स्वप्नी माझा निसर्ग आला खरा, का कुणा विचारू दिसला का तुम्हा ! निजले होते मी एकांती झाडाखाली, उठल्यावरी दिसले निसर्ग हा समोरी ! होती राने-वने नी खळखळणारी नदी, डोंगराची ती रांगे होती नदी किनारी ! डोंगराच्या मधूनी सूर्य हा उगवला, का कुणा विचारू दिसला का तुम्हा !! रंगेबिरंगी फुलं हे बागेत फुललेले,  वाटे मला जणू का किती सुंदर बहरले ! पक्षांचा थवा हा आकाशी उडाला,  तिकडे हळूच हा वाऱ्याचा शहारा ! हो अशी नवी पहाट दिसली ही मला, का कुणा विचारू दिसला का तुम्हा !! मन आनंदी झाले दृश्य पाहून सारे, वाटे मला हे कधी न विसरावे ! निसर्ग दृश्य हे नयनी असे रमले, स्वप्नी माझा हा निसर्ग भेटला, वाटे मला हा भेटेल का पुन्हा..!!

मनामनातला पाऊस

मानवी मन, त्यात उठवणाऱ्या भावना आणि अल्हादलेली सृष्टी खूप अनोखं रसायन आहे हे. कविमनाला उभारी देणारा हा पाऊस पावसाळ्यात कवींची झोळी भरून टाकतो. मनात दाटलेलं मळभ सरींसोबत कवी माळत असतो. पाऊस ही भावनाच कवी मनासाठी सुखदायी असते. एक अप्रतिम कवितेचा नजराना कवितेतून कवी पावसात मांडत असतो. पाऊस हा मनाला व्यक्त करणारा साधन आहे असही मनाला हरकत नाही. अंगभर थंडगार शिरशिरी आणणारा हा पाऊस मानवी मनाचे असंख्य कंगोरे उलगडत जातो. * पाऊस म्हणजे चिखल सारा..   पाऊस म्हणजे मरगळ.. पाऊस म्हणजे गार वारा.. पाऊस म्हणजे हिरवळ..* कवी सौमित्राच्या या ओळी ऐकल्या तर पाऊस अधिक समृद्ध असल्यासारखा वाटतो. आकाशातून थेट कोसळणाऱ्या पावसाचा येणाच्या सांगावा मिळतो, तेव्हा उभा नांगर धरून शेतकरीही सज्ज होतो. पावसाच्या वाटेवर शेतकऱ्यांच्या भविष्याची स्वप्ने टक लावून बसली असतात. शेताला हिरवा शालू नेसवायला, कपड्यांना चिखलात माखवायला, मातीत स्वतःला रंगवायला तो आसुसलेला असतो. पावसाचं रुसणं, फुगणं, कधीही येणं, न सांगताच जाणं हे सगळं तो अनुभवतो.  त्याच्या वेळेवर येण्यानं माती ओली झाली तर शेतकऱ्यांची आभाळभर स्वप्ने पुढे साकारत...