Skip to main content

Posts

Showing posts from May, 2021

रमाईची शिकवण!!

  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन घडविण्यात रमाईचा मोठा वाटा आहे. रमाई म्हणजे बाबासाहेबांची सावली. रमाईच्या जीवनाच्या अनेक घटना आहेत पण काही तर हृदयाला स्पर्श करणाऱ्या आहेत. एका प्रसंगी बाबासाहेबांच्या सत्कार समारंभात रमाईला नेसायला लुगडे नव्हते. तेव्हा रमाईने बाबासाहेबांचा फेटा लुगडे म्हणून घातला. गरिबीची केवढी मोठी शोकांतिका!  पण रमाईच्या त्यागामुळे आज लाखो महिलांचे जीवनच बदलून गेले आहे. असं म्हणतात, "रमाबाई संसारात रमल्या आणि भीमराव पुस्तकात".  बाबासाहेब तहानभूक विसरून पुस्तक वाचण्यात दंग असत. एकदा जेवण्याची वेळ झाली असता रमाबाईंनी त्यांच्यापुढे जेवणाचे ताट ठेवले. पण जेव्हा रमाबाई परत आल्या तरी बाबासाहेबांनी जेवण केलं नव्हतं. मग रमाईने वाचत असलेल्या पुस्तकाचे पानं उघडत म्हणाल्या, "बायकोशी कसं वागावे, कुटुंबाशी कसं वागावे हे लिहिलं असेल तेवढं मला वाचून दाखवा". बाबासाहेब हसले आणि म्हणाले, "अगं वेडे असं काहीही नाही लिहिलंय यात'.  बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक संकटात रमाई संघर्षारत राहिल्या, हालअपेष्टा, दुःख गरिबी यावर मात केली. बाबासाहेबांपर्यं...

रंग त्यांचा वेगळा..

  आज चित्र काढत असताना, सहज एका काकूने म्हटलं, "काय चित्र काढत बसलीस, काहीतरी महत्वाचं काम कर.." मग काय चित्र काढूच नये? की काढावं.  खरंतर बालमानसशास्त्रात चित्रांना आगळेवेगळे महत्व आहे. चित्रे काढणे हे व्यक्त होण्याचे माध्यम आहे. भिंती, फरशी  खराब होते असे असंख्य कारणे तयार असतातच.  'हे नको करू, ते नको करू' या गोष्टींमुळे मुलांच्या मनावर  प्रचंड तणाव येतो. मग दुष्परिणाम हेच की त्यांची काल्पनिक शक्ती किंवा विचार करण्याची, प्रदर्शित करण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची वृत्ती विकसित होत नाही. मग मोकळेपणाने चित्र काढणे, खेळणे, बागडने हाच त्यावर उपाय. नुकतीच घडलेली एक गोष्ट बघा, माझ्या मैत्रिणीच्या छोट्या बहिनेने एक चित्र काढलं आणि ते आम्हाला दाखवलं. त्यात तिने लाल नदी काढली.  म्हणून काकू ओरडली या भावनेने की, "काय हे रक्त काढलं म्हणून". कोव्हिडमुळे तिचीही मानसिकता थोडी नाजूक झाली होती. ती आमच्या सर्वांमधून लहान होती आणि म्हणून तिची कल्पकता, विचार खरे तर आपल्याही कल्पनाशक्तीच्या पलीकडे असू शकते. मला वाटतं की त्या लाल नदीला रक्त म्हणून सीमित करता येणार नाही, त्यात न...

मी करोना बोलतोय!

  नमस्कार ,  मी करोना विषाणू बोलतोय.  माझा विशेष परिचय देण्याची गरज नाही, मी सर्वपरिचित आहे. मला देशांच्या सीमा माहित नाही ना मला वर्ण, जात, धर्म कळते. एकमेकांमध्ये भेद करणे हा माणसाचा स्वभाव आहे माझा नाही कारण मी विषाणू आहे!   माझा जन्म कुठे झाला हा वादाचा विषय आहे. परंतु एक मात्र नक्की माझा आगमनाने स्वतःला सर्वव्यापी, सर्वज्ञानी समजणाऱ्या मानवी अहंकाराला मोठा धक्का बसलायं. संपूर्ण सृष्टीवर स्वतःचा एकाधिकार गाजवणाऱ्या मानवाला माझ्या येण्याने कळले असेल की, तो फक्त सृष्टीचा एक छोटा भाग आहे, संपूर्ण सृष्टी नाही. या भूतलावर अनेक जीव-जंतू, प्राणी, पक्षी आहेत आणि त्याचाही या पृथ्वीवर मानवा इतकाच आधिकार आहे. माझ्यामुळे कधीही कल्पना न केलेली परिस्थिती मानवावर ओढवली. ओसाड शहरे, निर्मनुष्य रस्ते, गाड्यांचा धूर नाही, उद्योगांचा गोंगाट नाही..सगळीकडे स्मशान शांतता. याच काळात पर्यावर्णनाने सुटकेचा श्वास घेतला. वृक्षांची ताजी हवा, प्राणांचा मुक्तसंचार, स्वच्छ प्रवाहित नद्या, दूरवरून दिसणारे स्पष्ट डोंगर, म्हणजे संपूर्ण निसर्ग त्याच्या मूळ स्वरूपात आहे. मी नसतो तर  कदाचित...

प्राधान्य

  मागच्या आठवड्यात आई आणि मी एका दादाला भेटले. अधून मधून कधी दुकानात हार घ्यायला येत असतो दरवेळी फार कमी बोलतो पण या वेळी जरा  गप्पा जास्तच रंगल्या. त्यात आईने सहज विचारलं  "कि काय करत आहे तू आता?" त्यावर तो म्हणाला, "स्पर्धा परीक्षा पुढच्या महिन्यात आहे, त्याच वेळी एमए प्रथम वर्षाची पण परीक्षा आहे. समजतच नाही काय करू ते? " प्रश्न लक्षात आला. तो होतकरू होता आणि स्पर्धा परीक्षेची पण तयारी जोमात सुरु होती. आई म्हणाली तुला एक साधी गोष्ट सांगू का? ऐकशील न..आमच्या दोघांचाही "हो" ऐकल्यावर आईने गोष्ट सांगण्यास सुरुवात केली.  एकदा एक शेतकरी गावातील  एका माणसाकडे गेला आणि त्याला म्हणाला, "समजतच नाही काय करावं ते? शेतात पऱ्हाटी पेरली होती मात्र त्यात एवढं तण उगवलं कि पऱ्हाटीच्याही वर गेलं..समजतच नाही काय करावं?" त्यावर त्या माणसाने उत्तर दिलं, "सोपं आहे, पऱ्हाटी उपटून टाक". शेतकरी ठणक्यात म्हणाला,"काहीही का काहीही सांगता! अशी कशी उपटून टाकणार." यावर तो माणूस म्हणाला, "अरे भल्या माणसा उत्तर तर तुझ्याच कडे आहे." आईची गोष्ट ऐकून,...

आयुष्याची वाट नेमकी कुठे?

 आयुष्य शब्द उच्चारताच आपल्या जीवनातल्या संपूर्ण आयुष्याची आठवण येते. मग त्यात इतिहास असो वा भविष्य. कधी आयुष्य हसत-हसत हसवतं, तर कधी रडत-रडत रडवतं. कधी हसत रडवतं तर कधी रडत हसवतं.  नेमका ऊन सावली असल्याचा खेळ हा आपल्या सोबत खेळून निघून जातं. कधी त्याचं रूप हे नदीतल्या खळखळणाऱ्या पाण्यासारखं असतं तर कधी समुद्राच्या लाटांसारखं. कधी एकाच क्षणाला खूप काही देऊन जातं तर कधी एकाच क्षणाला खूप काही घेऊन जातं.  जीवनात येणाऱ्या प्रत्येकाशी ओळख करून देतो आणि नकळत प्रत्येकांबद्दल भावना निर्माण करून निघून जातं. आणि या भावनातच कधी कुणाबद्दल राग, कधी चीड, कधी प्रेम उत्साह तर कधी समाधान निर्माण होते. कधी याच आयुष्यात त्या बांधलेल्या धाग्याप्रमाणे गुंतल्यासारखं वाटतं तर कधी संथ पाणी असलेल्या नदी किनाऱ्यासमोर बसून थंडगार वाऱ्याचा आस्वाद आणि मोकळा श्वास घेतल्या सारखं वाटतं. आयुष्याची व्याख्या कशी करायची तेच नेमकं कळत नाही? कारण प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळं असतं, बदलत असतं.  "आयुष्याच्या आयुष्यात आयुष्य जगणं फार कठीण आहे कि सोपं हे आयुष्यच शिकवतं" .  आयुष्याचा रस्ता तर खडतर असतो पण ...