महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन घडविण्यात रमाईचा मोठा वाटा आहे. रमाई म्हणजे बाबासाहेबांची सावली. रमाईच्या जीवनाच्या अनेक घटना आहेत पण काही तर हृदयाला स्पर्श करणाऱ्या आहेत. एका प्रसंगी बाबासाहेबांच्या सत्कार समारंभात रमाईला नेसायला लुगडे नव्हते. तेव्हा रमाईने बाबासाहेबांचा फेटा लुगडे म्हणून घातला. गरिबीची केवढी मोठी शोकांतिका! पण रमाईच्या त्यागामुळे आज लाखो महिलांचे जीवनच बदलून गेले आहे. असं म्हणतात, "रमाबाई संसारात रमल्या आणि भीमराव पुस्तकात". बाबासाहेब तहानभूक विसरून पुस्तक वाचण्यात दंग असत. एकदा जेवण्याची वेळ झाली असता रमाबाईंनी त्यांच्यापुढे जेवणाचे ताट ठेवले. पण जेव्हा रमाबाई परत आल्या तरी बाबासाहेबांनी जेवण केलं नव्हतं. मग रमाईने वाचत असलेल्या पुस्तकाचे पानं उघडत म्हणाल्या, "बायकोशी कसं वागावे, कुटुंबाशी कसं वागावे हे लिहिलं असेल तेवढं मला वाचून दाखवा". बाबासाहेब हसले आणि म्हणाले, "अगं वेडे असं काहीही नाही लिहिलंय यात'. बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक संकटात रमाई संघर्षारत राहिल्या, हालअपेष्टा, दुःख गरिबी यावर मात केली. बाबासाहेबांपर्यं...
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!