Skip to main content

Posts

Showing posts from February, 2023

फुलांचं कौतुक

फुले छोटेसे असले तरी त्यांच्याकडून मिळणारी शिकवण मात्र मोठी. फुलं दिसायला फार सुंदर नि नाजूक असतात पण त्यांच्या सुंदरतेपेक्षा त्यांचा सुगंध दरवळणाऱ्या गुणांचं कौतुक केल्या जातं. फुलांना माहित असतं कि या एवढ्या कडक तापलेल्या उन्हात, ते नक्कीच चिमतील पण तरीही नव्याने बहरणे ते कधीच सोडत नाही. जेव्हा आज मी प्रयत्न करून थकले होते, तेव्हा या फुलांनी मला त्यांच्यासारखं बहरणं शिकवलं आणि सतत चांगल्या गुणांचा सुगंध दरवळत कौतुकास्पद होण्यास सांगितलं.

कधी वाटतं..

वाटतं कधी इवलंस चिमुकलं फुल बनावे.. कधी वाटतं या हालक्या फुलक्या ढगांच्या रंगात रंगावे.. कधी वाटतं झाडावरती बांधलेल्या झुल्यावर बसून उंच झोके घ्यावे.. कधी वाटतं गायकांच्या आवाजात सुरु मिसळूनी नाद मनाला लावावे.. कधी वाटतं टपरी वरचा बर्फचा गोळा खाऊन जीभ-ओठ, चक्क काळे-लाल होऊ द्यावे.. कधी वाटतं कागदाची रंगीत भिंगरी विकत घेऊन, तिला वाहत्या वाऱ्यासंग भिडवावे.. खरं म्हणजे खूप सुंदर आहे हे जगणं, जगले तरी अजून जगावेसे वाटते..!!

जिंकणे आमचे कि सर्वांचे

आज लहानपणीप्रमांणे मी आणि दादू म्हणजे माझा लहान भाऊ आई-बाबां बरोबर खेळलो. खेळ तो आमचा आवडता लगोरीचा. एका गटात आईबाबा आणि एका गटात आम्ही दोघे. आम्हा दोघांना पुरेपूर विश्वास होता कि जिंकणार तर आम्हीच. आणि आईबाबांना कदाचित स्वतः पेक्षा आमच्यावरती विश्वास होता. मग काय खेळण्याची रंगीन जादू सुरु झाली. आणि हा खेळ कसा पटकन संपला कळलं सुद्धा नाही. जिंकल्यानंतर आम्ही आईबाबांना हसत खेळत आणि खरंतर चिडवत म्हणालो, "आई बाबा आम्ही जिंकलो आणि तुम्ही मात्र हरले". तरीही आईबाबाच्या चेहऱ्यावर आनंद आमच्यापेक्षाही दुप्पट पटीने दिसत होता. आमच्या चिडवाण्यावर त्यांनी खूप सुंदर प्रतिसाद दिला, "माझी लेकरं जिंकली तर आम्ही पण जिंकलोच कि". या त्यांच्या शब्दाने सगळ्यांच्या मनावरती फक्त जिंकण्याच आदर्श समोर आणलं. आणि आम्ही दोघेही हसत मोठ्याने ओरडत म्हणालो, "या अर्थाने तर आपण चौघेही जिंकलो" म्हणजे हे जिंकणे फक्त आमचे नाहीतर सर्वांचे आहेत.

आईच मागणं

आई आपल्या लेकरांना कधीच अंतर देत नाही. जिवंत असेपर्यंत तर नाहीच. लेकरांना आपल्या डोळ्यादेखत झालेला त्रास तिला कधीच पाहवत नाही. जणू काही मोठं झाल्यानंतरही तिच्या लेकरांचा सारा भार तिच्याकडे असावा असच तिला वाटत असावं. मी संस्काराने आणि कर्तृत्वाने घडवालेल्या लेकरांना, मी नाही जपायचं तर कोण रक्षण करेल? हा प्रश्न तिचा तिलाच सारखा पडत असतो. याच भावानेने मग नभाअंगणात जरी चंद्र-तरका निरोप द्यायला आलेत तरी ती, मोठ्या ताठ मानेने उभी राहून त्याकडे मागणं करते, "मला स्वर्ग नकोय, मला माझा लेकरांचं रक्षण हवंय".