आज बाबांवर खूप चिडली होती थोडी रागावली पण होती. मात्र राग शांत झाल्यानंतर वाटलं "जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेले बघू शकत नाही. परंतु एक वडीलच असतात जे आपल्या मुलाला अपल्यापेक्षा पुढे गेलेले पाहून आनंदी होतात". आईप्रमाणे वडिलांचे महत्वही जीवनात खूप महत्वाचे असते. आई-बाबा या दोन शब्दामध्ये जणू काही आपले विश्व सामावलेले आहे. जन्म देणाऱ्या आईने आपल्याला हे सुंदर जग दाखविले आणि बाबांनी आपल्याला मोठे करण्यासाठी दिवस रात्र कष्ट केले.
असे म्हणतात की आईही दिव्याची ज्योत असते आणि त्याचा प्रकाश परिवाराला मिळवा म्हणून ज्योतीचे चटके सहन करणारे असतात आपले बाबा. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आई-बाबा झटतात.
बाबांचे प्रेम हे निस्वार्थी असते, आपण कितीही मोठे झाले तरी त्यांच्यासाठी आपण लहानंच असतो. आपण यशस्वी व्हावे हेच त्यांचे स्वप्न असते. तेच आपल्यावर संस्कार घडवितात व जीवनात योग्य मार्गदर्शन देत असतात. लहान असल्यापासून आईच मुलांना सांगत असते. कुठे जाऊ नको, काही करू नको बाबा मारेल. शाळेत जा नाहीतर बाबा मारेल, हे करू नको, ते करू नको, बाबा मारेल. बाबांनी मारू नये म्हणून अभ्यास करतात. बाबांच्या दहशतीखाली शिकत राहतात. हळूहळू बाबांवर दुर्लक्ष करून मुलं आईवरच प्रेम करू लागतात. पण असं असूनही बाबा गेल्यावर मुलांच्या छातीत धडकी का भरते? मुलांना आपण निराधार झालोय असे का वाटते? बाबा कुणालाच मारत नाही तरी आपण का घाबरतो? ...
असो ..पण शेवटी वडिलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही हे तितकेच खरं आहे.!!
👌👌👌
ReplyDeleteTy☺☺
ReplyDelete