सोळाव्या शतकात आजच्या दिवशी शिवनेरी किल्यावर एक तेजस्वी तारा चमकला आणि माझा राजा जन्माला आला. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व आणि शिवराज्याभिषेक जगातल्या, महाराष्ट्राच्या पैलूंशी कसं निगडित आहे, आणि त्याच प्रेरणेने बिघडणाऱ्या महाराष्ट्राच्या परिस्थितीला कसं सुधारू शकतो? हे तितकेच तातडीने, जोमाने सांगायला मला आवडेल.
"विजयाची तलवार चालून गेले, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेले, आपल्या वाघ नखाने अफजलखानचा कोथडा फाडून गेले, भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामाची कारण साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊंची..
आजही आपण म्हणतो स्वर्गात गेल्यावर देवांनी झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला."
"स्वतःचा मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही, आणि अशा सामर्थ्याला हरविण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही. " हे धाडस करून दाखवणारे आपले सर्वांचे लाडके असे थोर व्यक्तिमत्त्व असणारे छत्रपती शिवाजी महाराज.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण याचा अर्थ त्यांच्या नावाचा प्रत्येक अक्षरात दडलेला आहे.
'छ' म्हणजे छत्तीस वाघांचे बळ असणारे.
'त्र' म्हणजे त्रस्त मोघलांना करणारे
'प' म्हणजे परत कधी न फिरणारे
'ती' तिन्ही जगात जाणणारे
'शि' म्हणजे शिस्तप्रिय
'वा' म्हणजे वाणिज्यतेज
'जी' म्हणजे जिजाऊंचे पुत्र
'म' म्हणजे महाराष्ट्राची महान अशी शान
'हा' म्हणजे हार न मानणारे
'रा' म्हणजे राज्याचे हितचिंतक
'ज' म्हणजे जणता राजा
अशा या महान शिवाजी महाराजांचा अभिषेक शिराज्याभिषेक म्हणून ओळखला जातो. ही राज्यघटना आजही इतिहासाच्या पानावर अजरामर आहे, जितके आपले शिवाजी महाराज प्रत्येकाच्या मनात.
इतिहासाच्या पानावर रुजून बसलेला हा भव्यदिव्य सोहळा शिस्तबद्ध, रितीरिवाज, मानमर्यादा, आदर अशा अनेक गोष्टींची शिकवण देतांना एक प्रेरणास्थान बनलेला आहे.
आयुष्यभर भवानी मातेचा छत्रछायेखाली असतांनाच ते जनतेसाठी जगले, गुलामगिरीच्या जगण्याला त्यांनी नाकारले. वेदांचे , पुराणांचे, मंदिराचे महाराजांनी रक्षण केले. त्यांच्यावर लहानपणापासून मातोश्री जिजाऊंचे आणि पिताश्री शहाजीराजांचे सुसंस्कार होते. "माझा शिवबा परक्याची चाकरी करणार नाही, तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करेल " या जिजाऊ मातेच्या उच्च विचारामुळे महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षीच रायरेश्वराचा मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, नंतर सोळाव्या वर्षी तोरणगड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले.
शिवराज्याभिषेक हा फक्त शिवाजी महाराजांचा केला जाणारा अभिषेक असला तरी, यामागे शिवाजी महाराजांचा कितीतरी गोष्टी दडलेल्या आहेत. जसे त्यांनी स्वराज्य मिळवण्यासाठी केलेली मेहनत, जिंकावे म्हणून लहानपणापासून ढाल, तलवार, दांडपट्टाचे घेतलेले प्रशिक्षण. त्यांनी मोठ्या युक्तीने आणि शक्तीने अनेकांचा पराभव करून अनेक गड-किल्ले जिंकले एवढंच नाहीतर त्यांनी शेतकऱ्यांना, महिलांना, सामान्य जनतेला आदर आणि सम्मान मिळवून दिला.
अफजलखान भेटीचा प्रसंग, पन्हाळाचा वेढा, शयिस्तेखानावरील छापा, आग्रातुन करून घेतलेली सुटका, हे सर्व प्रसंग-संकटे शिवरायांसाठी मोठ्या जोखीमची होती, पण तरीही या संकटांवर मात करून ते पुढे चालत राहिले. ते जनतेला वेळोवेळी मदत करत होते त्यामुळे आपले भाग्यविधाता म्हणून स्वराज्याची जनता त्यांना पाहू लागली होती.
आज आपण समाजात बघतोय स्वतःला मावळा समजणारे काही शिवभक्त माते सामान असणाऱ्या स्त्री-बहिणीला छेडतोय. जिथे आज स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण दिलं जातं तिथे माझा महाराजांचा काळात स्त्रियांना शंभर टक्के संरक्षण दिलं जातं होतं. 31 डिसेंबरला भारताची युवा पिढी दारूच्या बाटल्या घेऊन मोकाट फिरताना दिसतात. हे बघून कोणीतरी म्हटलेलं एक सुंदर वाक्य मला नेहमी आठवतं. "लाज आपण गरीब असल्याची नकोय तर लाज आपल्यातल्या वाईट गुणांची असावी". महाराज स्वराज्य वेडे होते आणि आजचे बहुतांश युवा तर व्यसनासाठी वेडे होताना दिसतात. थोडंसं काही झालं कि करतात आत्महत्या लावतात बाटली तोंडाला. महाराजांवरती अनेक संकटे आलीत पण ते कधीही व्यसनेच्या आहारी गेले नाहीत. प्रत्येक संकटाना सामोरे जाऊन त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापित केलं. आज गरज आहे ती काही गोष्टी लक्षात घेण्याची. महाराजांचं लॉकेट गळ्यात घालायचं असेल तर आपलं वर्तन चुकीचं असणार नाही, हे लक्षात घ्या. महाराजांची अंगठी बोटात घालायकची असेल तर तो बोट द्वेष करण्यासाठी दाखविले जाणार नाही याची काळजी घ्या. अंगात महाराजांचे शर्ट घालायचं असेल तर तो शर्ट घालून कुठल्याही चुकीच्या ठिकाणी जाणार नाही याची काळजी घ्या. महाराजांचे नाव जर घ्यायचं असेल तर तोंडात कुठलाही व्यसनी पदार्थ राहणार नाही याची काळजी घ्या. आज या भारताला-महाराष्ट्राला शिवबा सारख्या युवा ची गरज आहे ज्यात सिंहाची चाल आणि कासवाची ढाल असावी, गरुडाची नजर आणि मायबहिणीसाठी आदर असावा, प्रेमात समर्पण आणि शत्रूचे मर्दन असावे, आज शिवाबाच्या आजच्या युवाचे हे वर्णन असावे. पण सत्यात महाराष्ट्राची विस्कटलेली अशी विचित्र परिस्थिती बघून मला असं वाटायला लागलं आहे की चढावे त्या रायगडाचा पायऱ्या अंतःकरणातून, या काळजातून हाक घालावी माझा राजाला, साद घालावी म्हणावं विचारावं "राजे तुम्ही कशी सांभाळली तुमची प्रजा आणि जिजाऊंची आणं" आणि आम्ही येथे म्हणतो 'आम्ही दोन आमचे दोन, आमचा मिळून होतो चौकोन, चौकोनातले गेले दोन तर उरलेल्यांना आधार कोण?'. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे राजे.
"आजही आम्ही शेतकऱ्यांना फासावर अडकताना पाहतो आहे राजे आणि फासावर अडकलेला हा शेतकरी अजूनही तुम्हालाच शोधतो आहे"
सोळा वर्ष्याचा असणाऱ्या माझा शिवबानं तोरणगड जिंकून स्वराज्यात सामील केला आज सोळा वर्षाची आपली मुलं काय करतात?
सतरा-अठराचे झालेत की त्यांना मिश्या फुटतात, वीस-एकवीसचे झालेत की अभ्यासासोबत लफडी सुरु असते, बावीस-तेवीसचे झाले की मग लग्न आणि नंतर पोरं आणि तीस-एकतीसचे झाले की जन्मदेत्या आई-वडिलांना घराबाहेर हाकलून देतात.
हे जितकं कटू आहे तितकंच सत्य आहे माझा बांधवांनो.
आणि म्हणूनच शिवचरित्र सांगण्यापेक्षा त्यांच्या जीवनचरित्रावर भर द्यायला मला आवडेल.
आजही समाजात आपण पाहतो आहे मुले शिवजीमहाराजांसारखा पेहराव काय करतात, भलीमोठी दाढी काय वाढवतात, कानात बाऱ्या काय घालतात, महाराजांसारखा कपाळावर चंद्रकोरसारखा टिळा काय लावतात. मला एकच सांगायचं आहे माझा बांधवांनो आपण छत्रपती शिवाजी महाराजांसारखं दिसतो का यापेक्षा आपण शिवाजी महाराजांसारखं वागतो का याला जास्त महत्व आहे.
आणि हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला समाजात मान खाली घालावी नाही लागणार.
शिवबा होणं कठीण नाही त्यासाठी असावं लगातं मनगटात ताकद आणि रक्तारक्तात देशभक्ती. हे जर का खरं झालं तर आज घराघरात शिवबा जन्माला येईल आणि या महाराष्ट्रात पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म होऊन भव्यदिव्य शिवराज्याभिषेक सोहळा आणि शिवाजी महाराज जयंती मोठया आनंदाने साजरा करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचं लोकराज्य पुन्हा एकदा पुनर्जीवित होईल, या लोकराज्यात लोकांची एकच गर्जना राहील तेही मोठ्याने ...जय भवानी!! जय शिवाजी!!
बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय!!!!!!!......
"विजयाची तलवार चालून गेले, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेले, आपल्या वाघ नखाने अफजलखानचा कोथडा फाडून गेले, भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामाची कारण साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊंची..
आजही आपण म्हणतो स्वर्गात गेल्यावर देवांनी झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला."
"स्वतःचा मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही, आणि अशा सामर्थ्याला हरविण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही. " हे धाडस करून दाखवणारे आपले सर्वांचे लाडके असे थोर व्यक्तिमत्त्व असणारे छत्रपती शिवाजी महाराज.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण याचा अर्थ त्यांच्या नावाचा प्रत्येक अक्षरात दडलेला आहे.
'छ' म्हणजे छत्तीस वाघांचे बळ असणारे.
'त्र' म्हणजे त्रस्त मोघलांना करणारे
'प' म्हणजे परत कधी न फिरणारे
'ती' तिन्ही जगात जाणणारे
'शि' म्हणजे शिस्तप्रिय
'वा' म्हणजे वाणिज्यतेज
'जी' म्हणजे जिजाऊंचे पुत्र
'म' म्हणजे महाराष्ट्राची महान अशी शान
'हा' म्हणजे हार न मानणारे
'रा' म्हणजे राज्याचे हितचिंतक
'ज' म्हणजे जणता राजा
अशा या महान शिवाजी महाराजांचा अभिषेक शिराज्याभिषेक म्हणून ओळखला जातो. ही राज्यघटना आजही इतिहासाच्या पानावर अजरामर आहे, जितके आपले शिवाजी महाराज प्रत्येकाच्या मनात.
इतिहासाच्या पानावर रुजून बसलेला हा भव्यदिव्य सोहळा शिस्तबद्ध, रितीरिवाज, मानमर्यादा, आदर अशा अनेक गोष्टींची शिकवण देतांना एक प्रेरणास्थान बनलेला आहे.
आयुष्यभर भवानी मातेचा छत्रछायेखाली असतांनाच ते जनतेसाठी जगले, गुलामगिरीच्या जगण्याला त्यांनी नाकारले. वेदांचे , पुराणांचे, मंदिराचे महाराजांनी रक्षण केले. त्यांच्यावर लहानपणापासून मातोश्री जिजाऊंचे आणि पिताश्री शहाजीराजांचे सुसंस्कार होते. "माझा शिवबा परक्याची चाकरी करणार नाही, तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करेल " या जिजाऊ मातेच्या उच्च विचारामुळे महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षीच रायरेश्वराचा मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, नंतर सोळाव्या वर्षी तोरणगड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले.
शिवराज्याभिषेक हा फक्त शिवाजी महाराजांचा केला जाणारा अभिषेक असला तरी, यामागे शिवाजी महाराजांचा कितीतरी गोष्टी दडलेल्या आहेत. जसे त्यांनी स्वराज्य मिळवण्यासाठी केलेली मेहनत, जिंकावे म्हणून लहानपणापासून ढाल, तलवार, दांडपट्टाचे घेतलेले प्रशिक्षण. त्यांनी मोठ्या युक्तीने आणि शक्तीने अनेकांचा पराभव करून अनेक गड-किल्ले जिंकले एवढंच नाहीतर त्यांनी शेतकऱ्यांना, महिलांना, सामान्य जनतेला आदर आणि सम्मान मिळवून दिला.
अफजलखान भेटीचा प्रसंग, पन्हाळाचा वेढा, शयिस्तेखानावरील छापा, आग्रातुन करून घेतलेली सुटका, हे सर्व प्रसंग-संकटे शिवरायांसाठी मोठ्या जोखीमची होती, पण तरीही या संकटांवर मात करून ते पुढे चालत राहिले. ते जनतेला वेळोवेळी मदत करत होते त्यामुळे आपले भाग्यविधाता म्हणून स्वराज्याची जनता त्यांना पाहू लागली होती.
आज आपण समाजात बघतोय स्वतःला मावळा समजणारे काही शिवभक्त माते सामान असणाऱ्या स्त्री-बहिणीला छेडतोय. जिथे आज स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण दिलं जातं तिथे माझा महाराजांचा काळात स्त्रियांना शंभर टक्के संरक्षण दिलं जातं होतं. 31 डिसेंबरला भारताची युवा पिढी दारूच्या बाटल्या घेऊन मोकाट फिरताना दिसतात. हे बघून कोणीतरी म्हटलेलं एक सुंदर वाक्य मला नेहमी आठवतं. "लाज आपण गरीब असल्याची नकोय तर लाज आपल्यातल्या वाईट गुणांची असावी". महाराज स्वराज्य वेडे होते आणि आजचे बहुतांश युवा तर व्यसनासाठी वेडे होताना दिसतात. थोडंसं काही झालं कि करतात आत्महत्या लावतात बाटली तोंडाला. महाराजांवरती अनेक संकटे आलीत पण ते कधीही व्यसनेच्या आहारी गेले नाहीत. प्रत्येक संकटाना सामोरे जाऊन त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापित केलं. आज गरज आहे ती काही गोष्टी लक्षात घेण्याची. महाराजांचं लॉकेट गळ्यात घालायचं असेल तर आपलं वर्तन चुकीचं असणार नाही, हे लक्षात घ्या. महाराजांची अंगठी बोटात घालायकची असेल तर तो बोट द्वेष करण्यासाठी दाखविले जाणार नाही याची काळजी घ्या. अंगात महाराजांचे शर्ट घालायचं असेल तर तो शर्ट घालून कुठल्याही चुकीच्या ठिकाणी जाणार नाही याची काळजी घ्या. महाराजांचे नाव जर घ्यायचं असेल तर तोंडात कुठलाही व्यसनी पदार्थ राहणार नाही याची काळजी घ्या. आज या भारताला-महाराष्ट्राला शिवबा सारख्या युवा ची गरज आहे ज्यात सिंहाची चाल आणि कासवाची ढाल असावी, गरुडाची नजर आणि मायबहिणीसाठी आदर असावा, प्रेमात समर्पण आणि शत्रूचे मर्दन असावे, आज शिवाबाच्या आजच्या युवाचे हे वर्णन असावे. पण सत्यात महाराष्ट्राची विस्कटलेली अशी विचित्र परिस्थिती बघून मला असं वाटायला लागलं आहे की चढावे त्या रायगडाचा पायऱ्या अंतःकरणातून, या काळजातून हाक घालावी माझा राजाला, साद घालावी म्हणावं विचारावं "राजे तुम्ही कशी सांभाळली तुमची प्रजा आणि जिजाऊंची आणं" आणि आम्ही येथे म्हणतो 'आम्ही दोन आमचे दोन, आमचा मिळून होतो चौकोन, चौकोनातले गेले दोन तर उरलेल्यांना आधार कोण?'. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे राजे.
"आजही आम्ही शेतकऱ्यांना फासावर अडकताना पाहतो आहे राजे आणि फासावर अडकलेला हा शेतकरी अजूनही तुम्हालाच शोधतो आहे"
सोळा वर्ष्याचा असणाऱ्या माझा शिवबानं तोरणगड जिंकून स्वराज्यात सामील केला आज सोळा वर्षाची आपली मुलं काय करतात?
सतरा-अठराचे झालेत की त्यांना मिश्या फुटतात, वीस-एकवीसचे झालेत की अभ्यासासोबत लफडी सुरु असते, बावीस-तेवीसचे झाले की मग लग्न आणि नंतर पोरं आणि तीस-एकतीसचे झाले की जन्मदेत्या आई-वडिलांना घराबाहेर हाकलून देतात.
हे जितकं कटू आहे तितकंच सत्य आहे माझा बांधवांनो.
आणि म्हणूनच शिवचरित्र सांगण्यापेक्षा त्यांच्या जीवनचरित्रावर भर द्यायला मला आवडेल.
आजही समाजात आपण पाहतो आहे मुले शिवजीमहाराजांसारखा पेहराव काय करतात, भलीमोठी दाढी काय वाढवतात, कानात बाऱ्या काय घालतात, महाराजांसारखा कपाळावर चंद्रकोरसारखा टिळा काय लावतात. मला एकच सांगायचं आहे माझा बांधवांनो आपण छत्रपती शिवाजी महाराजांसारखं दिसतो का यापेक्षा आपण शिवाजी महाराजांसारखं वागतो का याला जास्त महत्व आहे.
आणि हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला समाजात मान खाली घालावी नाही लागणार.
शिवबा होणं कठीण नाही त्यासाठी असावं लगातं मनगटात ताकद आणि रक्तारक्तात देशभक्ती. हे जर का खरं झालं तर आज घराघरात शिवबा जन्माला येईल आणि या महाराष्ट्रात पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म होऊन भव्यदिव्य शिवराज्याभिषेक सोहळा आणि शिवाजी महाराज जयंती मोठया आनंदाने साजरा करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचं लोकराज्य पुन्हा एकदा पुनर्जीवित होईल, या लोकराज्यात लोकांची एकच गर्जना राहील तेही मोठ्याने ...जय भवानी!! जय शिवाजी!!
बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय!!!!!!!......
Well done Neha 👍👌
ReplyDeleteThanks😊
DeleteExactly Neha 👌 👍💐माझ्या महाराष्ट्राला /देशाला ठेच आहे लागत, कारण आमचे युवा शिवबां-सारखे नाही वागत....
ReplyDeleteHo na Apeksha🤗
DeleteWell done neha✌️
ReplyDeleteThanks ✨️
DeleteCorrect Neha 👌🏻👌🏻👍🏻 well done 💐👌🏻
ReplyDeleteKhupach chhan.. 👌
ReplyDeleteThanks Shubhu🤗🤗✨️
Deleteअंगावर शहारे येणारा लेख लिहिला आहेस
ReplyDelete*नेहा* ......... मस्त यार.....👌💐
Thanks Bharat ✨️🤗
DeleteWell written Neha��khup Chan..
ReplyDeleteThanks Shubhu🤗😊
Deleteमोजक्या शब्दांत खूप मोलाचा संदेश आणि आवाहन केलंस नेहा . अप्रतिम! 👍
ReplyDeleteThanks Himanshu🤗✨️
Deleteअप्रतिम नेहा..���� कदाचित दाढ्या मिषा वाढवून शिवाजी महाराजांचा रुबाब दाखवणारे यावर जास्त विचार करतील...��
ReplyDeleteReally thanks🤗😃
Delete