Skip to main content

Posts

Showing posts from March, 2023

चिंब ओले होताना

कडक उन्हाच्या दिवसात पावसाची एखादी सर धरणीवर पडली कि मन अगदी आनंदाने न्हाऊन निघतं. आज सांजवेळी या पावसासवे जात असताना मला थंडगार वाऱ्याचा स्पर्श आणि मातीचा सुंदर सुगंध अनुभवास मिळाला. रस्त्यावरील रंगेबिरंगी फुले, पुन्हा नव्याने तवटवीत होताना या माझा छोट्या डोळ्यांना दिसली. आणि ओल्या वाटेवरून चालताना, मनात ओलावा असणारी माणसं भेटली. मग काय रंगला खेळ तो या पावसाचा कौतुक करणारा. त्याच्या कौतुकाला तर पारावार नव्हताच. जणू मला तर वाटायला लागलं कि, नभातील पडणाऱ्या गार पावसाने आणि त्याच्या प्रत्येक थेंबाने मन, डोकं आणि शरीर चिंब चिंब भिजवलंय.

संस्काराचे बीज..

आज पुन्हा एकदा ती आई जवळ व्यक्त झाली. "आई कुणालाही त्रास न देता जेव्हा लोकांकडून वाईट वागणूक आणि वाईट बोल लावले जातात तेव्हा मनाला फार वाईट वाटतं गं" यावर तिची आई तिला कवेत घेऊन म्हणाली, "अरे बाळा, कुणी आपल्याशी कसंही वागले तरी सगळं विसरून त्यांच्याशी चांगलं वागणं हे आपलं कर्तव्य. शेवटी माणसानेच माणसाला जपायला हवं ना! वाटेत आलेल्या सगळ्यांना आपलंस करन शिक. तेव्हाच तू सगळ्यांचं मन अगदी सहजतेने जिंकशील."

काही नवे ते शिकावे

आज सुंदर एक मातीचा किल्ला तिने बनविला. मैत्रिणीला जेव्हा तिने तो किल्ला दाखविला तर तिच्या मैत्रिणीने तिला चिडवत, तो किल्ला मोडला. हे बघून ती रागे भरली आणि रडत आईजवळ गेली. आईला म्हणाली, "आई माझा किल्ला मोडला गं तिने आणि मला तिचा खूप राग येत आहे." त्यावर आई म्हणाली, "बरं बाळा, त्यात काय एवढं रागे भरायचं?". मग ती म्हणाली,"आई एखादी मनापासून बनवलेली गोष्ट जेव्हा आपल्या देखत मोडेल तर, राग तर येणार कि. आई तुला कसचं का कळतं नाही?". आई म्हणाली, "मग सांग बघू, पावसाच्या टीप-टिपत्या पाण्याने हा जर का तुझा आवडता किल्ला मोडला असता, तर तू काय केले असतें. पावसावर पण रागावली असती का?". ती हसत म्हणाली, "टीप टीप बरसणारा पाऊस माझा खूप आवडीचा आहे आई. आणि का उगाच त्यावरती रागावले असतें!". आई म्हणाली,"अगदी बरोबर. एखादी मनापासून केलेली गोष्ट जेव्हा हातून निघून जाते तेव्हा रागे भरून किंवा रडत बसून चालत नसतं, तर त्यातून नवं काही शिकायचं असतं". आईचे हे ऐकून माझं मन समाधानाने हसतमुख झालंय.