Skip to main content

Posts

Showing posts from June, 2020

आयुष्याचं पुस्तक...!

पहिलं आणि शेवटचं पान  विधात्याच्या हातून लिहिलं जातं, मधले पानं आपल्यालाच लिहावं लागतं.... रंगीबिरंगी शाईने त्याला सुंदर रंगवायचं असतं, नकळत का होईना पण ते आनंदाने सजवायचं असतं... जोरात आलेल्या वाऱ्यामुळे पलटलेलं पान पुन्हा उघडायचं असतं, काहीतरी लिहायचं असतं पण रिकामं कधीच सोडायचं नसतं... रंगाची शाई संपल्यावर पेन्सिलनेही कधी रेखाटायचं असतं, चूक झाल्यास मोठ्या मनाने ते खोडायचं असतं... अर्धवट रिकामं असलेलं पान मन नसल्यास तसंच राहू द्यावं लागतं, कारण ते फक्त रिकामं नाहीतर शांततेचं प्रतिक असतं... ठेच लागली की शाई सांडते, वेदना वाढल्या की पाणी सांडून ती शाईच पसरते... काना-मात्रा सोबत सुवाच्छा अक्षरात एखादं पान लिहिल्या जातं, तसंच जीवनातलं आनंद असंच बहरत जातं... सुरुवातीला लिहितांना वाटतं अजून खूप बाकी राहिलं, अर्ध भरल्यानंतर वाटतं आता फक्त अर्धच राहिलं... लिहिता-लिहिता हातासारखे आपले आधारस्तंभ थकून गेलेले असतात, पण शेवटी खूप काही लिहायचं राहील म्हणून पुन्हा धीर धरतात... डोक्याची झीज, हाताच्या वेदना मनालाही कळतात, अखेर मन जीवंत असतांना हात मात्र गळून जातात...

बाबा...

आज बाबांवर खूप चिडली होती थोडी रागावली पण होती. मात्र राग शांत झाल्यानंतर वाटलं "जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेले बघू शकत नाही. परंतु एक वडीलच असतात जे आपल्या मुलाला अपल्यापेक्षा पुढे गेलेले पाहून आनंदी होतात". आईप्रमाणे वडिलांचे महत्वही जीवनात खूप महत्वाचे असते. आई-बाबा या दोन शब्दामध्ये जणू काही आपले विश्व सामावलेले आहे. जन्म देणाऱ्या आईने आपल्याला हे सुंदर जग दाखविले आणि बाबांनी आपल्याला मोठे करण्यासाठी दिवस रात्र कष्ट केले. असे म्हणतात की आईही दिव्याची ज्योत असते आणि त्याचा प्रकाश परिवाराला मिळवा म्हणून ज्योतीचे चटके सहन करणारे असतात आपले बाबा. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आई-बाबा झटतात. बाबांचे प्रेम हे निस्वार्थी असते, आपण कितीही मोठे झाले तरी त्यांच्यासाठी आपण लहानंच असतो. आपण यशस्वी व्हावे हेच त्यांचे स्वप्न असते. तेच आपल्यावर संस्कार घडवितात व जीवनात योग्य मार्गदर्शन देत असतात. लहान असल्यापासून आईच मुलांना सांगत असते. कुठे जाऊ नको, काही करू नको बाबा मारेल. शाळेत जा नाहीतर बाबा मारेल, हे करू नको, ते करू नको, बाबा मारेल. बाबांनी मारू नये म्हणून अभ्यास क...

वटवृक्ष लावूया....

५ जून जागतिक पर्यावरण दिन. नेमकी आज याच दिवशी वटपौर्णिमा आली आहे. हा चांगला योगायोग. वटपौर्णिमेला सौभाग्यवती महिला वडाच्या झाडाचे पूजन करीत त्याला प्रदक्षिणा करतात. आपल्या संस्कृतीत ही फार सुंदर परंपरा आहे. या परंपरेतील कथा काहीही असो पण आपले सर्व सण - समारंभ  निसर्गाशी जवळीक साधण्याची शिकवण देणारे आहेत. आज त्याकडे डोळस पणे बघणे गरजेचे आहे. परंपरेप्रमाणे सुहासिनी सुंदर तयार होऊन वडाच्या झाडाजवळ एकत्र येतात. त्या झाडाच्या खोडाला दोरा गुंडाळतात. प्रदक्षिणा मारतात. वटवृक्षाची मनोभावे पूजा करतात. त्यामागचा त्यांचा उद्देश एकाच की कुंकवाचा हाच धनी सात जन्मी लाभू दे. आज आहे त्या जोडीरासोबत एक जन्म काढायला जिथे ताण येतो तिथे सात जन्माचे काय घेऊन बसलात. पण आपलं सर्व परंपरेप्रमाणे चालले आहे. या परंपरेचा विचार केला तर लक्षात येईल की याचा संबंध थेट पर्यावरणाशी आहे. निसर्ग रक्षणासाठी या परंपरा आपल्या पूर्वजांनी जाणीवपूर्वक निर्माण केल्या आहेत. वड, पिंपळ, कडुलिंब ही झाडे मोठ्या प्रमाणात प्राणवायू वतावरणात सोडतात. ही झाडे जगली तर सृष्टी जगेल. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने माणसाचे वयोमान व...

कबीराशी संवाद साधतांना...

दरवर्षी जेष्ठ पौर्णिमेला म्हणजे आमच्याकडील वटपौर्णिमेला तुझी जयंती असते. पंधराव्या शतकात तू जन्माला आलास, बालपणापासून तू हिंदु धर्माची आणि मुस्लिम धर्माची चिकित्सा करू लागला. हिंदू धर्माचे लोकं तुला नास्तिक म्हणू लागले आणि मुस्लिम धर्माचे लोकं तुला काफिर समजू लागलेत. तुझ्याबाबत अनेक चमत्कारिक गोष्टी सांगितल्या जाऊ लागल्या, पण तू  लोकांना साधं-सोपं जीवन जगण्याचं तत्वज्ञान सांगू पाहत होतास... लोकांनी एक ईश्वरवाद मानावा यासाठी झगडत होता. तुझा राम हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसलेला राम होता, जो पुढे महात्मा गांधींनी सुद्धा स्वतःचा हृदयात साठवून ठेवला. पण हा तुझा एकेश्वरवाद समाजाला कळला नाही, लोक शेवटपर्यंत तू हिंदू की मुस्लिम यावरच चर्चा करत राहिले. तू संतांची, धर्मपीठांची, पुरोहितशाहीची एवढी चिकित्सा केली की संपूर्ण पुरोहितशाहीच तुझ्या विरुद्ध उभी राहिली. तू रामाला गुरू मानलं पण दुसऱ्याला स्वतःच शिष्यत्व प्रदान करून फसविले नाही. कबीरा तुझ्या विचारांचा प्रभाव हा संपूर्ण देशभर पसरला. पंधराव्या शतकात वैदिक धर्माच्या सर्व परंपरा नाकारणे म्हणजे गंमत नव्हती. वैदिकधर्म तत्वज्ञान, अल्ल...

टक्केवारीचं गणित...

मला लहानपणापासून टक्केवारीचं कोडं कधी समजलंच नाही. जे लोक कायम टक्केवारीत बोलतात, त्यांच्या बुद्धिमत्तेला खरंच दाद द्यावी लागणार. एकदा एकाला एक बातमी सांगताना तो व्यक्ती म्हणाला 'तुमची बातमी ७० टक्के खरी तर ३० टक्के खोटी आहे'. मी विचारलं कसं? त्या बातमीत तुम्ही जन्मवर्ष चुकीचे सांगितले. फक्त जन्मवर्ष चुकीचे सांगितले म्हणून ३० टक्के चूक बातमीत कशी काय होऊ शकते?. हे मला कळलंच नाही आणि हे अतिहुशार लोकं टक्केवारी कोणत्या आधारावर काढतात देवच जाणे. समजा एका डॉक्टर कडे एक रुग्ण गेला, आणि डॉक्टरांनी औषधी देऊन आठ दिवसांनी पुन्हा बोलावलं. तो रुग्ण पुन्हा तपासणीला येतो तेव्हा डॉक्टर विचारतात किती टक्के आराम झाला? रुग्ण गोंधळून सांगतो '६५ टक्के आराम आहे' मग डॉक्टर विचारतात, 'खोकला कसा आहे?' 'ठिक आहे' मग डॉक्टर पुन्हा थांबतात..आणि मग विचारतात आता. 'तो विचार करून सांगतो आता ७० टक्के'. आता हा प्रश्न आहे की टक्केवारी या रुग्णांने कशाच्या भरोशावर सांगितली आणि डॉक्टर सुद्धा टक्केवारीवर भरोसा कसा ठेवतात? 'तू आता इतके टक्के बरा झाला आहेस आणि शंभर टक्के बर...

पुन्हा एकदा माझा शिवबा हवा आहे....

सोळाव्या शतकात आजच्या दिवशी शिवनेरी किल्यावर एक तेजस्वी तारा चमकला आणि माझा राजा जन्माला आला. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व आणि शिवराज्याभिषेक जगातल्या, महाराष्ट्राच्या पैलूंशी कसं निगडित आहे, आणि त्याच प्रेरणेने बिघडणाऱ्या महाराष्ट्राच्या परिस्थितीला कसं सुधारू शकतो? हे तितकेच तातडीने, जोमाने सांगायला मला आवडेल. "विजयाची तलवार चालून गेले, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेले, आपल्या वाघ नखाने अफजलखानचा कोथडा फाडून गेले, भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामाची कारण साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊंची.. आजही आपण म्हणतो स्वर्गात गेल्यावर देवांनी झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला." "स्वतःचा मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही, आणि अशा सामर्थ्याला हरविण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही. "  हे धाडस करून दाखवणारे आपले सर्वांचे लाडके असे थोर व्यक्तिमत्त्व असणारे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण याचा अर्थ त्यांच्या नावाचा प्रत्येक अ...