पहिलं आणि शेवटचं पान विधात्याच्या हातून लिहिलं जातं, मधले पानं आपल्यालाच लिहावं लागतं.... रंगीबिरंगी शाईने त्याला सुंदर रंगवायचं असतं, नकळत का होईना पण ते आनंदाने सजवायचं असतं... जोरात आलेल्या वाऱ्यामुळे पलटलेलं पान पुन्हा उघडायचं असतं, काहीतरी लिहायचं असतं पण रिकामं कधीच सोडायचं नसतं... रंगाची शाई संपल्यावर पेन्सिलनेही कधी रेखाटायचं असतं, चूक झाल्यास मोठ्या मनाने ते खोडायचं असतं... अर्धवट रिकामं असलेलं पान मन नसल्यास तसंच राहू द्यावं लागतं, कारण ते फक्त रिकामं नाहीतर शांततेचं प्रतिक असतं... ठेच लागली की शाई सांडते, वेदना वाढल्या की पाणी सांडून ती शाईच पसरते... काना-मात्रा सोबत सुवाच्छा अक्षरात एखादं पान लिहिल्या जातं, तसंच जीवनातलं आनंद असंच बहरत जातं... सुरुवातीला लिहितांना वाटतं अजून खूप बाकी राहिलं, अर्ध भरल्यानंतर वाटतं आता फक्त अर्धच राहिलं... लिहिता-लिहिता हातासारखे आपले आधारस्तंभ थकून गेलेले असतात, पण शेवटी खूप काही लिहायचं राहील म्हणून पुन्हा धीर धरतात... डोक्याची झीज, हाताच्या वेदना मनालाही कळतात, अखेर मन जीवंत असतांना हात मात्र गळून जातात...
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!