Skip to main content

Posts

एक मैत्री अशीही..

आयुष्यात वेगवेगळे लोकं आपल्याला मिळत असतात. काहींशी फार काळ असून पण मैत्री होत नाही आणि काहींशी क्षणात मैत्री होते. अशीच आम्हा सर्वांसोबत क्षणात मैत्री करून घेणारे ते विनीत. खरंतर कोणीतरी त्यांना दाद द्यावी असं त्यांचं व्यक्तित्व. सध्या कामासाठी पण, आमचं कौतुक करणारे... राग आला तरी चेहऱ्यावरून नं वाटणारे... विनीत स्पेक्ट म्हणताच चस्मा घालणारे... विविध गोष्टीं मध्ये रुची दाखवणारे... न सांगता आमच्याकरिता खाऊ मागवणारे... टीममध्ये मधेच येऊन जोक करणारे... नेहमी हसत खेळत राहणारे... प्रोडक्ट मॅनेजर कमी आणि आमचे मित्र जास्त वाटणारे... असेच हे विनीत आम्हा सगळ्यांना आवडणारे.. आज जाताना सगळे नाराज झाले, पण शेवटी सगळे चेहऱ्यावर हसू दाखवून घरी निघाले.. खरंचं, आयुष्यात चांगल्या मित्रांची खूप आठवण येते... सगळं विसरून आयुष्य पुन्हा समोर जाते...

मैत्री गाडीशी

एक होती गाडी, तीच नाव कार.. होती काळी काळी पण दिसायला फार छान... एकटी पार्किंग मध्ये बसली वाट पाहत.. काय जोरात धावलो राव, जणू चाललो आम्ही वाहत... गाडी पाशी पोहोचताच दरवाजे उघडले.. क्षणभर ही वाट न पाहता सगळे आत बसले... रोडावर येताच ती जोरात धावायला लागली... कोसळत्या पावसामुळे ती आणखी नवीन झाली.. अदवेत ला सोडून ती हळू पुढे निघाली.. छत्रपती येताच ती बाय बाय पण म्हणाली.. मला मज्जा आली कारण आता नवी मैत्री झाली.. किती ऐकणार अजून.. आता संपली कहाणी....

शोधला तर देव पण भेटतो

"शोधला तर देव पण भेटतो" हे वाक्य आपल्या रोजच्या जीवनात कित्येकदा ऐकतो. शब्दशः अर्थ पकडला तर खरंच देव भेटतो! हे डोक्यात येताच ती अजूनही खुलून हसते. गोष्ट अशी, कि तिच्याकडे एक समस्या होती. तिने समस्येचं समाधान शोधायला सुरुवात केली. समस्येच निवारण करण्याकरिता तिला वेगवेगळे मार्ग मिळाले, पण तरी समस्या काही उलगडे ना. तिच्याकडे आशा होती पण ती थकली. तिला वाटलं, "शोधून शोधून किती शोधणार?" आता थांबायला हवंय. आणि तेव्हा मागून कोणीतरी आले आणि तिला म्हणाले , "ढुंडनेसे तो भगवान भी मिल जाते है|". हे एकताच, तिच्यातले पंचतत्व वेगाने काम करू लागले. तिने असा मार्ग शोधला कि समस्येचं पूर्णपणे निवाकरण झालंय. आता ती खुलून म्हणते, "तो क्या हुआ, ढुंडनेसे तो भगवान भी मिल जाते है|".

तिची जबाबदारी

आई हे देवाने आपल्याला दिलेलं सुंदर वरदान आहे कि काय! असं मला नेहमी वाटतं असतं. ती आपल्या संसाराला तर सांभाळते पण इतरांची काळजी ही तितकीच घेते. खरं सांगायचं म्हणजे मुक्या जनावरांवर असलेलं तीचं प्रेम इतकं निर्मळ आहे, कि कधी मलाही हेवा वाटतो. त्यांची काळजी घेणे जणू काही तिची जबाबदारी. या तापलेल्या उन्हाच्या दिवसात जिथे माणूस पाण्यासाठी व्याकुळ होतो, तिथे भर उन्हात अन्न पाण्याच्या शोधात मुके जनावर तर होणारच. किती तहानलेले असतील ते, हा विचार करून ती रोज आठवणीने कुत्रे, मांजर, पक्षी आणि गाई यांच्याकरिता पाणी ठेवते. चुकून कधी पाणी ठेवायचं विसरली तर "तुम्हाला नाही आलं का ठेवता?" असं ती रागावते, पण त्यात तीच आतून दडलेलं खरं प्रेम- काळजी सहज उभारून दिसते. दिवासेंदिवस आपण मोठं होतो, आपल्या कामात व्यस्त होतो. त्यामुळे कदाचित छोट्या छोट्या गोष्टी किती महत्वाचे असतात याच भान विसरतो. या वेगवान वाढणाऱ्या शहरांत जागोजागी सिमेंटचे रस्ते बांधताना दिसतात त्यामुळे नंदी,नाले, तलाव, पाण्याचे डबकं फार कमी आढळतात. पाण्याचं स्रोत त्यांच्यासाठी कमी झालंय. हा विचार करून, थोडी आईची ही जबाबदारी आता मी ...