आज ती पुन्हा एकदा आपल्या आई समोर व्यक्त झाली, आणि आईला म्हणाली, " आई आज माझे सर माझ्यावरती रागावले. आज त्यांनी केलेल्या कॉमेंट मुळे असं वाटलं कि, ते माझा आदर आणि सन्मान कमी लेखत आहेत. म्हणूनच मी पण सरांवरती रागावले आणि त्यांना बोलले पण. ज्या सरांबद्दल आधी माझ्या मनात फार आदर होता तो आता नाही आहे. मला बिलकुल नाही आवडतं ते सर. ". यावर तिची आई हसली आणि तिला म्हणाली, "खरंतर सरांनी अशी विचित्र कॉमेंट केली असणार म्हणून तू रागावली ना. पण ती कॉमेंट तुझा सुधारणेसाठी होती हे विसरता कामा नये कारण समोरच्यांची परिस्थिती आणि दृष्टिकोन हे आपल्याला माहित नसतं. मी मान्य करते, जेव्हा मान आणि सन्मानाचा प्रश्न येतो, तेव्हा बोलणं चांगलं असतं. हे तू छान केलंस. पण शेवटी मी तुझी आई आहे आणि मला एक ठाऊक आहे, तेही तू फार रागावून बोलली असणार, ही चूक मात्र तू केली. ". ती म्हणाली, "तर मी करू तरी काय, तूच सांग ना?". आई म्हणाली, "अगं बाळा, जे तू रागावून बोललीस, ते तुला सहज प्रेमानेही सांगता आलं असतं. जेव्हा आपल्या सन्मानतेचा, आदराचा प्रश्न येतो त्यावेळेला टोचून बोलण्यापेक्षा,...
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!