Skip to main content

Posts

Showing posts from November, 2021

शिक्षण

मानवी जीवनात शिक्षणाचे महत्व अगाध आहे. संविधानाची वाटचाल बहात्तराव्या वर्षात आणि स्वातंत्र्याची वाटचाल पंचहत्तराव्या वर्षात होत असताना नव्या शैक्षणिक धोरणाने वेगाने होणारे जागतिक बदल टिपू नये, तथा भारतीय मूल्यव्यवस्था अधिक बळकट करण्याचा विचार करू नये ही खरे तर अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. बालकामगार, रस्त्यावरील बालके, आदिवासी समाजातील काही मुले, वीटभट्टी, दगडखाणीत काम करणाऱ्यांची मुले, आणि बांधकाम मजुरांची मुले शिक्षणापासून अजूनही वंचित असलेले दिसतात. गरीब-कष्टकऱ्यांनी दर्जात्मक शिक्षणाचा विचार करू नये असच काहीतरी झाले. एकीकडे मोफत शिक्षणाचा कायदा करायचा आणि दुसरीकडे मात्र त्याची अमलबजावणी होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी हि तर हद्द झाली. शिक्षणाच्या नावाखाली एप्रिल फूल बनवतात की काय? देशाला एकसंघ, बलशाही, धर्मनिरपेक्ष आणि मूल्यात्मकदृष्टया आधुनिक करायचे असेल तर शिक्षणाकडे गांभीर्याने पहिले जाण्याची गरज आहे. कारण असीम करुणा पोटात वागवून मानवतेचे कल्याण साधणारी सुगंधाची वसाहत म्हणजे शिक्षण! नवनिर्मितीची हजारो क्षितिज उघडून देणारा प्रज्ञानाचा उजेड म्हणजे शिक्षण! सभ्यतेची वनर...

एक संधी

संधी असतात रे भरपूर फक्त घाबरू नको, आयुष्य अतिशय विस्तारित आहे फक्त खचू नको.. प्रेम करणारे तुझ्यासाठी भरपूर असतील आणि हात जोडणारे पण मिळतील, निदान त्या लोकांसाठी तरी हसून बघ.. निजलेल्या पापण्यांना उघड जरा पहा या जगाकडे, प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच रे कोडे.. नाही नाही म्हणत उगाच रेंगाळत राहू नको, आयुष्य फार सुंदर आहे फक्त खचू नको.. कारण बळ आहे या हातात आणि स्वप्न आहे डोळ्यात, म्हणून खचू नको,खरं सांगते..

म्हातारपण

एक म्हातारे आजोबा मिळाले. आमच्यात खूप गप्पा रमल्या. पण त्यांनी सांगितलेल्या अवस्थेने माझं मन दुःखावलं. म्हातारपण कसं असतं हे त्यांनी स्पष्ट केलं. तेच मी कविता रुपात केलेलं आहे. बघता बघता डोक्यावरचे केस उडून गेले, बोलता-बोलता शब्दही तुटत गेले, एकता एकता कान बहिरे झाले..! चस्मा खराब कि डोळे खराब काही कळत नाही, काही दिसते स्पष्ट काही मात्र दिसत नाही..! थंडीत कंप करतात बोटे माझे दहाही, कापत राहतो पाय मात्र अंतर कापत नाही..!!

डायरी-पेन

चैतन्याच्या या नभी माझे अक्षर, मनाच्या पतंगाने स्वछंद उडावे..., सामावून सारे जग आमचे हे नाते कधी न तुटावे...!! भावनांचा झरझरता पाऊस अक्षरा अक्षरातून जातो ओल निर्माण करत..., याचं प्रवासातून नवी कविता प्रवसत...!! अबोल शब्दांना तुम्हीच बोलका करता..., आणि अतूट विश्वासालाही तुम्हीच दर्शविता...!! मोठे स्मितहास्य चेहऱ्यावरती खुलते..., जेव्हा डायरी-पेन माझा सोबत असते...!!

पानांशी जुळलेले नाते

वहीचं पाहिलं पान उघडलं की काय लिहावं ते सुचत नाही, कारण शब्द भरपूर असतात, शब्दांचा मेळ मात्र जुळत नाही.. मग आकाशाला आठवावे,जमिनीला आठवावे, पाण्याला आठवावे, पण प्रश्न मात्र एकच शेवटी कसं आणि काय रेखाटावे.. प्रश्न असाच मनात भिनतो, बघता-बघता वाट पुढची दाखवितो.. कडक उन्हात आकाश आकाशी रंग उधळविते, मग माझी पेनाची निळी शाईही, कागदाच्या कोऱ्या पानावर रंग खेळते.. ना शाईला ना पानाला माहित नव्हतं एवढं मात्र मान्य आहे, पण मनालाही माहित नव्हतं हे मात्र अशक्य आहे? मेंदूने हळूच इशारा केला मनाला, वही आली आता संपायला, थांबवा जरा शब्दांना, लागा आपल्या कामाला....!!!