मानवी जीवनात शिक्षणाचे महत्व अगाध आहे. संविधानाची वाटचाल बहात्तराव्या वर्षात आणि स्वातंत्र्याची वाटचाल पंचहत्तराव्या वर्षात होत असताना नव्या शैक्षणिक धोरणाने वेगाने होणारे जागतिक बदल टिपू नये, तथा भारतीय मूल्यव्यवस्था अधिक बळकट करण्याचा विचार करू नये ही खरे तर अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. बालकामगार, रस्त्यावरील बालके, आदिवासी समाजातील काही मुले, वीटभट्टी, दगडखाणीत काम करणाऱ्यांची मुले, आणि बांधकाम मजुरांची मुले शिक्षणापासून अजूनही वंचित असलेले दिसतात. गरीब-कष्टकऱ्यांनी दर्जात्मक शिक्षणाचा विचार करू नये असच काहीतरी झाले. एकीकडे मोफत शिक्षणाचा कायदा करायचा आणि दुसरीकडे मात्र त्याची अमलबजावणी होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी हि तर हद्द झाली. शिक्षणाच्या नावाखाली एप्रिल फूल बनवतात की काय? देशाला एकसंघ, बलशाही, धर्मनिरपेक्ष आणि मूल्यात्मकदृष्टया आधुनिक करायचे असेल तर शिक्षणाकडे गांभीर्याने पहिले जाण्याची गरज आहे. कारण असीम करुणा पोटात वागवून मानवतेचे कल्याण साधणारी सुगंधाची वसाहत म्हणजे शिक्षण! नवनिर्मितीची हजारो क्षितिज उघडून देणारा प्रज्ञानाचा उजेड म्हणजे शिक्षण! सभ्यतेची वनर...
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!