नेहमी तर आनंदी असतें पण कधी कधी कामात इतकी व्यस्त होते कि खाण्याकडे सुद्धा लक्ष नसतं. मग शांततेत काम करनं सुरुच असतें. या कामात कधी हसणं पण विसरून जाते. अशा वेळेला महान लोकांच्या छान छान गोष्टी लक्षात असतात, पण सत्यात क्वचित उपयोग होत असतील. मग काय अशाही वेळेला दिवसाला सोनेरी करणारी मैत्री जर जवळ असली कि प्रत्येक क्षण चांदी चांदी झाल्यासारखा वाटतो. अशी एक मैत्री माझ्याजवळ ही आहे. सुरवातीला जेव्हा ती मिळाली. वाटलं कशी असेल यार ही, आपल्या सोबत होईल ना मैत्री. मग हळू हळू जेव्हा तिच्या सोबत राहायला लागले तेव्हा कळालं माझा अपेक्षेपेक्षा जास्त छान आहे. नाश्ता आला कि आधी खाऊन संपवायचा असं ती बजावून सांगते. उपास असला कि दोन फळांची बॉक्स, माझा टेबलवरती ठेवलेले मी पाहिते. आणखी एक कोणाचा विचारलं तर पोट भरल्याचा बहाणा करते. मी चिंतेत असली कि, मजेदार गोष्टी सांगून, मन आनंदी करते. शांत असली कि जोक सांगून मस्तीत बदलवते. आणि ही सगळी काळजी घेणारी माझी ती मैत्रीण मोहिनी. जणू काही कामासोबत तीच दुसरं ध्येय माझी काळजी घेणं कि काय! अशी मैत्री सगळ्याकडे असो ज्यात पारदर्शी आपुलकी राहील आणि योग्य वेळेला काळ...
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!