रोजप्रमाणे त्या दिवशी पण ती ऑफिस मधून घरी जायला निघाली. मोठे रस्ते नि अजूबाजुला सिमेंट रेतीचे मोठया इमारती बघून तिला आनंद झाला.
तिला कळलं की आपला भारत वेगाने प्रगतशील होत आहे. हा विचार करत ती पुढचं पाऊल टाकत गेली. समोर तिला एक गाय दिसली, तहानलेली होती त्यामुळे रस्त्यावर साचलेलं पाणी पीत होती. तिला पाणी कमी पडू नये म्हणून तिने आपल्या बॉटल मधील पाणी दिलंय. ती पुढे निघाली. पण तिला पाण्याचं असलं कुठलाही स्रोत नाही दिसला ज्यात या परिसरात राहणाऱ्या जनावरांना-पक्ष्यांना पाणी देता येईल. तिचे विचार सुरू, भारत प्रगतशील च्या मार्गावर वेगाने भरारी घेत आहे. पण मग या वातावरणाची, पक्षांची-जनावरांची काळजी घेणं का विसरतोय? त्या दिवसापासून तिने या प्राणी-पक्षांसाठी पाणी ठेवायला सुरुवात केली. आज आपणही करूया नि एक पाऊल पुढे टाकूया.
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!
👌✨
ReplyDelete