आई तुझे महत्व कितीही सांगितले तरी शब्दात कमी पडेल गं. चित्रकाराने तुझ्या गुणांचे वर्णन करावे म्हणजे रंग कमी पडण्यासारखे आहे. म्हणूनच तर म्हणतात, "आई सारखे दैवत साऱ्या जगात नाही". जेव्हा मी पावसात भिजून घरी आली तेव्हा भाऊ म्हणाला, "कशाला पावसात भिजली? सर्दी खोकला होईल की". बाबा म्हणाले, "पावसात यायची काय गरज? कुठे थांबली का नाही?" मात्र आई टॉवेलने भिजलेले केंस पुसत म्हणाली, "मूर्ख पावसा तू येईपर्यंत थांबला पण नाही". आई तुझं किती गं वेडं प्रेम, पावसाला सुद्धा थांबवायला निघालीस. खरंतर शिवाजी ची जिजाई आहेस तू, जिजाई ची शिवाई आहेस तू, माझासाठी तर लेखणीची शाई आहेस तू!! ती कधी तडपती ऊन असली, तर सावली बनते, कधी सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस असला तर छत्री बनते, कधी कडाक्याची थंडी पडली तर, अंगावर ओढवणारी गरम शाल बनते! मेहनतीचा प्रवास तूच, काळोख्यात मिळणारा उजेडंही तूच. कोरडवाहू जमिनीवर पिकं उगवणं जीला जमतं ती म्हणजे आई. माझा वेदना बघताना तुला असह्य होते पण कुठे कमी पडू नये म्हणून रनरागिणीचा रूप धारण करून रागावते. हे नाजूक पाऊलं कष्टाच्या-मेहनतीचा...