Skip to main content

Posts

Showing posts from October, 2021

सोपं आहे

घाबरू कशाला? जगणं तर सोपं आहे... बंद स्वतःला कोंडु कशाला? सुटणं तर सोपं आहे... उगाच रडू कशाला? हसणं तर सोपं आहे... डोळे मिटून अंधार बघू कशाला? आयुष्याचा उजेड बघणं तर सोपं आहे...!

मैत्री ही निसर्गाशी

दोन खोल्यांच्या एखादया छोटया घरकलात डोकावले तर आपल्याला काय आढळते? त्या छोट्याशा घरकुलातील सामानाच्या दाटीवाटीत एखाद-दुसरी कुंडी असतेच. दरवर्षी मे महिन्याच्या सुट्टीत लोक मोठ्या संख्येने काश्मीरला, सिमल्याला जात असतात. या साऱ्या गोष्टी काय सांगतात? 'वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे' हे तुकारामांचे अनुभवाचे बोल सर्वांच्याच रक्तात भिनलेले आहेत. नाहीतरी माणूस तरी काय? निसर्गाचेच लेकरू ना! त्याला आपल्या इतर भावंडांविषयी ओढ असणारच. आजच्या या विज्ञानयुगात तो यंत्राच्या जंजाळात जितका जितका अडकतो तितके त्याचे मन अधिकाधिक निसर्गाकडे खेचले जाते. म्हणून तर यंत्राच्या जगात जगणारा माणूस वेळात वेळ काढून दोन दिवस तरी आपल्या खेड्यातील घराकडे धाव घेतो. निसर्ग आणि मानव यांच्यातील ही मैत्री फार जुनी आहे. अगदी अनादिकालापासूनच निसर्ग हा माणसाचा सोबती आहे. आकाशातील बदलणारे रंग पाहून कवींच्या वाणीला भरती आली. या निसर्गाचे मानवावर केवढे उपकार आहेत! तो त्याची भूक भागवितो. तहान शमवितो. मंद, मधुर झुळकींनी श्रमपरिहार करतो. सुगंधित फुलांनी त्याचे जीवन सुगंधित करतो. थकल्याभागलेल्याला सावली देतो. उन्हाचा त्...

आई कुठे काय करते?

आई तुझे महत्व कितीही सांगितले तरी शब्दात कमी पडेल गं. चित्रकाराने तुझ्या गुणांचे वर्णन करावे म्हणजे रंग कमी पडण्यासारखे आहे. म्हणूनच तर म्हणतात, "आई सारखे दैवत साऱ्या जगात नाही". जेव्हा मी पावसात भिजून घरी आली तेव्हा भाऊ म्हणाला, "कशाला पावसात भिजली? सर्दी खोकला होईल की". बाबा म्हणाले, "पावसात यायची काय गरज? कुठे थांबली का नाही?" मात्र आई टॉवेलने भिजलेले केंस पुसत म्हणाली, "मूर्ख पावसा तू येईपर्यंत थांबला पण नाही". आई तुझं किती गं वेडं प्रेम, पावसाला सुद्धा थांबवायला निघालीस. खरंतर शिवाजी ची जिजाई आहेस तू, जिजाई ची शिवाई आहेस तू, माझासाठी तर लेखणीची शाई आहेस तू!! ती कधी तडपती ऊन असली, तर सावली बनते, कधी सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस असला तर छत्री बनते, कधी कडाक्याची थंडी पडली तर, अंगावर ओढवणारी गरम शाल बनते! मेहनतीचा प्रवास तूच, काळोख्यात मिळणारा उजेडंही तूच. कोरडवाहू जमिनीवर पिकं उगवणं जीला जमतं ती म्हणजे आई. माझा वेदना बघताना तुला असह्य होते पण कुठे कमी पडू नये म्हणून रनरागिणीचा रूप धारण करून रागावते. हे नाजूक पाऊलं कष्टाच्या-मेहनतीचा...