उत्सव तीन रंगाचा,
आभाळी आज सजला..
नतमस्तक त्या सर्वांसाठी,
ज्यांनी भारत देश घडवला..!!
आज आपण सर्वे स्वातंत्र्य दिनानिमित्त जल्लोष, उत्सव साजरा करतो. पण खरंतर स्वातंत्र्य म्हणजे काय? त्याची व्याख्या आपण नीट करतो पण कर्तव्यात कुठेतरी चुकतो. मला बोलायचं स्वातंत्र्य आहे, मला राहण्याचं स्वातंत्र्य आहे आणि आणखी अनेक गोष्टींचं स्वातंत्र्य आहेच. म्हणून कसंही वागायचं, कसंही राहायचं, कसंही बोलायचं हे करून चालणार आहे का?
आपला भारत पूर्णपणे स्वातंत्र्य आहे असं आपण अधोरेखित करतो. पण या भारतात स्वातंत्र्याची मर्यादा ओलांडताना मला दिसत आहे. भारतात राहणारे काही स्वतःला फारच स्वातंत्र्य असल्यासारखं वागतात.
साधं उदाहरण सांगायचं म्हणजे, रस्त्यावरून जात असताना आपल्या बॅगमध्ये असलेला कचरा किंवा खाणं झाल्यानंतर तो कागद रस्त्यावर फेकून देणे. असे करणारे फक्त कोणी एकटाच नसतो तर कित्येकजण या चुकीच्या वागणुकीला बळी पडतात. आणि बळी पडूनही विचार मात्र, "रोजचा कचरा साफ करणारे सरकारी कर्मचारी आहेतच" असा असतो.
अरे पण एक-एक करता -करता अनेक होतात आणि जागेवरचा कचरा सहज वाढत जातो. आणि त्या कचऱ्यामधे विचित्र असे टाकाऊ पदार्थ असतात जे जमिनीमध्ये सहज कुजत नाही आणि या सगळ्यामुळे वातावरणात दुर्गंधी पसरते आणि हवेमधला प्राणवायू कमी होतो. आणि मग काय, माणसांपासून तर जनावरांना सुद्धा शारीरिक दृष्टया त्रास होतोच.
स्वच्छतेचे प्रचलित पुढारी संत गाडगे बाबांनी दिवसभर झाडू हातात घेऊन जागोजागचा कचरा साफ केला. पण निदान तेवढी अपेक्षा न करता कचरा न करण्याची अपेक्षा तर करूच शकतो. कारण कचरा करणे स्वातंत्र्याच्या कुठल्याच नियमावलीत बसत नाही. त्यामुळे स्वातंत्र्य मर्यादा ओलांडण्यापेक्षा स्वतंत्र मर्यादा टिकवून ठेवणे गरजेचे आहे.
आपला भारत सांस्कृतिक देश म्हणून ओळखला जातो. पण आज भारतातील कित्येकजण पाश्चात्त संस्कृतीचं अनुकरण करीत आहे त्यामुळे आपल्या प्राचीन संस्कृतीचा विसर पडतो आहे. मला कुठल्याही संस्कृतीच्या राहण्याबद्दल, पेहरावाबद्दल टीका नाही करायची आहे. मात्र एवढच सांगायचं आहे कि, स्वातंत्र्य दिन असो वा कुठलाही सण असो, थाटामाटात उत्सव साजरा करणे एवढंच कर्तव्य नाही तर त्याही पलीकडे सण साजरा करण्याचं महत्व, त्या सणांचं गुढ रहस्य काय आहे? हे समजावून घेणं महत्वाचं आहे.
स्वातंत्र्याचा मान राखण्यासाठी स्वातंत्र्य सेनानी बनणं गरजेचं नाही आहे तर प्रगत पथावर असणाऱ्या भारतातील एक सामान्य जागृत नागरिक म्हणून छोट्या-छोट्या सामान्य गोष्टींना सुधारणे म्हणजे स्वातंत्र्याचा मान राखणे होय.
स्वातंत्र्य हे शांततेचं प्रतीक आहे..
स्वातंत्र्य हे धेर्य आणि शौर्याचं प्रतीक आहे..
स्वातंत्र्य हे मान, आदर, सन्मानाचं प्रतीक आहे..
स्वातंत्र्य हे माणसाची माणुसकी जपण्याचं प्रतीक आहे..
स्वातंत्र्य हे विविधता-संस्कृती टिकवण्याचं प्रतीक आहे..
स्वातंत्र्य अमर्यादित जरी असलं तरी ते ठारावीक मर्यादेचं प्रतीक आहे..!!
स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्य असलेलं एक मन बोलतय..
तुम्हा सर्वांना
!!!! 🇮🇳🇮🇳"स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा"🇮🇳🇮🇳!!!!
Ja
ReplyDelete👍
ReplyDelete💪...💯 👍
ReplyDeleteChan lihilays 😊✍️