हल्ली पोस्ट ऑफिस(डाक घर) या नावाशी आपला तसा कमी संपर्क येतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे सुद्धा आठवत नसेल की आपण या आधी केव्हा पोस्ट ऑफिसमध्ये गेलो होतो. आता प्रत्येकाकडे मोबाईल आला आहे परंतु एक काळ होता जेव्हा टेलिफोन सुद्धा क्वचितच बघायला मिळायचं. तेव्हा सगळेजण ख्यालीखुशाली कळवायला पत्र लिहायचे. ते तिकीट, पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्र इत्यादी. आज आपल्याला कोणाशी बोलायचे असल्यास लगेच फोन करून मोकळे होतो, किंवा व्हाट्सअँपवर मेसेज पाठवून, हल्ली एकमेकांचे स्टेटस बघून आपल्याला एकमेकांबद्दल कळतं. पण पत्रांची मज्जा काहीतरी वेगळीच होती. माझं पत्रांशी नातं जुळलं ते लहानपणी. बाबा नेहमी कुठलाही सण असला की जवळच्या नातेवाईकांना शुभेच्छांचे पत्र पाठवायचे. त्यामुळे नातेवाईकांची नावांची, पत्ता या सगळ्यांची यादी बनवायला बाबा मला सांगत असे. पत्र लिहिताना सुख-दुःख अशा भावना व्यक्त करायचे किंवा मोठांचा आशीर्वाद, लहान मुलांसाठी गोड गोडं पापा. आणि हे सगळे पत्र टाकण्यात खूपच कुतूहल वाटत असे. पोस्टमन काका आमचे दैवत. त्यामुळे ते आले की सगळ्यांना फार आनंद व्हायचा. कारण कितीतरी दिवसानंतर पत्राचं उत्तर...
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!