Skip to main content

आपलं फक्त लक्ष नसतं..

आपलं फक्त लक्ष नसतं...



संकटांना कधी कंटाळायचं नसतं,
त्याला सामोरे जायचं असतं।
कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं,
आपलं काम चांगलं करायचं असतं।
अपमानाने कधी खचायचं नसतं,
जिद्दीने बळ वाढवायचं असतं।
नाराज मुळीच व्हायचं नसतं,
चैतन्य सदा फुलवायचं असतं।
पाय ओढले म्हणून परतायचं नसतं,
सतत पुढे पुढे जायचं असतं।
लोक निंदेला कधी घाबरायचं नसतं,
आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं।
रागात कोणाला बोलायचं नसतं,
प्रेमाने मन जिंकायचं असतं।
जिवनात खूप करण्याजोगं असतं,
आपलं फक्त तिकडे लक्षं नसतं।

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

My Drawings✏😇

कला वाट पाहतांना एक सुंदरी.....😍 माझ्या स्वप्नातली एक सुंदर परी.....💗 पक्ष्यांची उंच भरारी...🐦🕊 माझी आई..💗   नयन...👁

प्रवासातील अनुभव (भाग 2)

प्रवासातील अनुभव (भाग 2) कितीतरी दिवसानंतर आपण फक्त काही दिवसांसाठी घरी🏠 जात असतो म्हणून माझी 🕋कॉलेजला परत येण्याची इच्छाच नव्हती. ओढ जरी घरचीच असली तरी मनाला आवरत 🙂कॉलेजला परत यावेच लागते. येतांना घडलेला एक प्रसंग..  नेहमीप्रमाणे आजही बाबा म्हणाले,"बेटा लवकर आटप आपण एक तास अगोदर पोहचायला हवं". मी म्हणाली,"बाबा आपण अर्धा तास अगोदर निघूया". बाबा काही मानले नाही शेवटी एक तास अगोदरच नागपूरच्या रेल्वे स्थानकावर 🚞आम्ही पोहोचलो.  तिकीट काढलं पण तरी एक तास वेळ होता 😶अजून ट्रेन यायला. माझे बाबापण दुसरं कोणी दिसलं कि त्यांच्याशीच गप्पा 😀आणि मी इथे कंटाळत 😔होती. माझं फक्त इकडे-तिकडे पहाणं👁, येणाऱ्या-जाणाऱ्या ट्रेन कडे कंटाळलेल्या नजरेने😒 पहाणं बस हेच सुरु होतं. आणि त्यात स्टेशनवर वस्तू विकणाऱ्यांच्या आवाज👻.  त्यातलाच एक मुलगा 👦,कदाचित आठवीतल्या वयाच्या मुलाएवढाच असावा. जोरजोराने ओरडत होता 'पानी थंडा-थंडा पानी". मी मनात म्हटलं काय मुलगा आहे, कसले घाणेरडे कपडे आहे याचे, कसला दिसतो 😒आहे, कसला अनाडी आहे. जाऊ दे रे बाबा🙅, मी पण हे काय विचार करत बसल...