आई हे देवाने आपल्याला दिलेलं सुंदर वरदान आहे कि काय! असं मला नेहमी वाटतं असतं. ती आपल्या संसाराला तर सांभाळते पण इतरांची काळजी ही तितकीच घेते. खरं सांगायचं म्हणजे मुक्या जनावरांवर असलेलं तीचं प्रेम इतकं निर्मळ आहे, कि कधी मलाही हेवा वाटतो. त्यांची काळजी घेणे जणू काही तिची जबाबदारी. या तापलेल्या उन्हाच्या दिवसात जिथे माणूस पाण्यासाठी व्याकुळ होतो, तिथे भर उन्हात अन्न पाण्याच्या शोधात मुके जनावर तर होणारच. किती तहानलेले असतील ते, हा विचार करून ती रोज आठवणीने कुत्रे, मांजर, पक्षी आणि गाई यांच्याकरिता पाणी ठेवते. चुकून कधी पाणी ठेवायचं विसरली तर "तुम्हाला नाही आलं का ठेवता?" असं ती रागावते, पण त्यात तीच आतून दडलेलं खरं प्रेम- काळजी सहज उभारून दिसते. दिवासेंदिवस आपण मोठं होतो, आपल्या कामात व्यस्त होतो. त्यामुळे कदाचित छोट्या छोट्या गोष्टी किती महत्वाचे असतात याच भान विसरतो. या वेगवान वाढणाऱ्या शहरांत जागोजागी सिमेंटचे रस्ते बांधताना दिसतात त्यामुळे नंदी,नाले, तलाव, पाण्याचे डबकं फार कमी आढळतात. पाण्याचं स्रोत त्यांच्यासाठी कमी झालंय. हा विचार करून, थोडी आईची ही जबाबदारी आता मी ...
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!