Skip to main content

Posts

Showing posts from September, 2022

त्यांच्याकरिता

रोजप्रमाणे त्या दिवशी पण ती ऑफिस मधून घरी जायला निघाली. मोठे रस्ते नि अजूबाजुला सिमेंट रेतीचे मोठया इमारती बघून तिला आनंद झाला. तिला कळलं की आपला भारत वेगाने प्रगतशील होत आहे. हा विचार करत ती पुढचं पाऊल टाकत गेली. समोर तिला एक गाय दिसली, तहानलेली होती त्यामुळे रस्त्यावर साचलेलं पाणी पीत होती. तिला पाणी कमी पडू नये म्हणून तिने आपल्या बॉटल मधील पाणी दिलंय. ती पुढे निघाली. पण तिला पाण्याचं असलं कुठलाही स्रोत नाही दिसला ज्यात या परिसरात राहणाऱ्या जनावरांना-पक्ष्यांना पाणी देता येईल. तिचे विचार सुरू, भारत प्रगतशील च्या मार्गावर वेगाने भरारी घेत आहे. पण मग या वातावरणाची, पक्षांची-जनावरांची काळजी घेणं का विसरतोय? त्या दिवसापासून तिने या प्राणी-पक्षांसाठी पाणी ठेवायला सुरुवात केली. आज आपणही करूया नि एक पाऊल पुढे टाकूया.

मजा

दोन मिनिटात मॅगी तयार होणार, अर्ध्या तासात मशीन ने कपडे धुतले जातील,एका सेकंदाच्या आत हा संदेश दुसऱ्याला पाठवण्यात येईल , सोशल मीडिया अप्स ने एकासेकंदाच्या आत इमोशन बदलता येईल , दिवसाला मोबाईल द्वारे नाईट मोड पण सुरु करता येईल. तंत्रध्यानाचे असे कितीतरी उदाहरणे द्यावे तितके कमीच . काम तर सोपं झालं पण टाइम मॅनेजमेंट च्या धुंदीत संयम ठेवणे विसरतो आहे . लवकर पोहोचण्याच्या धुंदीत जाताना हवेचा अनुभव घेणं विसरतो असं काका म्हणाले. मी थोड्यावेळ स्तब्ध राहून ऐकत होते आणि नंतर विषय निघाला तो सभोवताली जीवनाचा. मग काय! काकांचं बोलणं मात्र सुरूच . पोरी शॉवर पेक्षा पावसाच्या पाण्यात भिजण्यात मजा आहे , कधी रस्तात एक मिनटं थांबून या भीरभिरणाऱ्या फुलपाखरांकडे बघण्यात मजा आहे, खचलं तरी संपलं नाही तर धीर धरण्यात आनंद आहे, पूजा दुसऱ्याच्या हातून नाही तर स्वतःच्या हातून करण्यात मजा आहे, पक्ष्यांसाठी आणि जनावरांसाठी अंगणात पाणी आणि खाऊ ठेवण्यात मजा आहे, प्रशंसा स्वतःची करण्यापेक्षा दुसऱ्यांची करण्यात मजा आहे, कपडे खराब होईल हा विचार करण्यापेक्षा साचलेल्या पाण्यात उड्या मारण्यात मजा आहे, न ...

वेगवान पाऊस

थांब जरा म्हटल्यावर तरीही आलास तू, भिजवू नको म्हटल्यावर तरीही भिजवले तू, छत्री नाही सांगितल्यावर सुद्धा जोरात पडलास तू, त्या गरिबांच्या घरी पाणी साचतंय पण निरंतर राहिला तू, रस्त्यावरची दुकाने उठवावी लागणार ठाऊक असताना येत राहिला तू, पूर आला नदीला पण बरसत राहिला तू, घर लागली वाहायला पण सतत राहिला तू, माणसं लागली मरायला पण वेग वाढवला तू, इतकं सगळं झाल्यावर सुद्धा शेवटी नाही थांबला तू..?