मोकळेपणाने उडायचे आहे आभाळात या, बेधुंद व्हायचं आहे निसर्गात या... चिखलात भरलेल्या पावलांना स्वच्छ करून पुन्हा या मातीत भरावयाचे आहेत, कितीही पैसे कामावला तरी आपल्या माणसांना मात्र जपायचं आहे... ओढ नि अतुरतेची वाट या डोळ्यांना बस एकच आहे, ती म्हणजे समाजाला सकारात्मकतेने बदलवताना आणि बदलताना बघायचं आहे...
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!