स्वच्छंद वारा आणि आज नभ असे रंगले, नैसर्गिक परिसराचा आस्वाद घेत मी मात्र दंगले... कळींची फुलली फुले, पाने गळती सुरू झाली, अशा या सुंदर वातावरणाने आज बघा कमालच केली... पावसाचे हे ओले थेंब पडती जेव्हा अंगावरती, सगळे विसरुनी गुंतलेले मन पुन्हा पुन्हा मोकळे होती... जेव्हा कागदाचे जहाज पाण्यावरती अलगद तरंगते, तेव्हा आमचे कोलगेट चे दात आणि ओठ फार खुलून हसते... अश्या या पावसाळी झालेल्या वातावरणात जेव्हा समोर येतं गरमा-गरम चहा आणि त्याचा सुगंध, तर वाट न बघता तो चहा पिताना होतो आम्ही भरभरून दंग... खरंतर अजूनही खूप सुचतंय, कळत नाही आता या कवितेचा कसा करू अंत.... !!!
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!