Skip to main content

Posts

Showing posts from August, 2021

स्वातंत्र्य विचार

उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला.. नतमस्तक त्या सर्वांसाठी, ज्यांनी भारत देश घडवला..!! आज आपण सर्वे स्वातंत्र्य दिनानिमित्त जल्लोष, उत्सव साजरा करतो. पण खरंतर स्वातंत्र्य म्हणजे काय? त्याची व्याख्या आपण नीट करतो पण कर्तव्यात कुठेतरी चुकतो. मला बोलायचं स्वातंत्र्य आहे, मला राहण्याचं स्वातंत्र्य आहे आणि आणखी अनेक गोष्टींचं स्वातंत्र्य आहेच. म्हणून कसंही वागायचं, कसंही राहायचं, कसंही बोलायचं हे करून चालणार आहे का? आपला भारत पूर्णपणे स्वातंत्र्य आहे असं आपण अधोरेखित करतो. पण या भारतात स्वातंत्र्याची मर्यादा ओलांडताना मला दिसत आहे. भारतात राहणारे काही स्वतःला फारच स्वातंत्र्य असल्यासारखं वागतात. साधं उदाहरण सांगायचं म्हणजे, रस्त्यावरून जात असताना आपल्या बॅगमध्ये असलेला कचरा किंवा खाणं झाल्यानंतर तो कागद रस्त्यावर फेकून देणे. असे करणारे फक्त कोणी एकटाच नसतो तर कित्येकजण या चुकीच्या वागणुकीला बळी पडतात. आणि बळी पडूनही विचार मात्र, "रोजचा कचरा साफ करणारे सरकारी कर्मचारी आहेतच" असा असतो.  अरे पण एक-एक करता -करता अनेक होतात आणि जागेवरचा कचरा सहज वाढत जातो. आणि त्या कचऱ्यामधे विचित्र असे...