आपलं फक्त लक्ष नसतं... संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्याला सामोरे जायचं असतं। कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं, आपलं काम चांगलं करायचं असतं। अपमानाने कधी खचायचं नसतं, जिद्दीने बळ वाढवायचं असतं। नाराज मुळीच व्हायचं नसतं, चैतन्य सदा फुलवायचं असतं। पाय ओढले म्हणून परतायचं नसतं, सतत पुढे पुढे जायचं असतं। लोक निंदेला कधी घाबरायचं नसतं, आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं। रागात कोणाला बोलायचं नसतं, प्रेमाने मन जिंकायचं असतं। जिवनात खूप करण्याजोगं असतं, आपलं फक्त तिकडे लक्षं नसतं।
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!