प्रवासातील अनुभव(भाग 1) 15 ऑगस्ट 🇮🇳2018 चा तो दिवस होता. तो दिवसही अगदी 😁आनंदाचा. 15 ऑगस्टचा कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्ही सगळे घरी 🏘जाण्याकरिता निघालो. कुणी बसने 🚃निघाले, तर कुणी 🚈रेल्वेने. कधीही घरी जायचं असलं तर माझा प्रवास हा रेल्वेनेच. आम्ही सगळे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी शेगावच्या 🚞रेल्वे स्थानकावर पोहोचलो. त्यातल्या जास्तीत-जास्त जणांचा प्रवास हा शेगाव ते अकोला, शेगाव ते वर्धा असा. माझाच प्रवास मात्र लांब शेगाव ते नागपूर. गाडी येण्याला उशीर होता म्हणून आम्हीं सर्वे गप्पा मारण्यात दंग 😀झालो. सगळ्यांच्या गमती-जमती सुरु होत्या. थोड्या वेळानंतर गाडी आली ... आम्हा इंजिनिर्सची कमाल तर बघा👉, जनरलचे तिकीट काढून रिझर्वेशनच्या डब्यात बसले. ना तिकीट चेकरची भिती ,"बस आपलं बिंदास , बेधडक✌.." शेगाव पासून इकडचा प्रवास म्हणजे गाडी रिकामी असायची त्यामुळे आम्हा सर्वांना आरामात जागा मिळाली. आम्ही काही शांत बसणाऱ्या मधून नव्हतो, मग झालं सुरु एकमेकांचे फोटो काढणं,📷 सेल्फी काढणं, नंतर मिळून वेगवेगळे गाणे🎶 म्हणणं आणि थोड्याच वेळात सुरु झाला तो खेळ "अंताक्षरीच...
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!